शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
3
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
4
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
5
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
6
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
7
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
8
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
9
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
10
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
11
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
12
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
13
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
14
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
15
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
16
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
17
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
18
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
19
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
20
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!

रत्नागिरी : मुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2018 17:15 IST

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे.

ठळक मुद्देमुंबई -गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदार नेमापालकमंत्री रवींद्र वायकर यांचे शासनाला पत्र

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नेमणुक करण्यात यावी, यासाठी पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र पाठविले आहे. यात चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांकडून खड्डे बुजविण्याची रक्कम वसुल करण्याचीही सुचना केली आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्याचौपदरीकरणाचे काम मागील वषार्पासून सुरू आहे. या चौपदरीकरणाचे काम ठेकेदारांना काही अटी व शर्ती वर देण्यात आले आहे. त्यानुसार या कामाचे कार्यारंंभ आदेश मिळाल्यापासून चौपदरीकरणाचे काम पूर्ण होईपर्यंत अस्तित्वात असणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षापर्यंत नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखभाल दुरुस्ती करावी, असे बंधनकारक आहे. त्यासाठी ठेकेदारांना देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये खड्डे बुजविण्याच्या रक्कमेचा ही समावेश करण्यात आला आहे.पावसाळ्यापुर्वी या राष्ट्रीय महामार्गावर पडणारे खड्डे बुजविणे ठेकेदाराला बंधनकारक आहे. परंतु ठेकेदारांकडून याची गंभीर दखल घेण्यात येत नाही. त्यामुळे पावसाळ्यात व पावसाळ्यानंतर या महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या महामार्गावरील खड्डयांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढले असून अनेक प्रवाशांना आपले प्राणही गमवावा लागल्याच्या घटनाही घडत आहेत.याप्रश्नी जिल्हाधिकारी तसेच संबंधित खात्याचे अधिकारी यांच्या समवेत अनेकवेळा बैठका घेऊन संबंधित ठेकेदाराविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा तसेच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम सुरू असताना आवश्यक त्या सुरक्षिततेच्या उपाययोजना तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी एकाही ठेकेदाराविरोधात कुठलीही कारवाई केली नाही. र

स्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक तो निधी चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला दिल्यानंतरही खड्डे बुजविले जात नसल्याने प्रशासनाच्या विरोधात जनतेमध्ये तसेच प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे.या महामार्गावर पडलेल्या खड्डयांप्रश्नी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी विधानसभेत प्रश्नही उपस्थित केले आहेत. स्थानिकांकडून तक्रारीही प्राप्त होत असल्याचे वायकर यांनी या पत्रान नमूद केले आहे. त्यामुळे यापुढे महामार्गावर पडलेले खड्डे विहीत वेळेत भरण्यासाठी स्वतंत्ररित्या ठेकेदारांची नेमणुक करण्यात यावी.

या कामासाठी येणार स्वतंत्ररित्या निधीची तरतूद न करता चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या रक्कमेतून वळती करण्यात यावी, अशी सुचनाही वायकर यांनी मुख्यमंत्री यांना केली आहे. 

टॅग्स :Ravindra Vaikarरवींद्र वायकरhighwayमहामार्गRatnagiriरत्नागिरी