शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

रत्नागिरी : बाळासाहेबांच्या नावावर शिवसेना निवडणूक जिंकते : निलेश राणे यांचा टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2018 5:13 PM

शिवसेना संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करून वैयक्तीक हिमतीवर यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिले आहे.

ठळक मुद्देबाळासाहेबांच्या नावावर शिवसेना निवडणूक जिंकते : निलेश राणे यांचा टोलाजनतेच्या प्रश्नांशी सेनेला देणेघेणे नाही

राजापूर : शिवसेना आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर आणि भावनिक राजकारण करून निवडणूका जिंकतात. जनेतच्या प्रश्नांचे आणि समस्यांचे त्यांना काहीचं देणं घेणं नाही. शिवसेना संघटना आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव बाजूला करून वैयक्तीक हिमतीवर यांनी निवडून येऊन दाखवावे, असे आव्हान महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे सरचिटणीस खासदार निलेश राणे यांनी दिले आहे.रत्नागिरी येथे महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाच्या सभासद नोंदणीचा शुभारंभ झाला. यानंतर  निलेश राणे साखरीनाटे व नाटे दौऱ्यावर आले होते. साखरीनाटे येथील आपदग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केल्यानंतर नाटे येथे नाटे नगर विद्यामंदिर येथे या विभागातील महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र  स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन माजळकर, जिल्हा सरचिटणीस मुन्ना खामकर, नाटेचे माजी सरपंच रामकृष्ण धाक्रस, तालुका अध्यक्ष दीपक बेंद्रे, राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी, माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर, समिर खानविलकर, वसंत पाटील, शरद घरकर संदीप बांदकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी राणे यांनी तुमच्या लगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणवली-वैभवावडी-देवगड विधानसभा मतदार संघातील आमदार नितेश राणे हे जर का आपल्या मतदारसंघात विकास करू शकतात, तर मग तुमचे आमदार राजन साळवी मागे का? नितेश राणे यांनी पर्यटन, रोजगार, वॉटरस्पोर्ट, फिरते सिनेमागृह, म्युझियम यांसारखी विकासाची कामे करून मतदार संघात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजन साळवींना मात्र मतदार संघातील सर्वसामान्य जनतेची कामे करण्यासाठी वेळ नाही. केवळ ठेकेदारी आणि टक्केवारी यातच त्यांचे लक्ष असल्याचा आरोपही राणे यांनी केला.खासदार म्हणून आपण ज्यांना निवडून दिले त्या विनायक राऊत यांना लोकसभेत धड बोलताही येत नाही अशी अवस्था आहे. लोकसभेत बोलताना गारा पडा, झपरा नही यासारखे शब्दप्रयोग करून मतदार संघाच्या अब्रुची लक्तरे ते वेशीवर टांगत आहेत.

विकासाचे यांना काहीचं देणं घेणं नाही, बाळासाहेबांच्या नावाचा वापर करून आणि भावनिक राजकारण करून हे निवडून येतात आणि आपण त्यांना निवडून देतो. याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. आमदार राजन साळवींनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प १०० दिवसात रद्द करू अशी ग्वाही दिली होती, त्याचे काय झाले. प्रकल्प रद्द झाला काय? या प्रकल्पाबाबत आमच्या विरोधात राजकारण करून स्वत:चा राजकिय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शिवसेनने केल्याचे त्यांनी सांगितले.नाणार प्रकल्प हा केंद्र शासनाने आणला ना? मग दिल्लीत खासदार म्हणून विनायक राऊत काय झोपा काढत होते काय? असा खडा सवाल राणे यांनी उपस्थित केला. नाणार होऊ देणार नाही हा आमचा शब्द आहे आणि तो आम्ही पूर्ण करणारच. पण केंद्रात आणि राज्यात सत्तेत सहभागी तुम्ही, उद्योगमंत्री तुमचे, पर्यावरण मंत्री तुमचे, पालकमंत्री तुमचे आणि तरीही नाणार प्रकल्प आला कसा याचे जनतेला उत्तर द्या. उगीच मतांसाठी प्रकल्पाचे राजकारण करू नका असा घणाघातही राणे यांनी केला. प्रास्ताविक व सुत्रसंचालन तालुका अध्यक्ष दीपक बें्रेद्रे यांनी केले.राजन साळवींनी काय केले?आमदार राजन साळवींनी आपल्या आमदारच्या दोन टर्म मध्ये आणि खासदार विनायक राऊत याने खासदारकीच्या साडेचार वर्षात किती विकास कामे केली? किती प्रदूषण विरहित कारखाने आणले, किती बेरोजगारांना रोजगार दिले? याचा जाब त्यांना विचारा.

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Ratnagiriरत्नागिरी