शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
2
जगातील ५० इस्लामिक देश एकटवणार; पहिल्यांदाच 'असं' काही घडणार, अमेरिकेची चिंता वाढली
3
Video: "इरफान... प्रामाणिक राहा..."; IND vs PAK सामन्यानंतर गौतम गंभीर कॅमेऱ्यासमोर असं का बोलला?
4
अनंत अंबानी यांच्या वनताराला क्लीनचिट; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?
5
हवाई दलात इंजिनिअर लोकेश बहिणीच्या घरी आला आणि अचानक २४व्या मजल्यावरून मारली उडी
6
सत्तापालटाच्या अवघ्या ३ दिवसांत नेपाळच्या Gen Z आंदोलकांमध्ये असंतोष; सुशीला कार्कींच्या घराबाहेर निदर्शने!
7
पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सूर्यकुमार यादवचं पत्नीसोबत जंगी सेलिब्रेशन, पाहा खास फोटो
8
Astro Tips: घर, प्लॉट विक्रीसाठी सगळे उपाय करून पाहिले? तरी निराशा? करा 'हा' प्रभावी तोडगा!
9
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
10
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
11
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
12
घाव भर गया है! परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'वर भाष्य, दिग्दर्शकासोबतचं नातं बिघडलं? म्हणाले...
13
४०% पार्ट्स होणार स्वस्त! सर्व्हिसिंगच्या बिलातही दिलासा; GST कपातीनंतर सोपा होणार कार-बाईकचा मेंटेनन्स
14
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
15
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
16
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
17
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
18
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
19
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
20
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...

रत्नागिरी : महामार्गाच्या कामामुळे पाईपचे नुकसान, कोंड्ये धरणातून लवकरच पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 11:39 IST

राजापूर तालुक्यातील कोंड्ये येथील धरणाच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजापूरतर्फे केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. सोमवार दि. १७ डिसेंबरपासून नवीन पाईपलाईन टाकून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देमहामार्गाच्या कामामुळे राजापूर पाईपचे नुकसान स्वाभिमानच्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवरकोंड्ये धरणातून पाणीपुरवठा

राजापूर : तालुक्यातील कोंड्ये येथील धरणाच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष राजापूरतर्फे केसीसी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. सोमवार दि. १७ डिसेंबरपासून नवीन पाईपलाईन टाकून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरू करणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.कोंडये येथे उन्हाळी शेतीसाठी तसेच इतर वापरासाठी कोंडये येथील लघु पाटबंधारे विभागामार्फत बांधण्यात आलेल्या धरणातून दरवर्षी ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. या पाण्यावर ग्रामस्थ उन्हाळी शेती करतात. तसेच गावात धरणाचे पाणी आल्यावर गावातील विहिरींची पाणी पातळी देखील व्यवस्थित राहते. परंतु यावर्षी मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

गावात पाणीपुरवठा करणारी महामार्गानजीकची लोखंडी मुख्य जलवाहिनी महामार्गाचे काम करणाऱ्या केसीसी कंपनीने ग्रामस्थांचा विचार न घेता काढून टाकली. यामुळे यंदा कोंडये येथील ग्रामस्थाना पाणीपुरवठा बंद झाला. धरणाचे गावात पाणी येत नसल्याने यावर्षी उन्हाळी शेती झाली नाही तसेच पाणी येत नसल्याने गावातील विहिरींची पाणीपातळी देखील घटली आहे.

यामुळे कोंडये ग्रामस्थांसमोर पाणीसंकट उभे राहिले आहे. येथील ग्रामपंचयातीमार्फत या कंपनीला याबाबत सूचना देण्यात आली होती. परंतु त्याकडे देखील केसीसी कंपनी दुर्लक्ष्य करून अद्याप कोणतेही पाऊल उचलले नव्हते.अखेर कोंडये येथील स्वाभिमान पक्षाचे संतोष धूरत, प्रशांत मोंडकर यांनी याची माहिती महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे राजापूर तालुका अध्यक्ष हनिफ काझी यांना दिली आणि कोंडये गावावरील पाणीसंकट सोडवण्याची मागणी केली.याची दखल घेऊन स्वाभिमानचे तालुका अध्यक्ष हनिफ काझी, रत्नागिरी जिल्हा सचिव दीपक बेंद्रे, विलास पेडणेकर यांनी हातीवले येथील केसीसी कंपनीच्या कार्यालयात स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांना घेऊन भेट दिली. या संदर्भात येथील प्रोजेक्ट मॅनेजर शर्मा, अधिकारी पांडे, सरवण यांना जाब विचारला.

यावेळी या अधिकाऱ्यांनी सोमवार दि.१७ डिसेंबर २०१८ पासून नवीन जलवाहिनीचे काम सुरू करणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या जलवाहिणीचे काम व्यवस्थितरीत्या व चांगल्या प्रतीचे करणार असून त्यासाठी चेन्नईहून पाईप मागविल्याचे सांगितले. यावेळी कोंडये येथील स्वाभिमान पक्षाचे संतोष धुरत, प्रशांत मोंडकर, प्रितम धुरत, संकेत खोडे, हर्षद शिंदे, आदित्य देसाई उपस्थित होते.सोमवारपासून नवीन जलवाहिणीचे काम सुरु न झाल्यास मंगळवारपासून महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा यावेळी तालुका अध्यक्ष हनिफ काझी, जिल्हा सचिव दीपक बेंद्रे आणि विलास पेडणेकर यांनी दिला.

यावेळी कोंडये येथे महामार्गावरील नवीन पुलाजवळ गतिरोधकाची मागणी स्वाभिमान संघटनेच्या संतोष धूरत आणि प्रशांत मोंडकर या कायकर्त्यांनी केली. यावेळी अधिकाºयांनी त्वरित गतिरोधक टाकण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Rajapur Nagar Parishadराजापूर नगर परिषदWaterपाणीRatnagiriरत्नागिरी