शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

रत्नागिरी : तळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभव, लघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 14:36 IST

लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.

ठळक मुद्देतळवडेतील धरणाला गळती, धोक्याचा संभवलघु पाटबंधारे : लाखो लीटर पाणी वाया

पाचल : लघु पाटबंधारे विभागाच्या गलथान व ढिसाळ कारभारामुळे तळवडे ब्राह्मणदेव येथील धरणाला गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने धरणातील लाखो लीटर पाणी वाया जात आहे. भविष्यात गळतीचे प्रमाण वाढल्यास या धरणाला मोठा धोका निर्माण होणार आहे.सन २००६मध्ये या धरणाचे काम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर पाच ते सहा वर्षांतच या धरणाला गळती सुरू झाली. त्यामुळे धरणात पाण्याचा साठा होत नाही. जानेवारीनंतर या धरणात पाण्याचा ठणठणाट असतो. धरण असूनही त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत नाही. जानेवारी ते मे महिन्यापर्यंत ग्रामस्थांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते.आजही या धरणातून दिवसाला लाखो लीटर पाणी वाहून जात आहे. याकडे प्रशासन वा लोकप्रतिनिधींचे लक्ष नसते. त्यामुळे हे धरण सुमारे सतरा वर्षे वापराविना पडून आहे. लघु पाटबंधारे विभागाचे या धराणाच्या दुरूस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे या धरणावर झाडेझुडपे वाढली असून, मोठ्या प्रमाणात गवतही वाढले आहे.

तळवडे धरणाच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही, तर सध्या सुरू असलेल्या गळतीच्या जागी मोठी गळती होऊन पावसाळ्यात या धरणाला मोठा संभवतो. या धरणाच्या पायथ्याशी सुमारे हजार ते पंधराशे लोकवस्ती असून, याचे गांभीर्य लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना नाही. या धरणाला धोका निर्माण झाल्यास नुकसानाला जबाबदार कोण? असा सवाल होत आहे.

टॅग्स :DamधरणRatnagiriरत्नागिरी