शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
4
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
5
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
6
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
7
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
8
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
9
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
10
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
11
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
12
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
13
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
14
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
15
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
16
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
17
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
18
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
19
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
20
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?

रत्नागिरी : मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:15 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देमुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमापालकमंत्री रवींद्र वायकर यांचे शासनाला पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. यात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याची रक्कम वसुल करण्याचीही सुचना केली आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्याचौपदरीकरणाचे काम मागील वषार्पासून सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांना काही अटी व शर्ती वर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे कार्यारंंभ आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षापर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करावी, असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजविण्याच्या रक्कमेचा ही समावेश करण्यात आला आहे.पावसाळ्यापुर्वी या राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजविणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. परंतु ठेकेदारांकडून याची गंभीर दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेक प्रवाशांना आपले प्राणही गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत.याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत अनेकवेळा बैठका घेऊन संबंधित ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. र

स्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक तो निधी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दिल्यानंतरही खड्डे बुजविले जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात जनतेमध्ये तसेच प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.या महामार्गावर पडलेल्या खड्डयांप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले आहेत. स्थानिकांकडून तक्रारीही प्राप्त होत असल्याचे वायकर यांनी या पत्रान नमूद केले आहे. त्यामुळे यापुढे महामार्गावर पडलेले खड्डे विहीत वेळेत भरण्यासाठी स्वतंत्ररित्या ठेकेदारांची नेमणुक करण्यात यावी.

या कामासाठी येणार स्वतंत्ररित्या निधीची तरतूद न करता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या रक्कमेतून वळती करण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरhighwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी