शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
3
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
4
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
5
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
7
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
8
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
9
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
10
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
11
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
12
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
13
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
14
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
15
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
16
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया
17
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
18
शारदीय नवरात्र म्हणजे निर्मितीशक्तीचा उत्सव; पूजा नऊ दिवसच का? महत्त्व जाणून घ्या
19
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
20
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...

रत्नागिरी : तळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभव, लघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:36 IST

लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभवलघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

पाचल : लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.सन २००६मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाच ते सहा वर्षांतच या धरणाला गळती सुरू झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा होत नाही. जानेवारीनंतर या धरणात पाण्याचा ठणठणाट असतो. धरण असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.आजही या धरणातून दिवसाला लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसते. त्यामुळे हे धरण सुमारे सतरा वर्षे वापराविना पडून आहे. लघु पाटबंधारे विभागाचे या धराणाच्या दुरूस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे या धरणावर झाडेझुडपे वाढली असून, मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.

तळवडे धरणाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर सध्या सुरू असलेल्या गळतीच्या जागी मोठी गळती होऊन पावसाळ्यात या धरणाला मोठा संभवतो. या धरणाच्या पायथ्याशी सुमारे हजार ते पंधराशे लोकवस्ती असून, याचे गांभीर्य लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. या धरणाला धोका निर्माण झाल्यास नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल होत आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी