शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:19 IST

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.

ठळक मुद्दे मिऱ्या बंधारा उंची वाढविण्यासाठी, दुरुस्तीसाठी ४९ लाखांचा कार्यादेश असूनही मलमपट्टी?मिऱ्यातील सागरी बंधाऱ्याला दहा ठिकाणी भगदाडे मात्र दुरुस्ती नाहीचकाळबादेवी, मुरुगवाडा, मांडवी, राजिवडा व रत्नागिरी शहरातील सागरी किनाऱ्याला धोका

रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.सन २०१६मध्ये या बंधाऱ्याच्या दुरस्ती कामासाठी ४९ लाख निधी मंजूर झाला. मात्र, यंदाही पावसाळ्याच्या पुरेसे आधी हे दुरुस्ती काम करण्यात आलेले नाही. दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असताना सोमवारी या दुरुस्ती कामाचा नारळ वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत मिऱ्या येथील मच्छीमार नेते आप्पा वांदरकर लोकमतशी बोलताना म्हणाले, सन २०१६मध्ये मिऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी व या बंधाऱ्याची उंची पावणेतीन फुटाने वाढविण्यासाठी ४९ लाख रूपये शासनाने मंजूर केले होते. परंतु गेल्या दोन वर्षात या बंधाऱ्याची दुरुस्ती काही झालेली नाही.

१३ मे २०१८ रोजी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नव्याने दगड न आणता बंधाऱ्याचे समुद्राच्या पाण्यात कोसळलेले दगड जमा करून त्याद्वारे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू होता. जुने दगड वापरून उंची वाढविण्याचे कंत्राट आहे का, अशी विचारणा करीत स्थानिकांनी या मलमपट्टीला विरोध केला.

नवीन दगड आणून बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी केल्याचे वांदरकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी (४ जून २०१८) पतन विभागाच्यावतीने या दुरुस्ती कामाचा आरंभ भाटीमिऱ्या येथे करण्यात आला. पाऊस सुरू झाल्यावर हे काम होणार कसे, दगड आणणार कुठून, असा सवालही वांदरकर यांनी केला.गेल्या अनेक वर्षांपासून मिऱ्या गावातील सागरी भागाला पावसाळ्यात सागरी लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा व भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.दहा ठिकाणी भगदाडेमिऱ्या येथील सागरी धूप बंधाऱ्याला सुमारे दहा ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासह दुरुस्तीचे ४९ लाखांचे काम खेडमधील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. यातील प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मिऱ्यामध्ये पावसाळ्यात सागराचे पाणी घुसण्याचा धोका कायम आहे.अतिक्रमणाचा मोठा धोकामिऱ्या गावातील बंधाऱ्याला वाडकर, भाटकर, जोशी, वांदरकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात भगदाडे पडली आहेत. तालुक्यातील काळबादेवी गाव, रत्नागिरी शहरातील मांडवी, मुरुगवाडा व अन्य भागांनाही पावसाळी सागरी लाटांचा, अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmonsoon 2018मान्सून 2018environmentवातावरणfishermanमच्छीमारMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर