शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2018 17:19 IST

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.

ठळक मुद्दे मिऱ्या बंधारा उंची वाढविण्यासाठी, दुरुस्तीसाठी ४९ लाखांचा कार्यादेश असूनही मलमपट्टी?मिऱ्यातील सागरी बंधाऱ्याला दहा ठिकाणी भगदाडे मात्र दुरुस्ती नाहीचकाळबादेवी, मुरुगवाडा, मांडवी, राजिवडा व रत्नागिरी शहरातील सागरी किनाऱ्याला धोका

रत्नागिरी : तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे पडली आहेत.सन २०१६मध्ये या बंधाऱ्याच्या दुरस्ती कामासाठी ४९ लाख निधी मंजूर झाला. मात्र, यंदाही पावसाळ्याच्या पुरेसे आधी हे दुरुस्ती काम करण्यात आलेले नाही. दोन दिवसात जोरदार पाऊस सुरू असताना सोमवारी या दुरुस्ती कामाचा नारळ वाढविण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.याबाबत मिऱ्या येथील मच्छीमार नेते आप्पा वांदरकर लोकमतशी बोलताना म्हणाले, सन २०१६मध्ये मिऱ्या बंधारा दुरुस्तीसाठी व या बंधाऱ्याची उंची पावणेतीन फुटाने वाढविण्यासाठी ४९ लाख रूपये शासनाने मंजूर केले होते. परंतु गेल्या दोन वर्षात या बंधाऱ्याची दुरुस्ती काही झालेली नाही.

१३ मे २०१८ रोजी या बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, नव्याने दगड न आणता बंधाऱ्याचे समुद्राच्या पाण्यात कोसळलेले दगड जमा करून त्याद्वारे बंधाऱ्याची उंची वाढविण्याचा प्रयत्न सुरू होता. जुने दगड वापरून उंची वाढविण्याचे कंत्राट आहे का, अशी विचारणा करीत स्थानिकांनी या मलमपट्टीला विरोध केला.

नवीन दगड आणून बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी केल्याचे वांदरकर यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सोमवारी (४ जून २०१८) पतन विभागाच्यावतीने या दुरुस्ती कामाचा आरंभ भाटीमिऱ्या येथे करण्यात आला. पाऊस सुरू झाल्यावर हे काम होणार कसे, दगड आणणार कुठून, असा सवालही वांदरकर यांनी केला.गेल्या अनेक वर्षांपासून मिऱ्या गावातील सागरी भागाला पावसाळ्यात सागरी लाटांच्या तडाख्याला सामोरे जावे लागते आहे. दगडी धूपप्रतिबंधक बंधाऱ्याला अनेक ठिकाणी भगदाडे पडली आहेत. मिरकरवाडा व भगवती बंदरात उभारण्यात आलेल्या ब्रेक वॉटर वॉलमुळे जमिनीची धूप होण्याची ही समस्या निर्माण झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे.दहा ठिकाणी भगदाडेमिऱ्या येथील सागरी धूप बंधाऱ्याला सुमारे दहा ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या बंधाऱ्याची उंची वाढविण्यासह दुरुस्तीचे ४९ लाखांचे काम खेडमधील कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र, त्यानंतर उपठेकेदाराकडे हे काम सोपविण्यात आले आहे. यातील प्रत्यक्षात काहीही काम झालेले नाही. त्यामुळे मिऱ्यामध्ये पावसाळ्यात सागराचे पाणी घुसण्याचा धोका कायम आहे.अतिक्रमणाचा मोठा धोकामिऱ्या गावातील बंधाऱ्याला वाडकर, भाटकर, जोशी, वांदरकर यांच्या घराच्या पाठीमागील भागात भगदाडे पडली आहेत. तालुक्यातील काळबादेवी गाव, रत्नागिरी शहरातील मांडवी, मुरुगवाडा व अन्य भागांनाही पावसाळी सागरी लाटांचा, अतिक्रमणाचा मोठा धोका आहे. याबाबत शासकीय पातळीवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीmonsoon 2018मान्सून 2018environmentवातावरणfishermanमच्छीमारMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदर