शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

रत्नागिरी : शिक्षक भरती, समायोजनाबाबत येत्या दीड महिन्यात कार्यवाही, विनोद तावडे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 17:47 IST

शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.

ठळक मुद्देशिक्षक भरती, समायोजनाबाबत येत्या दीड महिन्यात कार्यवाहीशिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी साधला पत्रकारांशी संवाद शिक्षणाची वारी कार्यक्रमाचे उद्घाटन तावडे यांच्या हस्ते

रत्नागिरी : शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, नवीन भरती, तसेच समायोजनाबाबत येत्या एक ते दीड महिन्यात कार्यवाही करून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यात येईल, असे माहिती राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.एम.डी.नाईक हॉल येथे आयोजित शिक्षणाची वारी कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमानंतर तावडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राज्यातील शाळांच्या जून्या इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाने शाळांचे स्ट्रक्चरर आॅडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. टप्याटप्याने शाळांचे स्ट्रक्चरर आॅडिट करून पुर्नबांधणी, दुरूस्ती याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे.जिल्हा परिषदेच्या शाळा असताना स्वयंअर्थसहाय्यित शाळांना प्राधान्य देण्यात येत आहे, या बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा हेतू आहे. कंपनी सेक्शन ८ खाली शाळा काढण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण, शिवाय अद्यावत शैक्षणिक कॅम्पस तसेच क्रीडा मैदान उपलब्ध व्हावे, हा मानस आहे.पूर्वीच्या शासनाने २० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळा बंदचा निर्णय घेतला होता. मात्र, आमच्या सरकारने त्याला स्थगिती देऊन १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंदचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा पटसंख्या कमी असणाऱ्या शाळांची संख्या अधिक होती. त्यापेक्षा १० पेक्षा कमी पटसंख्या असणाऱ्या शाळांची संख्या कमी आहे.

शिक्षण हक्क कायद्यान्वये एक किलोमीटरच्या आत प्राथमिक शाळा व तीन किलोमीटरच्या आत माध्यमिक शाळा असावी. दहा पेक्षा कमी पटसंख्या असणारी शाळा एक किलोमीटरच्या आत असणाऱ्या परंतु जास्त पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये विद्यार्थी व शिक्षकांसहित विलीन करण्यात येणार आहे. ज्यामुळे माध्यमांचाही प्रश्न उद्भवणार नाही. याशिवाय विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक उपक्रमांचा लाभ मिळेल.रत्नागिरीतील पॉलीटेक्नीकल कॉलेजमध्ये डीग्री कॉलेज सुरू करण्याचा उद्देश होता जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थी डिप्लोमा व्होल्डर नाही तर डिग्री संपादित करेल. मात्र, डिप्लोमासाठीच लोकांचा आग्रह अधिक आहे.

जिल्हा क्रीडा संकुलांसाठीचा तीन वर्षाचा निधी सुरक्षित आहे. संकुले उभारल्यानंतर ती चालवावी कोणी ? हा प्रश्न आहे. क्रीडा संकुले अद्यावत करून त्याची देखभाल, दुरूस्तीची जबाबदारी सुपूर्द केली तरच ती व्यवस्थित सुरू शकतात, असेही सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेRatnagiriरत्नागिरीTeacherशिक्षक