शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:17 IST

शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.

ठळक मुद्देचैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सवरत्नागिरी जिल्ह्यातील आगळा उत्सव,  भक्तिभावाने दीड महिना चालणारा उत्सव

रत्नागिरी : शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्यमंदिर आहे. शिमगोत्सवाला शंभरपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत. कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून, ते व्यापक झाले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी पूजेकरिता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात.

होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी ग्रामदेवतेला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात. त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते. होळी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. होळी पौर्णिमेच्या आधी सुरू झालेला हा शिमगोत्सव आजही सुरू असून १५ एप्रिलला सांगता होणार आहे.ढोकमळे, मुरूगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, लावगणवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजिरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते. हा उत्सव जवळपास दीड महिना सुरु असतो. जिल्ह्यातील एवढा दीर्घ काळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा.कार्यक्रमाची रेलचेलसुरूवातीला शिमगोत्सवाचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, आता त्याला व्यापकता आली आहे. प्रत्येक वाडीसाठी किमान दोन ते चार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून, १५ रोजी पालखी मंदिरात परतणार आहे. प्रत्येक वाडीत देवीचा मांड साजरा करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रमांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, नमन, नाटक आयोजित करण्यात येत आहे.विशिष्ठ धर्मापुरताच मर्यादित नाहीश्री आदित्यनाथ मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाने नक्कीच शतक पाहिले आहे. गावातील मुस्लिम बांधवदेखील दरवर्षी भक्तिभावाने होळीसाठी नारळ अर्पण करीत असतात, त्यामुळे हा सण केवळ विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित नाही. वाडीनिहाय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

दीड महिन्याचा शिमगोत्सव उत्साहाने व शांततेत साजरा केला जातो. भाविकांची उपस्थिती हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिमगोत्सवाची सांगता पालखी मंदिरात परतल्यानंतर रूपे काढून ठेवली जातात.- सुनील रेवाळे, सचिव,श्री आदित्यनाथ, देवी भगवती माता देवस्थान कमिटी, नेवरे. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRatnagiriरत्नागिरी