शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

Ratnagiri: राजापूर तालुक्यातील हातिवले येथील टोल दोघा अज्ञातानी फोडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 21:17 IST

Ratnagiri: चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला राज ठाकरे लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर -  हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे.

- विनोद पवारराजापूर - दोन दिवसांपुर्वी मुंबइ गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसुड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या एवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते , चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबइ गोवा महामार्गावरील खड्डे पहा असा टोला लगावलेला असतानाच गुरुवारी सायंकाळी राजापूर -  हातिवले येतील टोल नाका काही अज्ञातानी फोडल्याची घटना घडली आहे.

गणेशोत्सव तोंडावर आलेला असतानाच सध्या मुंबइ गोवा महामार्गाची अक्षरश: चाळण झालेली आहे . येणार्या गणेशोत्सवासाठी चाकरमानी कोकणात येण्याची लगबग सुरु असतानाही अद्यापही शासन व प्रशासन महामार्गाच्या दुरावस्थेकडे लक्ष देत नसल्याने संतप्त झालेल्या कोकणवासियानी आपला राग राजापूर - हातिवले येथील टोल नाक्यावर काढला आहे.

गुरुवारी सायंकाळी पावणेपाच वाजण्याच्या सुमारास काही अज्ञातानी  घोषणा देत अचानक हातीवले येथील टोलनाक्याकडे आपला मोर्चा वळवत या टोलनाक्यावरील केबीनची मोठ्याप्रमाणावर मोडतोड केली असुन केबीनच्या काचाही फोडल्या आहेत . मुंबइ गोवा माहामार्गाचे काम करणार्या ठेकेदाराची मनमानी व गेली १७ वर्ष सुरु असणारे काम त्यातच यावर्षी महामार्गाची झालेली चाळण यामुळे कोकणवासियान्मधुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी राजापूर पोलिसानी सायंकाळी उशीरा दोघाना चौकशीसाठी ताब्यात घेतले असुन चौकशीअंती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया राबवण्यात येइल असे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.

मुंबई गोवा मार्गाचे काम रखडलेले असून तसेच रस्त्याची एकूण झालेले चाळण ठिकठिकाणी पडलेले खड्डे त्यात पीडब्ल्यूडी तसेच कॉन्ट्रॅक्टर यांचा मनमानी कारभार यामुळे याआधी सर्वसामान्य जनतेमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता आणि अखेर दोघा अज्ञातानी  यांनी आज सायंकाळी चार वाजून 45 मिनिटांनी  राजापूर हातिवले येथील टोल नाका फोडला

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीtollplazaटोलनाकाMaharashtraमहाराष्ट्र