शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

रत्नागिरी : चैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 11:17 IST

शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.

ठळक मुद्देचैत्रीपर्यंत साजरा होतो नेवरे गावातील शिमगोत्सवरत्नागिरी जिल्ह्यातील आगळा उत्सव,  भक्तिभावाने दीड महिना चालणारा उत्सव

रत्नागिरी : शिमगोत्सव म्हटला की, महिनाभराचा उत्सव, मुंबईकरांसह स्थानिक ग्रामस्थही भक्तिभावाने हा उत्सव साजरा करतात. काही ठिकाणी जास्तीत जास्त हा उत्सव गुढीपाडव्यापर्यंत चालतो. मात्र, रत्नागिरी तालुक्यातील नेवरे गावचे ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचा शिमगोत्सव हा तब्बल दीड महिना चालतो. दीड महिना विविध कार्यक्रमांची रेलचेल आणि पालखी सोहळा असा हा उत्सव गावात सुरु असतो.ग्रामदैवत श्री आदित्यनाथाचे प्राचीन सूर्यमंदिर आहे. शिमगोत्सवाला शंभरपेक्षा अधिक वर्षे लोटली आहेत. कालपरत्वे उत्सवाचे रूपही पालटले असून, ते व्यापक झाले आहे. दीड महिन्याच्या कालावधीत बारा वाड्यांमधील ६४० घरांमध्ये पालखी पूजेकरिता येत असल्याने भाविक दर्शनाकरिता हमखास घरी येतात.

होळी पौर्णिमेच्या एक दिवस आधी ग्रामदेवतेला रूपे लावून पालखीत देव विराजमान होतात. त्यानंतर पालखी होळी तोडण्याच्या ठिकाणी नेली जाते. होळी उत्सव पारंपरिक पध्दतीने साजरा होतो. होळी पौर्णिमेच्या आधी सुरू झालेला हा शिमगोत्सव आजही सुरू असून १५ एप्रिलला सांगता होणार आहे.ढोकमळे, मुरूगवाडा, उंबरवाडी, देवपाटवाडी, लावगणवाडी, नवेदरवाडी, कुंभारवाडी, बाजारपेठ, गुरववाडी, चिंचवणे, पेडणेकरवाडी, काजिरभाटी, मोरेवाडी येथील घरोघरी जाऊन ग्रामदेवतेची पालखी पूजा स्वीकारते. हा उत्सव जवळपास दीड महिना सुरु असतो. जिल्ह्यातील एवढा दीर्घ काळ चालणारा हा एकमेव शिमगोत्सव असावा.कार्यक्रमाची रेलचेलसुरूवातीला शिमगोत्सवाचे स्वरूप मर्यादित होते. मात्र, आता त्याला व्यापकता आली आहे. प्रत्येक वाडीसाठी किमान दोन ते चार दिवस देण्यात आले आहेत. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत हा उत्सव चालणार असून, १५ रोजी पालखी मंदिरात परतणार आहे. प्रत्येक वाडीत देवीचा मांड साजरा करण्यात येत असल्यामुळे कार्यक्रमांसमवेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम, हळदी-कुंकू, नमन, नाटक आयोजित करण्यात येत आहे.विशिष्ठ धर्मापुरताच मर्यादित नाहीश्री आदित्यनाथ मंदिर प्राचीन आहे. त्यामुळे ग्रामदेवतेच्या शिमगोत्सवाने नक्कीच शतक पाहिले आहे. गावातील मुस्लिम बांधवदेखील दरवर्षी भक्तिभावाने होळीसाठी नारळ अर्पण करीत असतात, त्यामुळे हा सण केवळ विशिष्ट धर्मापुरताच मर्यादित नाही. वाडीनिहाय विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.

 

दीड महिन्याचा शिमगोत्सव उत्साहाने व शांततेत साजरा केला जातो. भाविकांची उपस्थिती हे शिमगोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिमगोत्सवाची सांगता पालखी मंदिरात परतल्यानंतर रूपे काढून ठेवली जातात.- सुनील रेवाळे, सचिव,श्री आदित्यनाथ, देवी भगवती माता देवस्थान कमिटी, नेवरे. 

टॅग्स :Indian Festivalsभारतीय सणRatnagiriरत्नागिरी