शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळातर्फे कोकण विभागात होणार ३ हजार ५४ पदांची भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 11:44 IST

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे परिवहन महामंडळातर्फे कोकण विभागात होणार ३ हजार ५४ पदांची भरती रत्नागिरीकरिता तब्बल ४२९ पदे, महिलांसाठी १२८ जागा

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोकण विभागात तीन हजार ५४ पदांसाठी भरती होणार असून, रत्नागिरीकरिता ४२९ पदे भरली जाणार आहेत. त्यात महिलांसाठी १२८ जागा रिक्त ठेवण्यात आल्या आहेत.एस. टी. महामंडळाने तोटा भरून काढण्यासाठी चालक कम वाहक पदभरती सुरू केली आहे. त्यानुसार राज्यात भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. चालक-वाहक पदांमध्ये ९०२ पदे महिलांसाठी राखीव आहेत. ही भरती मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकण प्रदेशासाठी असणार आहे. येत्या काही वर्षात एस. टी. गाडीवर वाहक न नेमण्याचा निर्णय घेतला जाणार असून, त्यासाठीच महामंडळाकडून वाहकांची जबाबदारीही चालकांवरच दिली जाणार आहे.गतवर्षी महामंडळाने ७ हजार ९०० पेक्षा जास्त चालक-वाहक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली होती. यामध्ये पाच हजारपेक्षा कमी उमेदवारांची निवड झाली. त्यामुळे उर्वरित पदे पुन्हा भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करता येणार आहेत.

कागदपत्र तपासणी व अन्य प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सप्टेंबरमध्ये लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची वाहन चाचणीदेखील घेतली जाणार असून, त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना दोन महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून चालक कम वाहक हे पुढील वर्षात सेवेत हजर होण्याची शक्यता आहे.कोकण प्रदेशातील ३०५४ पदांच्या भरतीतील ९०२ पदे ही महिलांकरिता राखीव ठेवण्यात आली आहेत. या आधीच्या भरती प्रक्रियेत २४०० पदे राखीव होती. मात्र, केवळ ४४१ महिला उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, एकही महिला या पदासाठी पात्र ठरलेली नाही.

चालक पदासाठी अवजड वाहन वाहतुकीचा परवाना आवश्यक आहे. त्याशिवाय अवजड वाहतूक प्रमाणपत्रदेखील गरजेचे आहे. मात्र, या गोष्टींचा अभाव महिला उमेदवारांकडे असल्यामुळेच त्यांची निवड होऊ शकली नाही. आगामी भरतीत तरी चालक कम वाहक पदांसाठी महिला उमेदवारांची निवड होणार का?महिलांसाठी ९०२ जागा राखीवनूतन भरती ही कोकण प्रदेशासाठी आहे. मुंबईमध्ये ७०४, रायगडमध्ये ६९७, पालघरमध्ये ५२२, रत्नागिरीमध्ये ४२९, सिंधदुर्गमध्ये ४४२, ठाणे येथे २६० पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. यात महिलांसाठी ९०२ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुंबईत २१२, रायगडमध्ये २१०, पालघरमध्ये १५६, रत्नागिरीमध्ये १२८, सिंधुदुर्गमध्ये १३४, ठाणे येथे ६२ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती केली जाणार आहे.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRatnagiriरत्नागिरी