शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:42 IST

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षरत्नागिरीत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग

रत्नागिरी : जो देतो तो देव म्हणून गुरू, सद्गुरू हा देव इतकेच नव्हे तर राष्ट्र, विश्वात्म हा देव आहे. त्यामुळे जगणं हे विश्वावर, निसर्गावर, संपूर्ण ब्रह्मांडावर अवलंबून असले पाहिजे. सर्वांप्रती कृतज्ञतादेखील महत्त्वाची आहे. जीवन जगताना समाधान, कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर प्रयत्नाचा पूल बांधला पाहिजे. म्हणून मनाचे सामर्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे, त्याची चांगली मशागत करून चांगले विचार केले पाहिजेत. सर्वांसाठी मागतो तो सर्वात मोठा विचार, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.प्रत्येक व्यक्तीबरोबर मन असतं. मात्र, त्याला पार्टनर करून घ्यावं अथवा न घ्यावं हे ज्याने-त्याने ठरवायचं असतं. यश अथवा अपयशाचे कारण मन आहे. मनाच्या सामर्थ्याचा वापर करून यश मिळवले जाते. काहीवेळा माहीत नसल्याने नकळत नशीब बिघडवले जाते. मनाला कंट्रोल करणे शिकले पाहिजे.

मानवी मन एका बाजूने ईश्वराकडे तर दुसऱ्या बाजूने शरीरामार्फत जगाशी जोडले गेले आहे. मनाची ताकद ही ईश्वराकडून येते. ईश्वर म्हणजेच अखंड ऊर्जा आहे. तिला आत्मशक्ती किंवा चैतन्यशक्ती म्हणून संबोधले जाते. विश्वनिर्मितीचे सामर्थ्य ईश्वराकडे आहे. मनाचे पाच प्रकार असले तरी अंतर्मन व बहिर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत व त्यांची कार्यपध्दती वेगळी असल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले.यश हा एक प्रवास आहे. प्रत्येक पातळीवरचे यश वेगवेगळे आहे. ते मिळवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विचार अंतर्मनाला पटणारे पाहिजेत. यश मिळते तेव्हाच अंतर्मनावरील विश्वास वाढवला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. शिवाय आत्मविश्वासही गरजेचा आहे. उद्दिष्ट साध्य करण्याची सवय होते, तेव्हा आत्मविश्वास नक्की वाढतो. त्यामुळे जेवढे कृतज्ञ तेवढे समाधान मिळेल.

यश मिळाल्यावर खाली, वर न पाहता समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यक्ती जेवढी समाधानी, कृतज्ञ तेवढे बळ अधिक प्राप्त होते. कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर पुढील पायरी चढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

प्रामाणिक राष्ट्रभक्ती न सोडता, विधायक महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने समोरच्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. भलं म्हणणंदेखील भावना आहे. दुसऱ्याच्या द्वेषात स्वत:चे नुकसान करण्यापेक्षा आदर केला तरच सुखप्राप्ती होईल. शिवाय देण्याची कृतीदेखील महत्त्वाची आहे, असेही प्रल्हाद पै म्हणाले.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते रत्नागिरीवासियांतर्फे प्रल्हाद पै यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उद्योजक नाना भिडे, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक उपस्थित होते. मानपत्र वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी