शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 4:53 PM

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.

ठळक मुद्देकमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोयचोरद पुलामुळे ४० गावांना दिलासा

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. या नदीवर असलेला कमी उंचीचा जुना पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटत असे.खेड तालुक्यातील आंबवली परिसरात सुकिवली, कुडोशी, मोहाने, सणघर, चाटव, वडगाव अशी सुमारे ४० गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदी पार करून जावे लागते.

१९५७ साली या नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, या पुलाची उंची अतिशय कमी म्हणजे केवळ २.५ मीटर इतकीच असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की, कमी उंचीचा हा पूल पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटत असे.

खेडमध्ये शाळा, महाविद्यालयात आलेले विद्यार्थी किंवा दैनंदिंन कामासाठी शहरामध्ये आलेले ग्रामस्थ कधी पुलाच्या अलिकडे, तर कधी पुलाच्या पलिकडे अडकून बसत असत.पावसाळ्याच्या चार महिन्यांत चोरद नदीला कधी पूर येईल आणि पूल पाण्याखाली जाऊन या गावांचा संपर्क तुटेल याचा नेम नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थ नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरत असत.

ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी या परिसरातील लोकांनी लावून धरली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला होता. मात्र, हा प्रस्तावही शासनाच्या लाल फितीत अडकून पडल्याने पुलाचे काम मार्गी लागत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांची समस्याही निकाली निघत नव्हती. दरवर्षी पुराचा धोका होता. आता हा प्रश्न संपला आहे.चोरद नदीवर नव्याने पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. पावसाळ्या या गावांचा संपर्कच तुटत असे. त्यामुळे हा पूल महत्वाचा होता. मात्र, अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर २०१२मध्ये हिरवा कंदील मिळाला आणि चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या कामाला चालना मिळाली.

आंबवली परिसरातील अनेक गावांना जोडणारा चोरद नदीवरील पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने या मार्गावरील पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरीRainपाऊस