शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रत्नागिरीही पर्यटन जिल्हा, मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2019 6:12 PM

रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून सरकारकडून मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला दिली.

ठळक मुद्देरत्नागिरीही पर्यटन जिल्हा मुंबई-गोवा महामार्ग पर्यटनाची लाईफ लाईन 

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून सरकारकडून मान्यता दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथील जाहीर सभेत उपस्थित जनसमुदायाला दिली.भाजप सरकारची महाजनादेश यात्रा मंगळवारी रात्री ९ वाजता रत्नागिरीत दाखल झाली. जयस्तंभ येथे महाजनादेश यात्रेचे आगमन झाल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात यात्रेचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मारूती मंदिरजवळील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावरील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री विनोद तावडे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड, माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे, नरेंद्र पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन, माजी जिल्हाध्यक्ष बाळ माने, माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर, अ‍ॅड. बाबा परुळेकर, तसेच मान्यवर नेते उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या पाच वर्षांच्या राज्यातील सत्ताकाळात आमच्या सरकारने जनतेच्या विकासकामांबाबत ज्या अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. ग्रामसडक योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील १६३९ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम करण्यात आले आहे. तसेच रत्नागिरी शहरासाठी राज्य सरकारने ६३ कोटींच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी मंजुरी दिली आहे. त्या योजनेचे काम सुरू आहे. शहरातील घनकचरा प्रकल्पालाही मंजुरी देण्यात आली आहे. शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालयही साकारत आहे.चौपदरीकरणाला वेग!मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम सध्या पावसामुळे काही प्रमाणात मंदावले आहे. मात्र, पाऊस संपताच हे काम अधिक वेगाने सुरू केले जाणार आहे. हा महामार्ग म्हणजे कोकणातील पर्यटनासाठी लाईफ लाईन ठरणार असून कोकणातील पर्यटनाला अधिक चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न यापुढेही सुरूच राहील.रत्नागिरी-नागपूर महामार्गमिऱ्या रत्नागिरी ते नागपूर महामार्गाचे जिल्ह्यात ६८ किलोमीटरचे काम आहे. या कामासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जयगड-डिंगणी गुडस रेल्वे मार्ग, चिपळूणहून साताऱ्यासाठी मार्ग याबाबत कार्यवाही सुरू आहे. जनतेच्या विकासासाठी भाजप सरकार कटीबध्द राहणार असल्याचे ते म्हणाले. त्याचबरोबर रत्नागिरीतून विमानसेवाही नजिकच्या काळात सुरू होईल, असे ते म्हणाले.पुन्हा राज्यात भाजपला जनादेश!गेल्या पाच वर्षामधील जी विकासाची कामे भाजप महायुती सरकारने केली आहेत ती राज्यातील जनतेसमोर आहेत. मराठा आरक्षण कायदा केला आहे. पंतप्रधान आवास योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांना मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात विकासाचा धडाका लावला आहे. देशातील कोणतीही व्यक्ती बेघर राहू नये, ही त्यांची इच्छा आहे. त्यासाठी २०२१ पर्र्यंत राज्यातील कोणीही व्यक्ती बेघर असणार नाही. प्रत्येकाचे स्वत:चे घर असेल, यासाठी सरकार काम करणार आहे. जशी केंद्रात पुन्हा जनतेने नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता सोपवली आहे तशीच राज्यातही पुन्हा भाजपकडेच जनता सत्ता सोपवेल, जनादेश भाजपलाच देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.कॉँग्रेस करतेय पाठराखणया देशात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या देशनिष्ठेवर शंका घेत काही अपप्रवृत्ती सावरकरांच्या पुतळ्याला काळे फासायचे काम करतात. अशा लोकांचा मी निषेध करतो. तसेच अशा अपप्रवृतींची पाठराखण करण्याचे काम देशातील अनेक वर्षे सत्तेत राहिलेल्या कॉँग्रेस पक्षाकडून केली जात असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. यावेळी भाजप पदाधिकाऱ्यांनीही आपले विचार मांडले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राRatnagiriरत्नागिरी