शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

रत्नागिरी : पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी,  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 5:54 PM

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या रत्नागिरी शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी पाणी योजनेवरील स्थगिती उठवावी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

रत्नागिरी : रत्नागिरी शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थानअंतर्गत मंजूर झालेल्या पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती तत्काळ उठवली जावी व सध्याचा ठेका रद्द करून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे योजनेचे काम देण्यात यावे, या मागण्यांसाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या शहर शाखेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. आंदोलनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक वाडेकर यांनी दिला आहे.या मागण्यांचे निवेदन पक्षाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या निवेदनामध्ये म्हटले आहे की, पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश नगर परिषद जावक क्र. १८६ / ३३३०, दि. ८ एप्रिल २०१७ अन्वये ठेकेदाराला देण्यात आला आहे. राजकीय साठमारीमध्ये या योजनेला कोकण विभाग आयुक्तांनी स्थगिती दिली आहे. ही स्थगिती तत्काळ उठवावी व रत्नागिरीची सुधारित नळपाणी योजना लवकरात लवकर पूर्ण व्हावी, अशी मागणी पक्षाने केली आहे.निवेदनात ज्या मागण्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये योजनेवरील स्थगिती तत्काळ उठविणे, सध्याचा ठेका रद्द करून जीवन प्राधिकरण किंवा सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत योजनेचे काम करणे, योजनेची मूळ उद्दिष्टे, लाभ, हाती घ्यावयाची कामे व योजनेचा भविष्यात किती वर्षे लाभ होणार आहे, कामाची गुणवत्ता जाहीर करणे, यांचा समावेश आहे. राज्यात सेना भाजपची सत्ता आहे. नगराध्यक्ष शिवसेनेचे आहेत, मग योजनेला विलंब का, असा सवाल वाडेकर यांनी केला आहे.पाण्याचा ठणठणाटसुधारित पाणी योजना वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने रत्नागिरीकरांच्या पाणी समस्येत अधिकच वाढ झाली आहे. पाणी योजना राजकीय साठमारीत सापडल्याने शहरातील पाणी समस्या गंभीर बनली आहे, असे अशोक वाडेकर म्हणाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPoliticsराजकारण