शहरं
Join us  
Trending Stories
1
टेस्लामध्ये मोठा पेच! पॅकेजवरून वाद, एलन मस्क कंपनी सोडण्याची शक्यता; अध्यक्षांचा गंभीर इशारा...
2
एकनाथ खडसेंच्या जळगावातील बंगल्यात चोरी; किती मुद्देमाल चोरून नेला?
3
UPSC कँडिडेट हत्येप्रकरणी मोठा खुलासा; घरातील हार्ड ड्राइव्हमध्ये १५ महिलांचे अश्लील फोटो
4
मोठी अपडेट: श्रेयस अय्यर ड्रेसिंग रुममध्येच बेशुद्ध पडलेला; वैद्यकीय पथकाने लागलीच धोका ओळखला, नाहीतर...
5
ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर काळाच्या पडद्याआड! वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
6
"तेच रडणे, तीच मळमळ, त्याच उलट्या, त्याच फुशारक्या...", भाजपाने उद्धव ठाकरेंना डिवचलं
7
कॉफीसाठी जगभरात प्रसिद्ध असलेला 'हा' देश मोठ्या संकटात! यावर्षीच्या सगळ्यात भयंकर विनाशाला सामोरा जाणार
8
पेटीएम, जीपे, फोनपेवरील ऑटो पे कसे बंद कराल? आपोआप जातायत सबस्क्रीप्शन, पेमेंटचे पैसे... 
9
CCTV फुटेजमध्ये भलत्याच ठिकाणी दिसला आरोपी अन्...; अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात ट्विस्टवर ट्विस्ट
10
Aadhaar Card New Rules 1st Nov: महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून बदलणार आधार कार्डाशी निगडीत ३ मोठे नियम, जाणून घ्या
11
शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८४,८८० च्या पार; निफ्टीही वधारला, 'या' प्रमुख स्टॉक्समध्ये तेजी
12
वनप्लस १५ येतोय...! पण १४ क्रमांक का वगळला? चिनी संस्कृतीत असे काय आहे...
13
शंकर महाराज प्रकट दिन: म्हणा अकरा कवनांचे स्तोत्र, विजयी होईल सर्वत्र; कामना होतील पूर्ण
14
Bank Holidays November 2025: नोव्हेंबरमध्ये किती दिवस बँका राहणार बंद? पाहा RBI ची हॉलिडे लिस्ट, पटापट आटपा काम
15
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
16
१०० वर्षांनी महालक्ष्मीसह ४ राजयोग: ७ राशींना सुबत्ता, कल्याण; बक्कळ लाभ, यशाचा मंगलमय काळ!
17
Tulasi Vivah 2025: विष्णू हे लक्ष्मीपती असूनही दरवर्षी तुळशीशी का लावला जातो विवाह?
18
LIC ची ‘ही’ स्कीम गुंतवणूकदारांना बनवेल कोट्यधीश!; ४ वर्षापर्यंत भरा प्रीमिअम, मिळतील १ कोटी
19
"मी तुला कच्च खाऊन टाकेन"; बायकोने नवऱ्याला गर्लफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने धू-धू धुतलं
20
चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

रत्नागिरी : स्थानिक स्वराज्य संस्थांचा भूमिगत वाहिन्यांना अडसर, काम रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 14:25 IST

एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.

ठळक मुद्दे-एकात्मिक ग्रामीण योजना : ७० किलोमीटरपर्यंतची वाहिनी-महावितरण कंपनीकडून मंजूर निधीपेक्षा अधिकतम रकमेची मागणी-सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार

रत्नागिरी : एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात ७० किलोमीटरपर्यंत भूमिगत वाहिनी टाकली जाणार आहे. वाहिनी टाकण्यासाठी कराव्या लागणाऱ्या खोदकामाकरिता स्थानिक स्वराज्य संस्थांकडून परवानगी देण्यास विलंब होत आहे.

खोदाईसाठी कमीत कमी दर लावण्यात यावा, अशी मागणी महावितरणकडून करण्यात येऊनही मंजूर निधीपेक्षा अधिकतम रकमेची मागणी केली जात असल्यामुळे भूमिगत वाहिन्यांचे काम रखडले आहे.महावितरण कंपनीतर्फे एकात्मिक ग्रामीण विकास योजनेंतर्गत जिल्ह्यात उच्चदाब व लघुदाब भूमिगत वाहिन्या टाकण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लघुदाबाची राजापुरात ६ किलो मीटर, खेडमध्ये २२ किलोमीटर, उच्चदाब वाहिनीअंतर्गत दापोलीत १५ किलोमीटर व खेडमध्ये २७ किलोमीटरचे काम मंजूर आहे.

राजापूर वाहिनीसाठी ५४ लाख ७९ हजार, खेड वाहिनीकरिता १ कोटी ५७ लाख ५८ हजार, दापोली व खेडमधील उच्चदाब वाहिनीसाठी ५ कोटी ८६ लाख २१ हजार मिळून एकूण ७ कोटी ९८ लाख ५८ हजार रूपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, भूमिगत वाहिन्यांच्या खोदकामाला स्थानिक स्वराज्य संस्थेकडून परवानगी देण्यास विलंब होत असल्यामुळे कामे सुरू होण्यापूर्वीच थांबली आहेत. एकात्मिक ऊर्जा विकास योजनेंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यासाठी ३६ कोटी ३९ लाखांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

या योजनेंतर्गत राजापूर, रत्नागिरी, चिपळूण, खेड, दापोली शहरांमधील विद्युत वितरण व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासह शहरांची वाढती लोकसंख्या गृहीत धरून ट्रान्स्फॉर्मर क्षमता वाढविणे, नवीन ट्रान्स्फॉर्मर बसवणे, गंजलेले कंडक्टर, तारा, विद्युतखांब बदलणे, वीज वितरण बॉक्स (डीपी) बसवणे, नवीन वीजवाहिनी व भूमिगत वाहिन्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत.

या कामांसाठी रत्नागिरी शहराला ६ कोटी ३९ लाख, राजापूर १ करिता ३ कोटी २२ लाख, चिपळूण शहरासाठी ७ कोटी ९ लाख, खेडकरिता १० लाख ५६ हजार, दापोली १ साठी ७ कोटी ५ लाखांचा निधी मंजूर असून, या निधीतून ही विविध कामे सुरू आहेत.

याशिवाय सौरऊर्जा पॅनेलची कामे पूर्ण केली जाणार असून, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, खेड, दापोलीमध्ये प्रत्येकी २ मिळून एकूण १० किलोवॅटची कामे पूर्ण केली जाणार आहेत. 

महावितरणतर्फे ग्राहकांना वीजपुरवठा करण्यात येतो. वादळी वारे, पाऊस यामुळे काही ठिकाणी सुरक्षिततेच्या पार्श्वभूमिवर भूमिगत वाहिन्यांसाठीचा निर्णय घेण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय येऊ नये, यासाठी ठराविक भागातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहे. महावितरणदेखील लोकसेवा बजावत असल्यामुळे खोदकामाचा दर कमी असावा, अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी खोदकामासाठी परवानगी दिली, तर लवकरात लवकर काम सुरू होईल. पावसाळा तोंडावर असल्याने लवकर परवानगी मिळणे गरजेचे आहे. ज्या शहरांसाठी भूमिगत वाहिन्यांचे काम केले जाणार आहे, त्यांनीच खोदकामाची परवानगी रखडवल्यामुळे कामे थांबली आहेत.- पी. जी. पेठकर,प्रभारी मुख्य अभियंता, महावितरण

टॅग्स :Rural Developmentग्रामीण विकासRatnagiriरत्नागिरीmahavitaranमहावितरण