शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:42 IST

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षरत्नागिरीत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग

रत्नागिरी : जो देतो तो देव म्हणून गुरू, सद्गुरू हा देव इतकेच नव्हे तर राष्ट्र, विश्वात्म हा देव आहे. त्यामुळे जगणं हे विश्वावर, निसर्गावर, संपूर्ण ब्रह्मांडावर अवलंबून असले पाहिजे. सर्वांप्रती कृतज्ञतादेखील महत्त्वाची आहे. जीवन जगताना समाधान, कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर प्रयत्नाचा पूल बांधला पाहिजे. म्हणून मनाचे सामर्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे, त्याची चांगली मशागत करून चांगले विचार केले पाहिजेत. सर्वांसाठी मागतो तो सर्वात मोठा विचार, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.प्रत्येक व्यक्तीबरोबर मन असतं. मात्र, त्याला पार्टनर करून घ्यावं अथवा न घ्यावं हे ज्याने-त्याने ठरवायचं असतं. यश अथवा अपयशाचे कारण मन आहे. मनाच्या सामर्थ्याचा वापर करून यश मिळवले जाते. काहीवेळा माहीत नसल्याने नकळत नशीब बिघडवले जाते. मनाला कंट्रोल करणे शिकले पाहिजे.

मानवी मन एका बाजूने ईश्वराकडे तर दुसऱ्या बाजूने शरीरामार्फत जगाशी जोडले गेले आहे. मनाची ताकद ही ईश्वराकडून येते. ईश्वर म्हणजेच अखंड ऊर्जा आहे. तिला आत्मशक्ती किंवा चैतन्यशक्ती म्हणून संबोधले जाते. विश्वनिर्मितीचे सामर्थ्य ईश्वराकडे आहे. मनाचे पाच प्रकार असले तरी अंतर्मन व बहिर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत व त्यांची कार्यपध्दती वेगळी असल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले.यश हा एक प्रवास आहे. प्रत्येक पातळीवरचे यश वेगवेगळे आहे. ते मिळवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विचार अंतर्मनाला पटणारे पाहिजेत. यश मिळते तेव्हाच अंतर्मनावरील विश्वास वाढवला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. शिवाय आत्मविश्वासही गरजेचा आहे. उद्दिष्ट साध्य करण्याची सवय होते, तेव्हा आत्मविश्वास नक्की वाढतो. त्यामुळे जेवढे कृतज्ञ तेवढे समाधान मिळेल.

यश मिळाल्यावर खाली, वर न पाहता समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यक्ती जेवढी समाधानी, कृतज्ञ तेवढे बळ अधिक प्राप्त होते. कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर पुढील पायरी चढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

प्रामाणिक राष्ट्रभक्ती न सोडता, विधायक महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने समोरच्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. भलं म्हणणंदेखील भावना आहे. दुसऱ्याच्या द्वेषात स्वत:चे नुकसान करण्यापेक्षा आदर केला तरच सुखप्राप्ती होईल. शिवाय देण्याची कृतीदेखील महत्त्वाची आहे, असेही प्रल्हाद पै म्हणाले.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते रत्नागिरीवासियांतर्फे प्रल्हाद पै यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उद्योजक नाना भिडे, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक उपस्थित होते. मानपत्र वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी