शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
7
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
8
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
9
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
10
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
11
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
12
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
13
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
14
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
15
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
16
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
17
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
18
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
19
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
20
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

रत्नागिरी : शेतीला आधुनिकतेची जोड, जोडीला विविध भाज्यांच्या लागवडीतून उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 12:57 IST

पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर्यायांचा अवलंब करून शेतीकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.

ठळक मुद्देएक एकर क्षेत्रावर गादी वाफे पद्धतीने भातशेती, विविध भाज्यांच्या लागवडीचा यशस्वी प्रयोगगुंठ्याच्या क्षेत्रावर काळीमिरीची लागवड; कलिंगड लागवडीचा प्रयोगही यशस्वी

शोभना कांबळेरत्नागिरी : पावसावर अवलंबून केली जाणारी पारंपरिक शेती आता कमी झाली आहे. कोकणातील शेतकरी आधुनिक तंत्राचा वापर करून भातशेतीबरोबरच इतरही शेती करून उत्पन्नात वाढ करू लागले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पावसाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता इतर पर्यायांचा अवलंब करून शेतीकडे अधिक लक्ष देऊ लागले आहेत.रत्नागिरी तालुक्यातील सत्कोंडी येथील संजय जानू बंडबे यांनीही पारंपरिक शेतीची कास धरतानाच आधुनिक पद्धतीने शेती करण्यास सुरूवात केली आहे. सुमारे एक एकरवर ते भातशेतीचे उत्पन्न घेत आहेत. मात्र, त्यापैकी दहा गुंठे क्षेत्रावर ते आधुनिक गादी वाफे पद्धतीने शेती करू लागले आहेत.

सत्कोंडीसारख्या ग्रामीण भागात राहून ते आता नव्या पद्धतीकडे वळले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात अजूनही बरेचसे शेतकरी केवळ पारंपरिक पद्धतीने असलेल्या शेतीवर अवलंबून राहतात. ही शेती पावसावर अवलंबून असल्याने पाऊस चांगला झाला तरंच तो शेतीला पोषक ठरतो. त्यामुळे हल्ली अनेक शेतकरी शेतीपासून दूर जाऊ लागले आहेत. मात्र, काही शेतकरी शेतीत नवीन प्रयोग करून अधिक उत्पन्न घेवू लागले आहेत.सत्कोंडी येथील संजय बंडबे यांची एक एकरवर भातशेती आहे. ही भातशेती करतानाच त्यांनी याच क्षेत्रावर विविध भाज्यांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. या एकरमधील दहा गुंठ्यावर त्यांनी गादीवाफे पद्धतीने भातशेती करण्यास गेल्या वर्षापासून सुरूवात केली. त्यासाठी घेतलेल्या परिश्रमातून त्यांनी गतवर्षी १६ मण पीक घेतले. यावर्षी आत्मविश्वास अधिक वाढल्याने त्या अनुभवातून यावर्षी अधिक पीक घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.पावसाळी शेतीनंतरही केवळ त्यावरच अवलंबून न राहता, गेल्या काही वर्षांपासून बंडबे यांनी याच क्षेत्रावर विविध भाज्यांची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. या क्षेत्रात ते पालाभाजी, वांगी, मिरची, टोमॅटो, कोबी, सिमला मिरची या भाज्यांची लागवड दरवर्षी करतात.

या भाज्यांना सत्कोंडी तसेच इतर भागात चांगली बाजारपेठ मिळत आहे. बंडबे यांचा सेंद्रीय खताकडे ओढा असल्याने त्यांच्याकडील उत्कृष्ट चवीच्या व दर्जेदार असलेल्या विविध भाज्यांना या भागात चांगली मागणी आहे. या भाज्यांना दरही चांगला मिळत आहे.सत्कोंडीतील इतरही शेतकरी आता एकत्र आले आहेत. त्यामुळे अशा एकत्र आलेल्या या अकरा शेतकऱ्यांनी आपल्या भाज्यांचे मार्केटिंगही एकत्रित करण्यास सुरुवात केली आहे. सत्कोंडीत तशी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असल्याने या शेतकऱ्यांच्या भाज्यांनाही चांगली बाजारपेठ मिळत आहे. येथील शेतकऱ्यांची एकी वाखाणण्याजोगी आहे.बंडबे यांनी एका गुंठ्यामध्ये गेल्या वर्षापासून उपयोगी असलेल्या काळीमिरीचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. यावर्षीही त्यांनी सुमारे १५० काळेमिरीची रोपे लावली आहेत. काळीमिरी ही वेलवर्गातील असल्याने एखाद्या मोठ्या झाडाच्या आधाराने तिची रोपे लावली जातात. मात्र, ही झाडे मुळातच मोठी असल्याने त्यावर चढलेल्या वेलावरील मिरी काढणे अडचणीचे होते, हे लक्षात घेऊन संजय बंडबे यांनी झुडूपवर्गीय प्रकाराने काळीमिरी लागवड केली आहे.

या लागवडीसाठी त्यांनी शेड तयार केली आहे. त्यामुळे ही रोपे पाच फुटांपर्यंत वाढल्यानंतर त्यांची छाटणी केली जाते. काळीमिरीच्या एका रोपापासून त्यांना सुमारे २०० ग्रॅम उत्पन्न मिळते. हे पीकही ते वर्षातून दोनदा घेत आहेत.विविध लागवडींचा प्रयोगसंजय बंडबे आपल्या एक एकरावरील पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता, विविध लागवडींचा प्रयोग करीत आहेत. भातशेती झाल्यानंतर ते या जागेत विविध भाज्यांची लागवड करून त्यापासून उत्पादन घेत आहेत. त्यातूनही त्यांना चांगले उत्पन्न मिळत आहे. याआधीही त्यांनी या जागेत कलिंगडाची लागवड यशस्वी करून दाखविली आहे.अकरा शेतकरी एकत्र आलेसत्कोंडीतील संजय बंडबे भाज्यांची लागवड करताना त्यासाठी कुठल्याही कृत्रिम खताचा वापर न करता, शेणखत, गांडूळखत यांचा वापर करतात. सेंद्रीय खतांच्या भाज्यांना या भागात अधिक पसंती असल्याने या भाज्यांना मागणी वाढू लागली आहे. बंडबे यांच्यासह अकरा शेतकरी एकत्र आले असल्याने या परिसरातील मागणीनुसार भाज्यांचा पुरवठा करणे शक्य होत आहे.

पारंपरिक शेतीतून आता म्हणावे तसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे आता नव्या पद्धतीने गादी वाफ्याद्वारे दहा गुंठे क्षेत्रावर भातशेतीचे उत्पन्न घेण्यास सुरूवात केली आहे. या पद्धतीने आता उत्पन्नात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी चांगले पीक मिळाले असल्याने यावर्षीही अधिक पीक घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- संजय बंडबे, शेतकरी

टॅग्स :FarmerशेतकरीRatnagiriरत्नागिरी