शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

रत्नागिरी : प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची सुरक्षा रामभरोसे, शिक्षकच नेतात दुचाकीवरून गठ्ठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 13:02 IST

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे.

ठळक मुद्देप्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांची सुरक्षा रामभरोसेपोलीस संरक्षण नाहीच शिक्षकच घेऊन जातात दुचाकीवरून गठ्ठे

सागर पाटीलटेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या राज्यात दहावी व बारावीच्या परीक्षा घेतल्या जात आहेत. या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोपनीयता पाळण्याचा प्रयत्न राज्य मंडळाकडून केला जात आहे. परंतु प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतूक व्यवस्थेबाबत मोठ्या प्रमाणात असुरक्षितता आहे.

सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणारे शिक्षक अक्षरश: जीव धोक्यात घालून ही वाहतूक करतात. पोलीस यंत्रणेकडून या प्रक्रियेवर आक्षेप घेतला जात आहे. परंतु, शासनस्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून हेच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेची वाहतूक सुरक्षा राम भरोसेच असल्याचे दिसत आहे.राज्यातील विभागीय शिक्षण मंडळांतर्गत कार्यान्वित असणाऱ्या परीरक्षक कार्यालयााला प्रश्नपत्रिकेचे वितरण व उत्तरपत्रिकेचे संकलन परिस्थितीचे गांभीर्य पटते. परंतु शासन स्तरावरुन कोणताही निर्णय घेतला जात नसल्याने त्यांच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. ही समस्या शासन स्तरावरुन सोडवणे आवश्यक असल्याने शासन निर्णयाची वाट पाहण्याचे काम मंडळ स्तरावरुन केले जात आहे.प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मंडळ स्तरावरुन एका मार्गावरील केंद्रासाठी प्रत्येकी एक सुरक्षित वाहन उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. मंडळ नियमावलीनुसार ही वाहतूक एस. टी. बसमधून होणे आवश्यक आहे. परंतु वेळ व एस. टी.ची वाहतूक व्यवस्था पाहता सर्वच केंद्रांना ही बाब लागू पडत नाही.

या वाहतूक व्यवस्थेबाबत कोकण विभागीय मंडळांतर्गत काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. परंतु, याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य मंडळ व शासनाला असल्याचे विभागीय मंडळातून सांगण्यात येते. परीक्षेदरम्यान गोपनीयतेला प्राधान्य देणाऱ्या राज्य मंडळाने या वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.मोटारसायकलवरून वाहतूकरत्नागिरी जिल्हा माध्यमिक अध्यापक संघाच्या माध्यमातून राज्य मंडळाकडून प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकेच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र गाडी उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सहाय्यक परीरक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांच्या सुरक्षिततेचा विचार करता मोटरसायकलवरुन पेपरची वाहतूक करणे पूर्णत: चुकीचे असल्याचे मत रत्नागिरी जिल्हाध्यक्ष भारत घुले यांनी व्यक्त केले.

याबाबत अध्यापक संघाच्यावतीने राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांच्याशी चर्चा करण्यात आली असून, याबाबत शक्य तितक्या लवकर निर्णय घेतला जाईल, असे डॉ. काळे यांनी सांगितल्याचे घुले म्हणाले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीexamपरीक्षाTeacherशिक्षक