शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यासाठी शिंदे मुख्यमंत्री, आमच्यासाठी फडणवीसच सर्वस्व; गणेश नाईकांचे ठाण्यात सूचक वक्तव्य
2
पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा
3
सीईटीची साईट क्रॅश, प्रचंड मनस्ताप; नागपूरचे साैम्या दीक्षित व पार्थ असाटी यांना १०० टक्के
4
पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला 
5
काँग्रेसला इतक्या जागा कशा मिळाल्या? चौकशी व्हावी, राहुल गांधींवर रामदास आठवलेंचा पलटवार
6
'...अन्यथा मी राजकारण सोडेन', वायभासे कुटुंबियांचे सांत्वन करताना पंकजा मुंडेंना अश्रू अनावर
7
लोकसभेत बालेकिल्ले राखले, आता विधानसभेच्या तयारीला लागा; CM शिंदेंचे शिवसैनिकांना निर्देश
8
“NDA सरकार कोसळून इंडिया आघाडीचे सरकार येईल, प्रणिती शिंदे मंत्री होतील”; काँग्रेसचा दावा
9
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
10
निखळ सौंदर्य.. निरागस हास्य.. पिवळ्या फ्लोरल फ्रॉकमध्ये आलिया भटचा 'क्यूट' लूक (Photos)
11
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
12
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
13
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
14
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
15
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
16
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
17
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
18
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
19
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
20
तुम्ही प्रत्येकवेळी खेळाडूंना दोषी धरू शकत नाही, त्यांनी प्रयत्न केले...! माजी खेळाडूचा अजब दावा

रत्नागिरी : पतंजलीसाठी राज्यातील शाळा बंद करण्याचा डाव : ज्ञानेश्वर कानडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 5:44 PM

राज्य शासनाने पतंजली विद्यापीठाला मान्यता दिली असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात पाच हजार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीच्या शाळा चालण्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन पतंजली विद्यापीठासाठी शालेय शिक्षण विभागात चुकीचे निर्णय राबवत आहे का? राज्यातील शाळा बंद पाडण्याचा हा डाव तर नाही ना? असे अस्वस्थ करणारे प्रश्न महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी उपस्थित केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हा वार्षिक अधिवेशनामध्ये बोलत होते.

ठळक मुद्देपतंजलीसाठी राज्यातील शाळा बंद करण्याचा डाव : ज्ञानेश्वर कानडे रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या अधिवेशनात आरोप

रत्नागिरी : राज्य शासनाने पतंजली विद्यापीठाला मान्यता दिली असून, या विद्यापीठाच्या माध्यमातून राज्यात पाच हजार शाळा सुरु करण्यात येणार आहेत. पतंजलीच्या शाळा चालण्यासाठी राज्यातील अनुदानित शाळा बंद होणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य शासन पतंजली विद्यापीठासाठी शालेय शिक्षण विभागात चुकीचे निर्णय राबवत आहे का? राज्यातील शाळा बंद पाडण्याचा हा डाव तर नाही ना? असे अस्वस्थ करणारे प्रश्न महाराष्ट्र माध्यमिक अध्यापक संघाचे राज्याध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी उपस्थित केले. ते रत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या जिल्हा वार्षिक अधिवेशनामध्ये बोलत होते.दलवाई हायस्कूल, मिरजोळी (ता. चिपळूण) याठिकाणी आयोजित या जिल्हा अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष भारत घुले होते. मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे शालेय शिक्षण समिती अध्यक्ष खालिद दलवाई यांच्या हस्ते अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. स्वागताध्यक्ष रामचंद्र महाडिक यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले.

यावेळी टीडीएफचे ज्येष्ठ नेते सदाशिव चावरे, कोकण विभागाचे कार्यवाह अशोक आलमान, सहकार्यवाह लक्ष्मण पावसकर, जिल्हा कार्यवाह सागर पाटील, सर्व तालुकाध्यक्ष व सचिव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, पतपेढीचे सर्व माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक उपस्थित होते. यावेळी चिपळूण तालुक्यातील पदोन्नतीप्राप्त व विशेष गौरवप्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा कार्यवाह सागर पाटील यांनी केले.मनोगतात ज्ञानेश्वर कानडे यांनी राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधी पक्षात असताना शिक्षक संघटनांच्या मागण्या योग्य आहेत, सरकारने त्या मान्य करायलाच हव्यात. सरकार शिक्षण क्षेत्रावर अन्याय करत आहे, अशी ओरड करणारेच आता सत्तेत आल्यावर शिक्षण क्षेत्रावर अनेक अन्यायकारक निर्णय लादत आहेत, असे कानडे यांनी सांगितले.यावेळी सदाशिव चावरे, अशोक आलमान, लक्ष्मण पावसकर, संभाजी देवकाते, रामचंद्र महाडिक व पुरस्कर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. भारत घुले यांनी अध्यापक संघ शासनाच्या अन्यायकारक धोरणांविरोधातील लढा अधिक तीव्र करणार असल्याचे सांगितले. अधिवेशनानंतर कार्यकारी मंडळाची विशेष सभा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिपळूण तालुकाध्यक्ष रोहित जाधव, रमेश यादव यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSchoolशाळा