शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : शरद पवार यांचा नाणार दौरा अनिश्चित !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:44 IST

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १० मे रोजी नाणार दौरा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यानुसार अद्याप पवार यांच्या दौऱ्याची निश्चिती झालेली नाही. मात्र, त्यांचा हा दौरा झाल्यास नाणार प्रकल्पाबाबतचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.

ठळक मुद्देशरद पवार आडिवरेत येणार? प्रकल्पाविरोधात प्रकल्पविरोधी समितीतर्फे आंदोलन

रत्नागिरी / राजापूर : शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, कॉँग्रेसचे खासदार यांच्या नाणार दौऱ्यानंतर या प्रकल्पाबाबतचे वातावरण ढवळून निघाले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा १० मे रोजी नाणार दौरा होणार असल्याचे आधीच जाहीर झाले होते. त्यानुसार अद्याप पवार यांच्या दौऱ्याची निश्चिती झालेली नाही. मात्र, त्यांचा हा दौरा झाल्यास नाणार प्रकल्पाबाबतचे वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे.नाणार येथे १५ हजार हेक्टर क्षेत्रात होऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा मोठा विरोध आहे. गेल्या काही महिन्यांपासून या प्रकल्पाविरोधात प्रकल्पविरोधी समितीतर्फे आंदोलन सुरू आहे.

आंदोलनाचे नेते अशोक वालम हे शिवसेना, राष्ट्रवादी कॉँग्रेस, कॉँग्रेस तसेच मनसेच्या नेत्यांना भेटले. हा प्रकल्प होऊ नये, यासाठी या नेत्यांनी प्रयत्न करावेत, प्रकल्पाच्या विरोधात भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती.स्थानिकांच्या प्रखर विरोधामुळे नाणार प्रकल्पाची चर्चा देशभरात पोहोचली आहे. आंदोलकांची भूमिका समजावून घेतल्यानंतर शिवसेनेने नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध केला असून, सेनेचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द केल्याची घोषणाही सागवे येथील प्रकल्पविरोधकांच्या सभेत केली होती. मात्र, देसाई यांना अधिसूचना रद्द करण्याचा अधिकारच नाही, असे जाहीर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे व उद्योगमंत्री देसाई यांच्या विधानातील हवा काढून घेतली.

अद्याप या प्रकल्पावरून सेना व भाजपमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. मात्र, नाणार रिफायनरीबाबत संघर्ष समितीचे पदाधिकारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना भेटायला गेल्यानंतर पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला प्रकल्प राज्यातून बाहेर जाऊ नये, अशी आपली भूमिका आहे, असे ते म्हणाले होते.शरद पवार आडिवरेत येणार?त्यानंतर पवार हे १० मे रोजी नाणारला येतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र, ८ मेच्या सायंकाळपर्यंततरी पवार यांचा रत्नागिरी दौरा निश्चित झाला नव्हता. पवार हे रत्नागिरीत आले तरी काही कारणाने नाणारला जाणार नाहीत, तर आडिवरे येथे तावडे कुटुंंबीयांच्या वास्तू उद्घाटनासाठी येतील, अशी चर्चाही सुरू आहे.

पवार यांचा हा आडिवरे दौरा झालाच तर त्याचठिकाणी नाणार प्रकल्पविरोधक स्थानिकांशी त्यांचा प्रकल्पाबाबत संवाद होणार का, अशी चर्चा सुरू आहे.

स्थानिकांचा विरोध असेल तर त्या प्रकल्पासाठी पर्यायी जागेची चाचपणी करता येईल का, याबाबत केंद्र व राज्य सरकारशी चर्चा करण्याची तयारी आहे, असे पवार यांनी त्यावेळी स्पष्ट केले होते.मालगुंड - मराठवाडी येथील हॉटेल तारका रेसिडेन्सीच्या मागील बाजूला असलेल्या एका खोलीमध्ये एकूण ३८,००४ रुपयांचे गोवा बनावटीचे मद्य हस्तगत करून संशयित आरोपी संतोष वसंत साळवी याला अटक करण्यात आले आहे. या दोन्ही प्रकरणातील आरोपींवर मुंबई दारूबंदी कायदा १९४९चे कलम ६५ (ई) ९० अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRatnagiriरत्नागिरी