शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : चैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:17 IST

शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.

ठळक मुद्देचैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सवरत्नागिरी जिल्ह्यातील आगळा उत्सव,  भक्तिभावाने दीड महिना चालणारा उत्सव

रत्नागिरी : शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्यमंदिर आहे. शिमगोत्सवाला शंभरपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत. कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून, ते व्यापक झाले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी पूजेकरिता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात.

होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी ग्रामदेवतेला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात. त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते. होळी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. होळी पौर्णिमेच्या आधी सुरू झालेला हा शिमगोत्सव आजही सुरू असून १५ एप्रिलला सांगता होणार आहे.ढोकमळे, मुरूगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, लावगणवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजिरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते. हा उत्सव जवळपास दीड महिना सुरु असतो. जिल्ह्यातील एवढा दीर्घ काळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा.कार्यक्रमाची रेलचेलसुरूवातीला शिमगोत्सवाचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, आता त्याला व्यापकता आली आहे. प्रत्येक वाडीसाठी किमान दोन ते चार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून, १५ रोजी पालखी मंदिरात परतणार आहे. प्रत्येक वाडीत देवीचा मांड साजरा करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रमांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, नमन, नाटक आयोजित करण्यात येत आहे.विशिष्ठ धर्मापुरताच मर्यादित नाहीश्री आदित्यनाथ मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाने नक्कीच शतक पाहिले आहे. गावातील मुस्लिम बांधवदेखील दरवर्षी भक्तिभावाने होळीसाठी नारळ अर्पण करीत असतात, त्यामुळे हा सण केवळ विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित नाही. वाडीनिहाय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

दीड महिन्याचा शिमगोत्सव उत्साहाने व शांततेत साजरा केला जातो. भाविकांची उपस्थिती हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिमगोत्सवाची सांगता पालखी मंदिरात परतल्यानंतर रूपे काढून ठेवली जातात.- सुनील रेवाळे, सचिव,श्री आदित्यनाथ, देवी भगवती माता देवस्थान कमिटी, नेवरे. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRatnagiriरत्नागिरी