शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

रत्नागिरी : विकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 11:32 AM

विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.

ठळक मुद्देविकासाच्या दृष्टीकोनातून रिफायनरी प्रकल्प उपयुक्त, पानिपत सरंपचांची माहितीनाणार प्रकल्पग्रस्तांचा अभ्यास दौरा

राजापूर : आपल्या परिसराच्या सर्वांगिण विकासासह रोजगाराची साधने उपलब्ध करायची असतील तर रिफायनरी प्रकल्पाशिवाय पर्याय नाही हे पानिपत येथील रिफायनरीवरुन सिध्द झाले आहे. या प्रकल्पामुळे येथील गावांचा कायापालट झाला आहे. हा प्रकल्प सुरु होऊन वीस वर्षांचा कालावधी लोटत आला.

या दरम्यान कुठल्याच प्रकारचे धोके किंवा नुकसान झाल्याची एकही घटना याठिकाणी घडलेली नाही. त्यामुळे रिफायनरी प्रकल्पाबाबत अनाठायी भीती बाळगण्याचे काहीच कारण नाही. विकासाचा दृष्टीकोन नजरेपुढे ठेवून नाणार परिसरातील जनतेने तेथे होत असलेल्या रिफायनरी प्रकल्पाच्या उभारणीत मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन पानिपत (हरयाणा) रिफायनरी प्रकल्प परिसरातील आजी - माजी सरपंचानी याठिकाणी अभ्यास दौऱ्यावर आलेल्या नाणारमधील शेतकरी प्रकल्पग्रस्तांना केले.देशातील सर्वात मोठा पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार परिसरातील सुमारे चौदा गावांमध्ये होत आहे. मागील दोन वर्षांच्या कालखंडात या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेमध्ये विरोधाचे वातावरण आहे. या प्रकल्पावरुन स्थानिक जनतेत निर्माण झालेल्या शंका - कुशंकांचे निरसन करण्यासाठी व सत्यस्थिती पुढे यावी, यासाठी रत्नागिरी रिफायनरी पेट्रोकेमिकल कंपनीच्यावतीने हरयाणा राज्यातील पानिपत येथील रिफायनरी प्रकल्पाच्या दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणार परिसरातील काही शेतकरी, जमीनदार, बागायतदार आणि पत्रकार यांचा सामावेश होता.त्यांनी यावेळी पानिपत परिसरातील काही आजी - माजी सरपंचांशी संवाद साधला. त्यामध्ये खोराखेरीचे सरपंच रणजीतसिंग कश्यप, कुथन गावचे सरपंच बलवानसिंग, सिंथानाचे सरपंच सतपालसिंग, दादलानाचे सरपंच दीपक राणा, त्याच गावचे माजी सरपंच नैनपाल राणा, बाहोली गावचे माजी सरपंच सरदार सज्जनसिंग यांचा समावेश होता. यावेळी येथील अधिकाऱ्यांशीही नाणार परिसरातील ग्रामस्थांनी चर्चा केली. या चर्चेदरम्यान नाणार परिसरात येऊन तेथील जनतेशी रिफायनरी प्रकल्पाबाबत चर्चा करण्याची तयारी या अधिकाऱ्यांनी दर्शविली आहे.अनाठायी भीतीमागील अनेक वर्षे पानिपतचा हा संपूर्ण परिसर हिरवागार असाच राहिला आहे. या परिसरात पशुपक्षी मुक्तपणे वावरतात. झाडे आहेत, येथील पाणीही प्रदूषित झालेले नाही. त्यामुळे नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत खोटी माहिती पसरवून अनाठायी भीती निर्माण केली जात असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

टॅग्स :nanar refinery projectनाणार प्रकल्पRatnagiriरत्नागिरीsindhudurgसिंधुदुर्ग