शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

 रत्नागिरीतील नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 4:59 PM

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.

ठळक मुद्देवाचकप्रेमींचा संकल्पपूर्तीसाठी हातभारवाचनालयात पुस्तकांची समृद्धी, अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांची माहिती

रत्नागिरी : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने एक लाख पुस्तक संख्या करण्याचा संकल्प केला. १०० दिवसांत ६ हजार पुस्तके जमा करण्याचे आव्हान होते. मात्र, रत्नागिरीतील वाचकप्रेमी नागरिकांनी वाचनालयाचा संकल्प तडीस नेण्यासाठी मोठा सहयोग केला आहे. जिल्हा नगरवाचनालय एक लाख ग्रंथ परिपूर्तीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती जिल्हा नगरवाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड़ दीपक पटवर्धन यांनी दिली.पटवर्धन यांनी सांगितले की, समाजाच्या सर्व स्तरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि जी पुस्तक संख्या प्राप्त होण्यासाठी चार वर्षे लागली असती. ती पूर्ण करण्यासाठी जनसहयोग मिळाल्याने १०० दिवसात एक लाखांच्या पुसतकांचं स्वप्न साकार होताना दिसतंय.

विद्यार्थी, शिक्षक, डॉक्टर्स, वकील, बँकर्स, संस्था चालक शासकीय अधिकारी, कर्मचारी, साहित्यिक तसेच काही संस्था या सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आजअखेर ९९ हजार पुस्तक संख्येचा टप्पा नगरवाचनालयाने गाठला आहे. आता एक हजार पुस्तकांची प्रतीक्षा आहे.अनेकांनी नजीकच्या काही दिवसांत पुस्तके देण्याचे मान्य केले आहे. या सर्वांच्या सहभागाने आपले रत्नागिरी जिल्हा नगरवाचनालय हे एक लाख ग्रंथ संपदेने सुसज्ज वाचनालय बनेल.

वाचनालयाला सहा हजार पुस्तके खरेदी करण्यासाठी किमान चार वर्षांचा कालावधी लागला असता तसेच लोकसहभागाचा मार्ग स्वीकारल्याने वाचकांनी आपल्या आवडीचे साहित्य प्रकार, पुस्तके जमा केली. त्यामुळे वाचनालयाच्या पुस्तकांची समृध्दी वाढली.रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय एक लाख ग्रंथ संख्या असणाऱ्या मोजक्या वाचनालयांच्या यादीत समाविष्ट होण्याचा क्षण समीप आला आहे. रत्नागिरीच्या इतिहासाचा जागता साक्षीदार असलेले हे वाचनालय १९० वर्षे रत्नागिरीकरांच्या वाचन तृष्णा वाढवत नेवून भागवत आहे.

इतिहासातील अनेक संदर्भ वाचनालयाशी निगडीत आहेत. रत्नागिरी शहराच्या सुसंस्कृत चेहऱ्याचे रत्नागिरी जिल्हा वाचनालय हे प्रतीक आहे. अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ स्वातंत्र्यकर्मी, साहित्यिक, राजकीय नेते यांच्या सहवासाने आणि ग्रंथसंपदेने संपन्न असे हे वाचनालय नव्या युगातल्या तंत्रज्ञानाचा अंगिकार करुन दिमाखदार रुपात आजही वाचन संस्कृती जतन करीत आहे.३१ जुलै रोजी हे वाचनालय एक लाख पुस्तक संख्या असलेले वाचनालय म्हणून ओळखले जाईल, असा विश्वासही पटवर्धन यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :literatureसाहित्यRatnagiriरत्नागिरी