शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटात, शेतकरी चांगलेच अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 2:29 PM

तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.

ठळक मुद्देमंडणगड तालुक्यातील तिडेतील कलिंगड शेती संकटातदहा टन कलिंगडाचा माल शिल्लक, शेतकरी अडचणीत

मंडणगड : तिडे-आदिवासीवाडी येथे आदिवासी समाजातील बांधवांकडून केली जाणारी कलिगंडाच्या पिकांची समूहशेती यंदाच्या हंगामात विविध कारणांनी अडचणीत आली आहे. गेल्या आठ वर्षांपासून तिडे आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजातील ४२ कुटुंबे भारजा नदीतील पाण्याचा वापर करुन कलिगंडाची शेती करत आहेत.कलिगंडाच्या शेतीसाठी आवश्यक पायाभूत सुविधा स्थानिक पातळीवर उपलब्ध असल्याने या सुविधांचा वापर करुन परजिल्ह्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर लाभाची शेती मंडणगड तालुक्यात करीत असून, येथील सामान्य शेतकरी केवळ आपल्या भुईभाड्यात समाधानी असतानाच महिलांचा विशेष सहभाग असलेल्या तिडे - आदिवासीवाडी येथील आदिवासी समाजबांधवांनी आपला पारंपरिक व्यवसाय बंद करुन सर्व अडचणींवर मात करत कलिंगड शेतीचा प्रयोग यशस्वी केला.

यंदा मात्र या शेतीत अडचणींवर अडचणी येत असल्याने या महिला शेतकरी अडचणीत आल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे कलिंगड उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यातच भरीस भर म्हणून कलिंगडाचा हंगाम पंधरा दिवस उशिराने सुरु झाला. हे कमी होते की काय म्हणून मोठ्या प्रमाणावर येथील कलिंगडाची खरेदी करणारे व्यापारी यंदा याठिकाणी खरेदीसाठी आलेच नाहीत व जे आले त्यांनी भाव अगदीच पाडून मागितला.बाजारात कलिंगडाचा दर वीस रुपये प्रतिकिलो असताना शेतकऱ्यांना जागेवर आठ किंवा नऊ रुपयांचा दर प्रतिकिलो मागे दिला जात आहे. यंदा हा दर शेतकऱ्यांनी तीन ते चार रुपये प्रतिकिलो इतका खाली आणला आहे.

तालुक्यातील तिडे येथील आदिवासी शेतकऱ्यांकडे अजूनही सुमारे दहा टनाच्या आसपास कलिंगडाचा माल शिल्लक आहे. त्यामुळे येथील शेतकरी चांगलेच अडचणीत आले असून, शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी मदतीचे हात पुढे येणे आवश्यक आहे़

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीFarmerशेतकरी