शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
2
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
5
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
6
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
7
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
8
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
9
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
10
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
11
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
12
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
13
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
14
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
15
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
16
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
17
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
18
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
19
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
20
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त

रत्नागिरी :  मनाचे सामर्थ्य महत्त्वाचे, त्याची मशागत केली पाहिजे : प्रल्हाद पै

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 17:42 IST

जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.

ठळक मुद्देजीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षरत्नागिरीत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग

रत्नागिरी : जो देतो तो देव म्हणून गुरू, सद्गुरू हा देव इतकेच नव्हे तर राष्ट्र, विश्वात्म हा देव आहे. त्यामुळे जगणं हे विश्वावर, निसर्गावर, संपूर्ण ब्रह्मांडावर अवलंबून असले पाहिजे. सर्वांप्रती कृतज्ञतादेखील महत्त्वाची आहे. जीवन जगताना समाधान, कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर प्रयत्नाचा पूल बांधला पाहिजे. म्हणून मनाचे सामर्थ्य सर्वात महत्त्वाचे आहे, त्याची चांगली मशागत करून चांगले विचार केले पाहिजेत. सर्वांसाठी मागतो तो सर्वात मोठा विचार, असे प्रतिपादन जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांनी केले.जीवनविद्या मिशन आयोजित हीरक महोत्सव वर्षांतर्गत लाईफ मॅनेजमेंट मालिकेचा २३ वा भाग रत्नागिरीतील सावरकर नाट्यगृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रल्हाद पै यांनी पार्टनरशीप मनाची, गॅरंटी यशाची विषयावर मार्गदर्शन केले.प्रत्येक व्यक्तीबरोबर मन असतं. मात्र, त्याला पार्टनर करून घ्यावं अथवा न घ्यावं हे ज्याने-त्याने ठरवायचं असतं. यश अथवा अपयशाचे कारण मन आहे. मनाच्या सामर्थ्याचा वापर करून यश मिळवले जाते. काहीवेळा माहीत नसल्याने नकळत नशीब बिघडवले जाते. मनाला कंट्रोल करणे शिकले पाहिजे.

मानवी मन एका बाजूने ईश्वराकडे तर दुसऱ्या बाजूने शरीरामार्फत जगाशी जोडले गेले आहे. मनाची ताकद ही ईश्वराकडून येते. ईश्वर म्हणजेच अखंड ऊर्जा आहे. तिला आत्मशक्ती किंवा चैतन्यशक्ती म्हणून संबोधले जाते. विश्वनिर्मितीचे सामर्थ्य ईश्वराकडे आहे. मनाचे पाच प्रकार असले तरी अंतर्मन व बहिर्मन हे एकाच मनाचे दोन भाग आहेत व त्यांची कार्यपध्दती वेगळी असल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले.यश हा एक प्रवास आहे. प्रत्येक पातळीवरचे यश वेगवेगळे आहे. ते मिळवण्यासाठी काळजी घेतली पाहिजे. विचार अंतर्मनाला पटणारे पाहिजेत. यश मिळते तेव्हाच अंतर्मनावरील विश्वास वाढवला पाहिजे. कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे. शिवाय आत्मविश्वासही गरजेचा आहे. उद्दिष्ट साध्य करण्याची सवय होते, तेव्हा आत्मविश्वास नक्की वाढतो. त्यामुळे जेवढे कृतज्ञ तेवढे समाधान मिळेल.

यश मिळाल्यावर खाली, वर न पाहता समाधानी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. प्रत्येकाने महत्त्वाकांक्षी असणे आवश्यक आहे. यश मिळवण्यासाठी आणखी प्रयत्न करणे गरजेचे आहे. व्यक्ती जेवढी समाधानी, कृतज्ञ तेवढे बळ अधिक प्राप्त होते. कृतज्ञतेच्या अधिष्ठानावर पुढील पायरी चढण्याची तयारी ठेवली पाहिजे.

प्रामाणिक राष्ट्रभक्ती न सोडता, विधायक महत्त्वाकांक्षा असणे आवश्यक आहे. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने समोरच्या व्यक्तीबाबत कृतज्ञता व्यक्त करणे गरजेचे आहे. भलं म्हणणंदेखील भावना आहे. दुसऱ्याच्या द्वेषात स्वत:चे नुकसान करण्यापेक्षा आदर केला तरच सुखप्राप्ती होईल. शिवाय देण्याची कृतीदेखील महत्त्वाची आहे, असेही प्रल्हाद पै म्हणाले.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्या हस्ते रत्नागिरीवासियांतर्फे प्रल्हाद पै यांचा मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित घोरपडे, उद्योजक नाना भिडे, सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक उपस्थित होते. मानपत्र वाचन व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा पवार यांनी केले.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी