शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

रत्नागिरी : भविष्य निर्वाह निधीऐवजी आर. डी., धक्कादायक प्रकार उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 16:28 IST

कंपनी कायद्यानुसार कामगार कंपनीत रुजू झाल्याच्या दिवसापासून त्या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी कापला जावा व तो सरकारी जमा करण्यात यावा, असा सक्त आदेश असतानाही येथील कृष्णा अ‍ॅण्टीआॅक्सिडेंट कंपनीत धक्कादायक प्रकार सुरु आहे. येथे भविष्यनिर्वाह निधीऐवजी चक्क आर. डी.ची योजना राबविली जात असल्याची माहिती समोर येत आहे.

ठळक मुद्देशासनाच्या निर्णयाची होतेय उघडउघड पायमल्ली साडेचार वर्षांपासून कार्यरत कामगार ठेकेदारी तत्वावरकेवळ सहा कर्मचारी कंपनीचे कायम कामगार

आवाशी : कंपनी कायद्यानुसार कामगार कंपनीत रुजू झाल्याच्या दिवसापासून त्या कामगाराचा भविष्य निर्वाह निधी कापला जावा व तो सरकारी जमा करण्यात यावा, असा सक्त आदेश असतानाही येथील कृष्णा अ‍ॅण्टीआॅक्सिडेंट कंपनीत धक्कादायक प्रकार सुरु आहे. येथे भविष्यनिर्वाह निधीऐवजी चक्क आर. डी.ची योजना राबविली जात असल्याची माहिती समोर येत आहे.लोटे - परशुराम (ता. खेड) औद्योगिक वसाहतीत मागील साडेचार वर्षापासून कार्यरत असणारी कृष्णा अ‍ॅण्टीआॅक्सिडेंट लिमिटेड ही कंपनी ज्वलनशील पदार्थांचे उत्पादन घेत आहे. कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार या कंपनीत तयार होणारे पी. पी. डी. क्रूड आॅईल, इमलसी ही दोन्ही उत्पादने ज्वलनशील आहेत.

यातील इमलसी फायर हे उत्पादन पेट्रोकेमिकल खाणीत टाकण्यासाठी वापरण्यात येते. यासाठी लूब आॅईल, मॅलिअ‍ॅनहायड्रेड, झायलीन, फॅटोअल्कोहोल असा जवळपास पाच प्रकारचा कच्चा माल वापरला जातो.

मानवी जीविताला धोका असणाऱ्या किंबहुना परिसराला धोका असणाऱ्या या कंपनीत गेल्या साडेचार वर्षांपासून कार्यरत कामगार हे ठेकेदारी तत्वावर काम करीत आहेत. या कामगारांना किमान वेतनही कंपनीकडून दिले जात नसल्याचे समजते.जवळपास साठ कर्मचारी असणाऱ्या या कंपनीत केवळ सहा कर्मचारी कंपनीचे कायम कामगार आहेत तर उर्वरित सर्व कर्मचारी हे ठेकेदारी पद्धतीवर काम करीत आहेत. एकूण पाच ठेकेदारी एजन्सीज येथे कार्यरत आहेत.

दिनांक १४ रोजी कंपनीत पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याच्या कारणाने व व्यवस्थापनाने यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवत कामगारांनी कामबंद आंदोलन छेडले होते. त्यातच ठेकेदाराने कामगारांना केलेली शिवीगाळ हे या आंदोलनाचे मुख्य कारण होते.कामगार पुरवणे, त्यांचा पगार वेळेवर देणे, त्यांना बोनस देणे हेच ठेकेदाराचे काम असते. मात्र, कंपनी आवारात गेल्यावर कामगाराची सुरक्षा, त्याला पाणी वा इतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे हे काम कंपनी व्यवस्थापनाचे आहे. मात्र, असे असतानाही येथील व्यवस्थापन विभागाचे संदेश पवार हे कामगारांच्या सोयीसुविधांबाबत ठेकेदारांकडे तक्रार करतात. यामुळे कामगार व ठेकेदार यांच्यात वाद निर्माण होतात. यातूनच परवाचे कामबंद आंदोलन झाले. या कंपनीच्या व्यवस्थापनाने मागील साडेचार वर्षे या कामगारांना भविष्य निर्वाह निधीपासून वंचित ठेवले आहे.

व्यवस्थापनाने नामी शक्कल लढवत भविष्य निर्वाह निधीऐवजी खासगी पतसंस्थेत कामगारांची आर. डी. सुरु केली. भविष्य निर्वाह निधीऐवजी आर. डी.ची योजना कामगारांच्या गळी मारणे हे कंपनी नियमाला अनुसरुन आहे का? या कामगारांच्या प्रश्नाचे उत्तरही संदेश पवार यांनी नाही असेच दिले. मग साडेचार वर्षे या कामगारांवर व्यवस्थापनाने केलेल्या अन्यायाला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याचबरोबर किमान वेतन नाही, पगारी रजा नाही, अधिक तास काम केल्यास दुप्पट पगार नाही. या सर्व गोष्टी कामगार आयुक्तांच्या नजरला का येत नाहीत? असा सवाल उपस्थित होत आहे.हक्कापासून वंचितकृष्णातील कामगारांची व्यवस्थापनाकडून पिळवणूक सुरु असून, त्यांच्या हक्कांपासून त्यांना वंचित ठेवले जात आहे. विशेष म्हणजे हे सर्व कामगार अस्थायी स्वरुपाचे असल्याने त्यांची दखल घेणारे कुणीही नाही. मात्र, पर्यावरण मंत्र्यांच्या तालुक्यात, माजी कामगार मंत्र्यांच्या व विद्यमान आमदारांच्या मतदारसंघात असे प्रकार सुरु असतील तर न्यायाची अपेक्षा करावी ती कुणाकडून, असा प्रश्न कामगारांसमोर उभा आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीProvident Fundभविष्य निर्वाह निधी