शहरं
Join us  
Trending Stories
1
कृषिमंत्री कोकाटे किती मिनिटे रमी खेळत होते?, विधिमंडळ चौकशी अहवालात उघड, रोहित पवारांचा दावा
2
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
3
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
4
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...
5
"दीड लाख देऊन इथं आलोय, मला बोलू द्या..."; संसदेत हजेरी लावणं खासदार राशीद यांना इतकं महाग का पडलं?
6
Reliance Jio ची आपल्या ग्राहकांना मोठी भेट; फक्त ₹५९९ मध्ये घरच्या TV ला बनवा कॉम्प्यूटर
7
PM किसान योजनेचा २० वा हप्ता जाहीर! २००० रुपये थेट बँक खात्यात, लगेच 'असं' तपासा तुमचं नाव!
8
भीक मागणाऱ्या व्यक्तीच्या दोन बायका, आता त्याची तक्रार तर ऐका; कलेक्टरकडे पोहोचला अन् म्हणाला...
9
Pranjal Khewalkar Arrest : मोबाईलमधून हाऊस पार्टीतील महिलांशी केलेली चॅटिंग व पार्टीचे व्हिडिओ सापडले
10
UPI मध्ये १ ऑगस्टपासून होणार बदल; बॅलन्स चेक ते ऑटो-पे पर्यंत सर्वकाही बदलणार, पाहा तुमच्यासाठी काय नवं?
11
Sonam Raghuvanshi : बेवफा सोनमवर चित्रपट येणार, 'हे' नाव असणार; दिग्दर्शकाने घेतली राजा रघुवंशीच्या भावाची भेट
12
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Sensex १९० अंकांपेक्षा जास्त वधारला, 'या' शेअर्समध्ये तेजी
13
शेजारी राहणाऱ्या महिलेवर केले वार, गुप्तांगावरही ओरबाडलं अन् जंगलात फेकून दिलं! तरुण का झाला हैवान?
14
राज ठाकरे ‘मातोश्री’वर गेले, उद्धव ठाकरे ‘शिवतीर्थ’वर कधी जाणार? ‘ते’ मुहूर्त तर हुकले, आता...
15
पोस्टाची 'ही' स्कीम हलक्यात घेऊ नका; थोडी थोडी गुंतवणूक करून जमवू शकता १७ लाखांचा फंड
16
खळबळजनक! HIV पॉझिटिव्ह अन् कर्जबाजारी होता भाऊ; रक्षाबंधनाच्या आधी बहीण झाली निष्ठूर
17
विवाहित पुरुषापासून दूर रहा...! कोर्टाचा महिलेला अजब आदेश, स्वत: विवाहित होती, तरी तिला...
18
नेपाळमध्ये ISI उभं करतंय नेटवर्क, 'बांगलादेशी मॉडेल'चा वापर; 'असा' रचला जातोय भारताविरोधी कट
19
अरे देवा! मुलगा वर्गात झोपला अन् शाळेला कुलूप लावून शिक्षक गेले घरी, जाग आल्यावर घाबरून...
20
९ महिन्यापूर्वी लव्ह मॅरेज अन् आज फेसबुकवर शेवटचा मेसेज लिहून जोडप्यानं संपवलं आयुष्य

रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:17 IST

थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देथकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासामार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार

रत्नागिरी : थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार असून, मार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.वीजबिल वसुलीत कायम अग्रेसर राहणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात २३७२ शेतकरी हे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे मार्च२०१७ अखेरीस १० लाखांच्या वीजबिलाची थकबाकी असून, एप्रिलनंतर दिलेल्या चालू त्रैमासिक बिलापोटी ८ लाख ९४ हजार ९४ रुपये येणे आहे. चालू बिले न भरल्यास १५ नोव्हेंबरपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.जिल्ह्यातील या २३७२ थकबाकीदार कृषी पंपधारकांकडे मार्च २०१७ अखेरीस मूळ थकबाकीचे ९ लाख ३९ हजार ८७ रुपये, व्याजाचे ४८ हजार १७८ रुपये तर दंडापोटी १० हजार ६६ रुपये अशी एकूण ९ लाख ९७ हजार ३३१ रुपये थकबाकी आहे.

एप्रिलनंतरच्या चालू बिलापोटी ८ लाख ९४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत चालू बिले भरणाऱ्यांनाच कृषी संजीवनी योजेनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या व दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च २०१७ अखेर ३० हजारापेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी फेडण्यासाठी पाच समान हप्ते दिले जाणार आहेत.

हा प्रत्येक हप्ता २० टक्के रकमेचा असून, पहिला हप्ता डिसेंबर २०१७, दुसरा मार्च २०१८, तिसरा जून २०१८, चौथा सप्टेंबर २०१८ ला तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यंत भरावा लागणार आहे.या प्रत्येक हप्त्यांसोबत पुढील येणारे बिल भरणेही क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडे तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी १० टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत.

संपूर्ण हप्ते व चालूबिलाचा भरणा डिसेंबर २०१८पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर आकारलेले दंड व व्याज माफ होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.सहकार्य करावेरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी कृषीपंपाची चालू बिले भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ मध्ये सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कोकण विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी