शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाने सत्तेसाठी इतरांची सरकारं पाडली, कुटुंबांमध्ये भांडणं लावली"; अखिलेश यादवांची टीका
2
सर्वांनी माघार घेतली तर उमेदवार-नोटामध्ये निवडणूक का नाही? आयुक्त राजीव कुमारांनी केले स्पष्ट
3
Lipi Rastogi Suicide Note : मुंबईत आयएएस दाम्पत्याच्या मुलीची आत्महत्या, 'सुसाइड नोट'मध्ये काय? आलं समोर...
4
"आश्वासक बदल दिसला नाहीतर मी..."; CM शिंदेंचा उल्लेख करत शरद पवारांचा सरकारला इशारा
5
"कोणी केले सांगा, आम्ही त्यांना शिक्षा देऊ"; अमित शाह यांनी धमकावल्याच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
6
भारतातल्या पहिल्या निवडणुकीच्या मास्टरमाईंडवर येतोय सिनेमा, विद्या बालनच्या पतीची मोठी घोषणा
7
विजयापूर्वीच जल्लोषाची तयारी, पंतप्रधानांच्या निवासस्थानापासून भाजपा कार्यालयापर्यत होणार रोड शो  
8
पॉवर शेअर चमकला, सरकारचा आहे ५१ टक्के हिस्सा; १३ एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी करा, भाव वाढणार..."
9
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार
10
“आमच्या नादाला लागू नका, उद्धव ठाकरे हे...”; रवी राणांच्या दाव्यावर संजय राऊतांचा पलटवार
11
"हातकणंगलेमधून मीच निवडून येणार"; निकालाआधीच राजू शेट्टींनी थेट लीडच सांगितलं
12
T20 World Cup मधील सर्वात तरूण आणि वयस्कर खेळाडू कोण? तब्बल २५ वर्षांचे अंतर
13
प्रेरणादायी! इंजिनिअर झाला वेटर, विकली चित्रपटाची तिकिटं; ६ वेळा नापास, ७ व्या प्रयत्नात IRS
14
Akasa Air च्या दिल्ली-मुंबई विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; अहमदाबादेत ईमर्जन्सी लँडिंग
15
Exit Poll मध्ये भाजप्रणित एनडीएला बहुमत; गुंतवणूकदारांच्या उड्या, Adani च्या शेअर्समध्ये तुफान तेजी
16
निवडणूक आयोग गायब नव्हता; लोकसभा निकालापूर्वी पत्रकार परिषद घेत आयुक्तांनी सुनावले
17
BREAKING Lipi Rastogi: आयएएस अधिकारी विकास रस्तोगींच्या मुलीची आत्महत्या, मंत्रालयासमोरच्या इमारतीत घडला प्रकार
18
महाराष्ट्रात आम्ही ३५ पेक्षा जास्त जागा जिंकणार; निकालाआधी विजय वडेट्टीवार यांचा मोठा दावा
19
बहिणीला प्रियकरासोबत पाहताच संतापला भाऊ; वडिलांसह मिळून केली मुलाची निर्घृण हत्या
20
चर्चेतील 'या' हाॅट सीट्सवर बाजी मारणार तरी काेण ? कुठे लागू शकतात धक्कादायक निकाल?

रत्नागिरी : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करा, रवींद्र वायकर यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2018 4:25 PM

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना सूचनाबॅरिकेट, दिशादर्शक फलक व अन्य सुरक्षेच्या उपाययोजना करण्याच्या सूचना.कंत्राटदारांना दक्ष राहण्याचे निर्देश, कार्यकारी अभियंत्यांना दिले लेखी पत्र

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाचे काम सुरू असल्याने रस्ते वाहतुकीतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ कराव्यात. तसे निर्देश या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांना देण्यात यावेत, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी नॅशनल हायवे अ‍ॅथोरिटी आॅफ इंडियाचे कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.मागील वर्षीपासून मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम संथगतीने सुरू असल्याने वाहतुकीवर याचा परिणाम होताना दिसून येत आहे. एप्रिल - मे महिन्यात मोठ्या प्रमाणात मुंबईहून कोकणात येणाऱ्या व परत जाणाऱ्या प्रवाशांच्या हितासाठी तसेच त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा, यासाठी महामार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे.

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाही प्रवाशांच्या व स्थानिक जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या उपाययोजना कंत्रादारांनी न केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे.मागील काही दिवसांमध्ये दिवाणी खवटी तसेच कशेडी घाट येथे २ ते ३ अपघात झाले असून, यात काही प्रवाशांना प्राणही गमवावे लागले. कशेडी घाटातही अपघात झाल्याचे पालकमंत्री वायकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

चौपदरीकरणाचे काम सुरू असताना कंत्राटदारांनी विविध ठिकाणी दिशादर्शक फलक लावणे तसेच आवश्यक त्या सुरक्षेच्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. रस्ते वाहतुकीच्या माध्यमातून मुंबई - गोवा - मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता यावा, यासाठी कंत्राटदारांना धोक्याच्या ठिकाणी बॅरिकेट व दिशादर्शक फलक लावणे, अशी सूचना पालकमंत्री रवींद्र्र वायकर यांनी कार्यकारी अभियंता यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.सुरक्षेची काळजी नाहीगेल्या काही दिवसात महामार्ग चौपदरीकरणामुळे मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत अपघातांची संख्या वाढत आहे. महामार्गाचे काम करणाऱ्या कंत्राटदाराने काम सुरु करताना सुरक्षेची काळजी न घेतल्याने असे अपघात घडत असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरRatnagiriरत्नागिरीhighwayमहामार्ग