शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

रत्नागिरी : धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2018 16:37 IST

गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

ठळक मुद्दे धरणामुळे सुटला गुहागरचा पाणीप्रश्न, वर्षभर पिण्याचे पाणी गेल्या ४५ वर्षात धरणातील गाळ जैसे थे; अद्याप उदासीनता

गुहागर : गुहागर शहर व आजूबाजुच्या ग्रामपंचायतींना वर्षभर पिण्याचे पाणी पुरविण्याचे काम अप्रत्यक्षपणे मोडकाघर धरण सध्या करीत आहे.

कमी पावसामुळे भविष्यात दुष्काळासारख्या गंभीर संकटापासून हे धरण महत्त्वाची भूमिका बजावू शकते, हे लक्षात घेता पावसाळ्यात वाहून जाणाऱ्या पाण्यापासून धरणातील पाणीसाठा व पाण्याची पातळी वाढविण्याकरिता सर्वतोपरी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

यासाठी गेल्या ४५ वर्षात धरणामध्ये साठलेला गाळ उपसण्याची गरज आहे. या कामासाठी तालुका प्रशासनाच्या पुढाकारासह लोकसहभागही तितकाच महत्त्वाचा मानला जात आहे.या धरणाचे पाणलोट क्षेत्र ११.६५ चौरस किलोमीटर असूून, उंची तब्बल २० मीटर आहे. या अवाढव्य धरणाची साठवण क्षमता ४४.७० लाख घनमीटर आहे.

वाढत्या शहरीकरणात कालांतराने शेती, भाजीपाला व बागायतीसाठी कालव्याने पाणीपुरवठा करण्याची पद्धत बंद झाल्यानंतर शिल्लक राहिलेल्या धरणाच्या मुबलक पाणीसाठ्यावर सुरुवातीला तालुक्याचे ठिकाण असलेल्या गुहागर व शेजारच्या असगोली ग्रामपंचायतीने संबंधित खात्याची पूर्वपरवानगी घेऊन धरणाच्या शेजारी विहीर पाडून त्यावर स्वतंत्र जॅकवेल पंप बसवून नळपाणी योजना सुरू केली.त्यानंतर शेजारच्या पाटपन्हाळे, पालशेत व आरे गावांनीही आपापली पाणीयोजना व धरणाच्या बाजूला विहीर उभारून सरू केली. या धरणाच्या उभारणीपासून आजतागायत डागडुजी व दुरूस्तीकरिता कोणताही शासकीय निधी खर्ची पडला नाही.

परंतु सन २०१० - ११ मध्ये धरणाच्या भिंतीमधून लागलेली गळती बंद करण्यासाठी राज्य शासनाने जलसुधारणा प्रकल्पांतर्गत जागतिक बँकेकडून प्राप्त झालेला ९५ लाखांचा भरीव निधी याठिकाणी खर्ची टाकला.परंतु प्रत्यक्षात ही गळती बंद करण्यास संबंधित ठेकेदाराला अपयश आले. त्यामुळे दुरूस्तीवर टाकलेला निधी अक्षरश: वाया गेल्याने वर्षाकाठी साठलेल्या पाण्यापैकी लाखो लीटर पाणी आजही या धरणामधून वाया जात समुद्राला मिळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते.

त्यामुळे शासनाच्या लघुपाटबंधारे खात्याने पाण्याचे सध्याचे महत्व लक्षात घेता संबंधित कंत्राटदाराकडून ही गळती कोणताही जादा निधी न देता पूर्णत: बंद करून घ्यावी, अशी मागणी गुहागर तालुकावासीयांकडून होत आहे.गेल्या काही वर्षात कमी झालेला पाऊस लक्षात घेता भविष्यात आपणही पाण्याच्या टंचाईपासून निर्माण झालेल्या दृष्टचक्रात सापडल्याशिवाय राहणार नाही, अशी भीती आहे.सध्याची वाढती लोकसंख्या, भरमसाठ जंगलतोड, नवे गृह व बंगलो प्रकल्पामुळे वाढलेल्या नवनवीन वस्त्या, गावाकडे होणारे स्थलांतर यामुळे भविष्यात पाणीटंचाईचे भीषण संकट आपल्यावरसुद्धा येऊ शकते, हे लक्षात घेऊन आपण आपल्या लाभलेल्या मोडकाघर धरणाची योग्य तऱ्हेने जपणूक व निगा राखून त्यातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कशी वाढविता व कायम राखता येईल, हे पाहणे अत्यावश्यक आहे. संपूर्ण गुहागर शहर आणि परिसराला वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा या धरणात उपलब्ध आहे. त्यामुळे हे धरण वरदानच ठरत आहे.गुहागर पर्यटनस्थळ : धरणाची योग्य ती निगा राखण्याची गरजगुहागर शहर व तालुका परिसर आज पर्यटनाचे एक सुंदर ठिकाण म्हणून विकसित होत आहे. हा पर्यटन विकास होत असताना आपल्याकडे असलेला समुद्रकिनारा व प्रेक्षणीय स्थळे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढेच आपल्या शहराला मिळणारे मुबलक पाणीही महत्त्वाचे आहे.

शहर परिसराला मुबलक पाणी नसेल तर नुसती प्रेक्षणीय ठिकाणे आणि परिसर असून काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे गुहागरच्या पर्यटन विकासात शहराला कायमस्वरुपी पाणीपुरवठा करणाऱ्या धरणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.मोडकाघर धरणामध्ये गुहागर तालुकावासीयांची पूर्ण क्षमतेने तहान भागविण्याची ताकद आजही आहे. त्यामुळे या धरणाची डागडुजी करून निगा राखली, तरच पुढची काही वर्षे पाणी मिळू शकेल. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणWaterपाणी