शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

रत्नागिरी : पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणार, हंगाम वाया गेल्याचे मत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 16:30 IST

सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे.

ठळक मुद्दे पर्ससीन मासेमारी ३१ डिसेंबरला थांबणारनैसर्गिक आपत्तींमुळे हंगाम वाया गेल्याचे मत

रत्नागिरी : सागरातील पर्ससीन मासेमारीचा हंगाम येत्या सहा दिवसानंतर संपणार आहे. शासनाच्या आदेशानुसार पर्ससीन मासेमारीला केवळ ४ महिनेच परवानगी देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०१८ रोजी सुरू झालेली ही मासेमारी आता ३१ डिसेंबर २०१८ रोजी बंद होणार आहे.राज्याच्या १२ नॉटीकल मैलाच्या सागरी जलधी क्षेत्रात ही बंदी असली तरी त्याबाहेरच्या खोल समुद्रात मासेमारी करण्यावरही शासनाने निर्बंध आणले आहेत. त्यामुळे पर्ससीन मच्छीमारी नौकांना पारंपरिक पध्दतीने मासेमारी करणे किवा मासेमारी बंद ठेवणे हे दोनच पर्याय उपलब्ध राहणार आहेत.सागरी मासेमारी अधिनियम १९८१ अतंर्गत ०२ फेब्रुवारी २०१६ रोजी शासनाने अधिसूचना जारी केली. त्यानुसार पर्ससीन, रिंगसिंग (मिनी पर्ससीन) जाळयाने मासेमारी करण्यास केवळ सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात परवानगी देण्यात आली आहे.

१ जानेवारी ते ३१ आॅगस्टपर्यंत पर्ससीन, मिनी पर्ससीन सागरी मासेमारीला बंदी घालण्यात आली आहे. मात्र ही बंदी १२ नॉटीकल मैलांच्या आत होती. त्या बाहेरील विशाल सागरी क्षेत्रात पर्ससीन नौका मासेमारी करीत होत्या. त्यासाठी शासनाने काही अटी घालून दिल्या होत्या.आता विशाल सागरी क्षेत्रातही म्हणजेच १२ नॉटीकल मैलांच्या बाहेरील सागरी क्षेत्रात १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट या कालावधीत पर्ससीन व मिनी पर्ससीन मासेमारीला पूर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्या नौकांवर कायदेशीर कारवाई होणार आहे. मात्र १२ नॉटिकल मैलांच्या सागरी क्षेत्रात पारंपरिक पध्दतीने मासेमारी सुरू राहणार आहे. राज्य सरकारने ही बंदी घातली असली तरी अन्य राज्यांमध्ये असा नियम नाही.

त्यामुळे जिल्ह्याच्या सागरी क्षेत्रातील खोल समुद्रात परराज्यातील नौका घूसखोरी करणार असल्याचे जिल्ह्यातील मच्छीमारांचे मत असून ही घूसखोरी कशी रोखणार, असा सवालही केला जात आहे.खोल सागरी क्षेत्रात होत असलेल्या मासेमारीमुळे मत्स्योत्पादनात मोठी वाढ होते. मात्र त्यामध्ये छोटे मासेही मारले जातात व मत्स्यपैदास कमी होते, असा आक्षेप घेण्यात आल्यानंतर पर्ससीन मासेमारीवर निर्बंध घालण्यात आले.रत्नागिरी जिल्ह्यात शासनाच्या आदेशानुसार १ आॅगस्टपासून पारंपरिक मासेमारीला सुरूवात झाली. त्यानंतर महिन्याने म्हणजेच १ सप्टेंबरपासून पर्ससीन मासेमारी सुरू झाली. परंतु गेल्या पाच महिन्यांच्या काळात सागरी वातावरणात सातत्याने चढ उतार राहिल्याने व काही महिने पावसाळी व वादळी राहिल्याने मासेमारीच्या या पाच महिन्यांमधील निम्मा कालावधी वाया गेला आहे.

या कालावधीत मासेमारी होऊ शकली नाही. मात्र नौकेवरील खलाशांना त्यांचे वेतन द्यावे लागत होते. निम्म्या कालावधीतही मत्स्योत्पादन पुरेसे झालेले नाही. त्यामुळे यावर्षी मासेमारी व्यवसायातील आर्थिक उलाढाल कमी झाली आहे.नैसर्गिक संकटे नेहमीचीच१ आॅगस्ट व १ सप्टेंबरपासून सागरी मासेमारी सुरू होत असली तरी प्रत्यक्षात या कालावधीत वादळी हवामानच अधिक असते. त्यामुळे जीवावर उदार होऊन मासेमारीसाठी सागरात जाणे मच्छीमार टाळतात.

पर्ससीन मासेमारीला आधीच कमी कालावधी दिला आहे. नैसर्गिक संकटांमुळे किमान दोन महिन्यांचा कालावधी वाया जातो. त्यामुळे १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबरपर्यत पर्ससीन मासेमारीला दिलेली मुदत फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढवून देण्याची मागणी पर्ससीन मच्छीमारांमधून केली जात आहे. परंतु त्याचा अद्यापही विचार शासनस्तरावर झालेला नाही.

टॅग्स :fishermanमच्छीमारRatnagiriरत्नागिरी