शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

रत्नागिरी महावितरण कंपनीकडे २३७२ शेतकऱ्यांची १० लाखांची थकबाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 12:17 IST

थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार आहे.

ठळक मुद्देथकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासामार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार

रत्नागिरी : थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना-२०१७ जाहीर केली आहे. या योजनेत पात्र होण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत चालू वीजबिल भरावे लागणार असून, मार्च २०१७अखेर असलेली मूळ थकबाकी पाच ते दहा सुलभ हप्त्यांमध्ये फेडता येणार आहे.वीजबिल वसुलीत कायम अग्रेसर राहणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्यात २३७२ शेतकरी हे थकबाकीदार आहेत. त्यांच्याकडे मार्च२०१७ अखेरीस १० लाखांच्या वीजबिलाची थकबाकी असून, एप्रिलनंतर दिलेल्या चालू त्रैमासिक बिलापोटी ८ लाख ९४ हजार ९४ रुपये येणे आहे. चालू बिले न भरल्यास १५ नोव्हेंबरपासून शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.जिल्ह्यातील या २३७२ थकबाकीदार कृषी पंपधारकांकडे मार्च २०१७ अखेरीस मूळ थकबाकीचे ९ लाख ३९ हजार ८७ रुपये, व्याजाचे ४८ हजार १७८ रुपये तर दंडापोटी १० हजार ६६ रुपये अशी एकूण ९ लाख ९७ हजार ३३१ रुपये थकबाकी आहे.

एप्रिलनंतरच्या चालू बिलापोटी ८ लाख ९४ हजार रुपये भरावे लागणार आहेत. १५ नोव्हेंबरपर्यंत चालू बिले भरणाऱ्यांनाच कृषी संजीवनी योजेनेसाठी पात्र ठरवले जाणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणाऱ्या व दंड-व्याज बाजूला ठेवून मार्च २०१७ अखेर ३० हजारापेक्षा कमी मूळ थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना थकबाकी फेडण्यासाठी पाच समान हप्ते दिले जाणार आहेत.

हा प्रत्येक हप्ता २० टक्के रकमेचा असून, पहिला हप्ता डिसेंबर २०१७, दुसरा मार्च २०१८, तिसरा जून २०१८, चौथा सप्टेंबर २०१८ ला तर पाचवा हप्ता डिसेंबर २०१८ पर्यंत भरावा लागणार आहे.या प्रत्येक हप्त्यांसोबत पुढील येणारे बिल भरणेही क्रमप्राप्त आहे. ज्यांच्याकडे तीस हजारांहून अधिक मूळ थकबाकी आहे, त्यांना मूळ थकबाकीचे प्रत्येकी १० टक्के रकमेचे दहा हप्ते मिळणार आहेत.

संपूर्ण हप्ते व चालूबिलाचा भरणा डिसेंबर २०१८पूर्वी व दिलेल्या मुदतीत केल्यास थकबाकीवर आकारलेले दंड व व्याज माफ होणार असल्याचे महावितरणने म्हटले आहे.सहकार्य करावेरत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबरपूर्वी कृषीपंपाची चालू बिले भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना -२०१७ मध्ये सहभागी व्हावे व थकबाकीमुक्त होऊन महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरण कोकण विभागाचे प्रभारी मुख्य अभियंता प्रभाकर पेठकर यांनी केले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरी