शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

रत्नागिरीत भाजी विक्रेते-नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2019 5:31 PM

रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविके्रत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.

ठळक मुद्देस्वाभिमानचे कार्यकर्ते मदतीला धावलेवाहनांसह सर्वजण पोलीस स्थानकात

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधातील कारवाईला मारूती मंदिर येथील भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध केल्याने नगरपरिषद कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला. भाजीविक्रेत्या महिलांच्या बाजूने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे कार्यकर्ते धावल्याने कर्मचारी आणि त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.मारुती मंदिर येथील भाजी विक्रेत्या महिलांना महिनाभरापूर्वीच क्रीडांगणामागील नगर परिषदेच्या इमारतीत भाजी विक्रीसाठी जागा, गाळे उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र तेथे ग्राहकच येत नाहीत. तसेच क्रीडांगणासमोरील रस्त्यालगत अन्य भाजी विक्रेते व्यवसाय करतात, अशी भाजी विक्रेत्यांची तक्रार केली होती.

जोपर्यंत सर्वांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मूळ जागेवरच या भाजी विक्रेत्यांनी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत स्वाभिमान पक्षाने या भाजी विक्रेत्यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर नगरपरिषदेने शहरातील फिरते विके्रते, स्टॉल्स, भाजी व फळ विके्रत्यांविरोधात मोहीम सुरू केली होती. या मोहिमेनंतर मारूती मंदिर येथील भाजी विक्रेते क्रीडांगणाच्या मागील बाजूला स्थलांतरीत झाले होते.मात्र, बुधवारी सकाळी भाजी विके्रत्या महिला पुन्हा क्रीडांगणाच्या पुढील बाजूला भाजी विक्रीसाठी बसल्या होत्या. ही माहिती मिळाल्यानंतर नगरपरिषदेचे कर्मचारी त्याठिकाणी आपल्या पथकासह दाखल झाले. त्यांनी भाजीविक्रेत्या महिलांचे सामान उचलण्यास सुरूवात केली. या कारवाईला भाजीविक्रेत्या महिलांनी विरोध करण्यास सुरूवात केली. या महिला कर्मचाऱ्यांच्या अंगावर धावून गेल्याने कर्मचारी आणि भाजीविक्रेत्या महिलांमध्ये जोरदार राडा झाला.भाजीविक्रेत्या महिलांविरोधात नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई सुरू केल्याची माहिती स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना मिळताच सर्वजण त्याठिकाणी दाखल झाले. त्यामुळे कर्मचारी आणि स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.

स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने कर्मचाऱ्यांबरोबर बाचाबाची झाली. स्वाभिमानचे कार्यकर्त्यांनी आधी शहरातील इतर विके्रत्यांवर कारवाई करा मगच भाजीविक्रेत्या महिलांना हटवा अशी मागणी करत शहरातील विक्रेते बसलेल्या ठिकाणी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेले. त्यामुळे काहीकाळ वातावरण तापले होते.

अखेर घटनास्थळी पोलीस दाखल झाल्याने पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेत वाहनांसह पोलीस स्थानकात आणले. याबाबत परस्पर विरोधी तक्रार देण्याचे काम सुरू होते.

टॅग्स :MarketबाजारRatnagiriरत्नागिरी