शहरं
Join us  
Trending Stories
1
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅपिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
2
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
3
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
4
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
5
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
6
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
7
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
8
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
9
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
10
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या
11
‘अमेरिकेत जाण्यासाठी ३५ लाख रुपये खर्च केले, २५ तास बेड्या घालून परत धाडले’, तरुणाने मांडली व्यथा
12
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
13
धक्कादायक! २५ वर्षीय मराठी अभिनेत्याची आत्महत्या, सिनेमाचं रिलीज तोंडावर असताना संपवलं आयुष्य
14
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
15
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
16
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
17
चातुर्मास कधी संपणार? पाहा, विष्णुप्रबोधोत्सव, कार्तिकी एकादशीचे महत्त्व, महात्म्य, मान्यता
18
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
19
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
20
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट

रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:19 IST

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.

ठळक मुद्दे मिऱ्या बंधारा उंची वाढविण्यासाठी, दुरुस्तीसाठी ४९ लाखांचा कार्यादेश असूनही मलमपट्टी?मिऱ्यातील सागरी बंधाऱ्याला दहा ठिकाणी भगदाडे मात्र दुरुस्ती नाहीचकाळबादेवी, मुरुगवाडा, मांडवी, राजिवडा व रत्नागिरी शहरातील सागरी किनाऱ्याला धोका

रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.सन २०१६मध्ये या बंधाऱ्याच्या दुरस्ती कामासाठी ४९ लाख निधी मंजूर झाला. मात्र, यंदाही पावसाळ्याच्या पुरेसे आधी हे दुरुस्ती काम करण्यात आलेले नाही. दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असताना सोमवारी या दुरुस्ती कामाचा नारळ वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत मिऱ्या येथील मच्छीमार नेते आप्पा वांदरकर लोकमतशी बोलताना म्हणाले, सन २०१६मध्ये मिऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी व या बंधाऱ्याची उंची पावणेतीन फुटाने वाढविण्यासाठी ४९ लाख रूपये शासनाने मंजूर केले होते. परंतु गेल्या दोन वर्षात या बंधाऱ्याची दुरुस्ती काही झालेली नाही.

१३ मे २०१८ रोजी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नव्याने दगड न आणता बंधाऱ्याचे समुद्राच्या पाण्यात कोसळलेले दगड जमा करून त्याद्वारे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू होता. जुने दगड वापरून उंची वाढविण्याचे कंत्राट आहे का, अशी विचारणा करीत स्थानिकांनी या मलमपट्टीला विरोध केला.

नवीन दगड आणून बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी केल्याचे वांदरकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी (४ जून २०१८) पतन विभागाच्यावतीने या दुरुस्ती कामाचा आरंभ भाटीमिऱ्या येथे करण्यात आला. पाऊस सुरू झाल्यावर हे काम होणार कसे, दगड आणणार कुठून, असा सवालही वांदरकर यांनी केला.गेल्या अनेक वर्षांपासून मिऱ्या गावातील सागरी भागाला पावसाळ्यात सागरी लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा व भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.दहा ठिकाणी भगदाडेमिऱ्या येथील सागरी धूप बंधाऱ्याला सुमारे दहा ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासह दुरुस्तीचे ४९ लाखांचे काम खेडमधील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. यातील प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मिऱ्यामध्ये पावसाळ्यात सागराचे पाणी घुसण्याचा धोका कायम आहे.अतिक्रमणाचा मोठा धोकामिऱ्या गावातील बंधाऱ्याला वाडकर, भाटकर, जोशी, वांदरकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात भगदाडे पडली आहेत. तालुक्यातील काळबादेवी गाव, रत्नागिरी शहरातील मांडवी, मुरुगवाडा व अन्य भागांनाही पावसाळी सागरी लाटांचा, अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmonsoon 2018मान्सून 2018environmentवातावरणfishermanमच्छीमारMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर