शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रेल्वे कोकण आतापासूनच फुल्ल, अनेक गाड्यांचे बुकिंग बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 17:29 IST

कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची दारे बंद झाली आहेत. कारण तीन महिने अगोदर आरक्षणाची सुविधा असल्याने अनेकांनी आरक्षण आधीच करून ठेवल्याने आयत्यावेळी किंवा यावर्षीे कधीही गणेशोत्सवात कोकणात येण्याचा बेत आखला तर तो तडीस जाणे मुश्किल ठरणार आहे. कारण बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे.

ठळक मुद्देगणेशोत्सवासाठी रेल्वे कोकण आतापासूनच फुल्लअनेक गाड्यांचे बुकिंग बंद : पहिल्याच दिवसात आरक्षण संपले

विहार तेंडुलकररत्नागिरी : कोकणातील मोठा सण असलेल्या गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेची दारे बंद झाली आहेत. कारण तीन महिने अगोदर आरक्षणाची सुविधा असल्याने अनेकांनी आरक्षण आधीच करून ठेवल्याने आयत्यावेळी किंवा यावर्षीे कधीही गणेशोत्सवात कोकणात येण्याचा बेत आखला तर तो तडीस जाणे मुश्किल ठरणार आहे. कारण बहुतांश रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे.कोकणात गणेशोत्सव हा मोठा सण मानला जातो. गेल्या काही वर्षात मे महिन्यात प्रदीर्घ सुट्टी असताना त्यापेक्षा गणेशोत्सवातच मुंबईकरांची गर्दी जास्त होते. रेल्वेने तीन महिने आगाऊ आरक्षणाची सोय उपलब्ध करून दिल्याने आता गणेशोत्सवात कोकणात यायचे असेल तर त्याचे सुट्टीपासूनचे ते अगदी रेल्वे आरक्षणापर्यंतचे नियोजन तीन महिने अगोदरच करावे लागते.

त्यानंतरच कोकणातील गणेशोत्सवाचे मुंबईकरांना दर्शन होते आणि कोकणातील प्रत्येक घरात गणेशोत्सवात मुंबईकर आवर्जुन येतोच. त्यामुळे रेल्वे आरक्षण सुरु झाल्यानंतर त्यावर अक्षरश: उडी पडते.यंदा गणेशोत्सव १३ सप्टेंबरपासून सुरु होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वेचे गणेशोत्सवासाठीचे आरक्षण १० तारखेपासूनच सुरु झाले आहे. मात्र, एका दिवसातच ते फुल्ल झाले. आरक्षण फुल्ल झाल्यानंतर पुढील दोन दिवसात काही गाड्यांचे आरक्षण यंत्रणाही बंद करण्यात आली आहे.

आरक्षणाची प्रतीक्षा यादी ठराविक संख्येपेक्षा जास्त झाली की, आरक्षण बंद करण्यात येते. अशा तऱ्हेने अनेक रेल्वेगाड्यांचे आरक्षण आतापासूनच बंद झाले आहे. १३ सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाची कोकण रेल्वेने सर्वात अगोदर चाहुल दिली आहे. मात्र, दुसरीकडे रेल्वेचे आरक्षणच संपून गेल्याने हताश होण्याची वेळ मुंबईकरांवर आली आहे.गणेशोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांचे आरक्षण मिळत नसेल तर काहीजण गौरीच्या सणाला येण्याचा प्रयत्न करतात. गणेशोत्सवात गौरीपूजनालाही कोकणात येणाºयांची संख्या मोठी आहे. गौरी विर्सजन झाल्यानंतर कोकणात येणाऱ्यांची गर्दी कमी होते.पाच दिवस अगोदरपासूनच गर्दीयंदा गणेशोत्सव १३ सप्टेंबरला म्हणजेच गुरुवारी येत आहे. त्याअगोदर ८ तारखेला शनिवार, तर ९ तारखेला रविवार येत आहे. हरितालिका तृतीया १२ सप्टेंबर रोजी आहे. त्यामुळे ज्यांना ११ किंवा १२ तारखेचे आरक्षण मिळाले नाही, त्यांनी अगदी ८ तारखेचेही आरक्षण केले आहे. त्यामुळे ८ तारखेपासून बहुतांश गाड्यांचे पुढील आरक्षण कोकण रेल्वेने बंद केले आहे....या गाड्यांचे आरक्षण बंददादर - सावंतवाडी तुतारी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस याबरोबरच दादर - रत्नागिरी - मडगाव पॅसेंजर या गाड्यांचे आरक्षणच बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना अन्य पर्याय शोधावे लागणार आहेत.तेजसचा आधारसर्वात वेगवान आणि आलिशान रेल्वे असलेल्या तेजस एक्स्प्रेस या गाडीचे ९ सप्टेंबरचे आरक्षण सध्या उपलब्ध आहे. पुढील काही दिवसात तेही फुल्ल होण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवात दुसरा पर्याय नसल्याने सामान्य प्रवासीही तेजसकडे वळतात.प्रतीक्षा यादी लांबच लांबकोकणकन्याची प्रतिक्षा यादी ९०८पर्यंत, तुतारी एक्स्प्रेस-८१३पर्यंत, जनशताब्दी -११७८पर्यंत, मांडवी एक्स्प्रेस-४३८ पर्यंत प्रतिक्षा यादी आहे. या सर्व गाड्यांचे आरक्षण बंद करण्यात आले आहे.अनारक्षित गाड्यांचा पर्याय पण...गणेशोत्सवात कोकणासाठी अनारक्षित गाड्यांचा पर्याय ठरू शकतो. मात्र, कोकण रेल्वेने आजपर्यंत यावर विचारच केलेला नाही. अनारक्षित गाड्या सोडून गर्दीवर नियंत्रण मिळवता येऊ शकते. पॅसेंजर रेल्वेची सुविधा झाल्यास त्यामधून प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर होऊ शकते. डेमू हाही एक मोठा पर्याय आहे. पण पॅसेंजर गाडीचा पर्याय अद्याप अवलंबलेला नाही.जादा रेल्वेंकडे लक्षगणेशोत्सवात घरी येण्याची उत्कट इच्छा असतानाही ती अपूर्ण राहात असल्याने आता भक्तगणांना गणेशोत्सवाबरोबरच आस लागली आहे ती जादा रेल्वेगाड्यांची. रत्नागिरी ते दादर आणखी एका गाडीची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेRatnagiriरत्नागिरीrailwayरेल्वे