शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 16:56 IST

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे.

ठळक मुद्देकमी उंचीच्या खेड - आंबवली पुलामुळे पावसाळ्यात लोकांची गैरसोयचोरद पुलामुळे ४० गावांना दिलासा

खेड : खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदीवर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलामुळे आंबवली विभागातील सुमारे ४० गावांतील ग्रामस्थांची पावसाळ्यादरम्यान होणारी फार मोठी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाली आहे. या नदीवर असलेला कमी उंचीचा जुना पूल पावसाळ्यात कायम पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा तालुक्याशी असलेला संपर्क तुटत असे.खेड तालुक्यातील आंबवली परिसरात सुकिवली, कुडोशी, मोहाने, सणघर, चाटव, वडगाव अशी सुमारे ४० गावे आहेत. या गावांमध्ये जाण्यासाठी खेड - आंबवली मार्गावरील चोरद नदी पार करून जावे लागते.

१९५७ साली या नदीवर पुलाची उभारणी करण्यात आली होती. मात्र, या पुलाची उंची अतिशय कमी म्हणजे केवळ २.५ मीटर इतकीच असल्याने पावसाळ्यात अतिवृष्टी झाली की, कमी उंचीचा हा पूल पाण्याखाली जाऊन आंबवली परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटत असे.

खेडमध्ये शाळा, महाविद्यालयात आलेले विद्यार्थी किंवा दैनंदिंन कामासाठी शहरामध्ये आलेले ग्रामस्थ कधी पुलाच्या अलिकडे, तर कधी पुलाच्या पलिकडे अडकून बसत असत.पावसाळ्याच्या चार महिन्यांत चोरद नदीला कधी पूर येईल आणि पूल पाण्याखाली जाऊन या गावांचा संपर्क तुटेल याचा नेम नसल्याने पावसाळ्यात या परिसरातील ग्रामस्थ नेहमीच भीतीच्या छायेखाली वावरत असत.

ग्रामस्थांची होणारी ही गैरसोय लक्षात घेता चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी या परिसरातील लोकांनी लावून धरली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पुलाची उंची वाढविण्याबाबतचा प्रस्तावदेखील पाठविण्यात आला होता. मात्र, हा प्रस्तावही शासनाच्या लाल फितीत अडकून पडल्याने पुलाचे काम मार्गी लागत नव्हते. त्यामुळे ग्रामस्थांची समस्याही निकाली निघत नव्हती. दरवर्षी पुराचा धोका होता. आता हा प्रश्न संपला आहे.चोरद नदीवर नव्याने पूल बांधावा अशी मागणी अनेक वर्षे करण्यात येत होती. पावसाळ्या या गावांचा संपर्कच तुटत असे. त्यामुळे हा पूल महत्वाचा होता. मात्र, अनेक वर्षे शासन दरबारी धूळ खात पडलेल्या प्रस्तावाला अखेर २०१२मध्ये हिरवा कंदील मिळाला आणि चोरद नदीवरील पुलाची उंची वाढवण्याच्या कामाला चालना मिळाली.

आंबवली परिसरातील अनेक गावांना जोडणारा चोरद नदीवरील पूल अखेर वाहतुकीसाठी खुला झाल्याने या मार्गावरील पावसाळ्यात ग्रामस्थांची होणारी गैरसोय कायमस्वरुपी निकाली निघाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागRatnagiriरत्नागिरीRainपाऊस