शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे कोकण विभागात होणार ३ हजार ५४ पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 11:44 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे परिवहन महामंडळातर्फे कोकण विभागात होणार ३ हजार ५४ पदांची भरती रत्नागिरीकरिता तब्बल ४२९ पदे, महिलांसाठी १२८ जागा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.एस. टी. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी चालक कम वाहक पदभरती सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. चालक-वाहक पदांमध्ये ९०२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. ही भरती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण प्रदेशासाठी असणार आहे. येत्या काही वर्षात एस. टी. गाडीवर वाहक न नेमण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठीच महामंडळाकडून वाहकांची जबाबदारीही चालकांवरच दिली जाणार आहे.गतवर्षी महामंडळाने ७ हजार ९०० पेक्षा जास्त चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये पाच हजारपेक्षा कमी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहेत.

कागदपत्र तपासणी व अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वाहन चाचणीदेखील घेतली जाणार असून, त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून चालक कम वाहक हे पुढील वर्षात सेवेत हजर होण्याची शक्यता आहे.कोकण प्रदेशातील ३०५४ पदांच्या भरतीतील ९०२ पदे ही महिलांकरिता राखीव ठेवण्यात आली आहेत. या आधीच्या भरती प्रक्रियेत २४०० पदे राखीव होती. मात्र, केवळ ४४१ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, एकही महिला या पदासाठी पात्र ठरलेली नाही.

चालक पदासाठी अवजड वाहन वाहतुकीचा परवाना आवश्यक आहे. त्याशिवाय अवजड वाहतूक प्रमाणपत्रदेखील गरजेचे आहे. मात्र, या गोष्टींचा अभाव महिला उमेदवारांकडे असल्यामुळेच त्यांची निवड होऊ शकली नाही. आगामी भरतीत तरी चालक कम वाहक पदांसाठी महिला उमेदवारांची निवड होणार का?महिलांसाठी ९०२ जागा राखीवनूतन भरती ही कोकण प्रदेशासाठी आहे. मुंबईमध्ये ७०४, रायगडमध्ये ६९७, पालघरमध्ये ५२२, रत्नागिरीमध्ये ४२९, सिंधदुर्गमध्ये ४४२, ठाणे येथे २६० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात महिलांसाठी ९०२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत २१२, रायगडमध्ये २१०, पालघरमध्ये १५६, रत्नागिरीमध्ये १२८, सिंधुदुर्गमध्ये १३४, ठाणे येथे ६२ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी