शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:56 IST

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत तिलाेरी कुणबी समाजाला पूर्ववत कुणबी ८३ असे दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करून घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले हाेते. मात्र, प्रशासनाने आदेश धुडकावत महिनाभर तिलाेरी कुणबी समाजाला दाखले देणे बंद केल्याची माहिती कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची दि. २३ जानेवारी २०२३ रोजी बैठक पार पडली हाेती. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सेतू कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी तिलोरी कुणबी समाजाला जातीय दाखला देणे प्रशासनाने बंद केल्याचे सांगितले हाेते.

त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत प्रशासकीय अधिकारी, कुणबी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली हाेती. या बैठकीत तिलोरी कुणबी समाजाला पूर्ववत कुणबी ८३ असे दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करून घेण्यात यावा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.या अन्यायाबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, रामभाऊ गराटे, स्नेहा चव्हाण, विलास सनगरे, लांजा अध्यक्ष बी. टी. कांबळे, संगमेश्वरचे दत्ताराम लांबे, नंदकुमार आंबेकर यांनी जिल्हाधिकारी यांची साेमवारी (२७ फेब्रुवारी) भेट घेतली. जात पडताळणी अधिकाऱ्याने ज्या ज्या मुलांना तिलोरी कुणबी, कुणबी ति.कु, व ति. कु. कुणबी अशी नोंद आहे, अशांना दाखले देता येणार नाही, असे पत्र दिल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाला आणून दिले.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी आपण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच दाखले देणारे सेतूमधील कर्मचारी यांची बैठक घेऊन आढावा घेतो. तसेच पूर्ववत त्यांना तिलोरी कुणबी यांना जातीचे दाखले देण्यास सांगतो, असे सांगितल्याचे ते म्हणाले.  

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर आहे. बहुसंख्येने असणाऱ्या कुणबी समाजात सरकारच्या असंतोषाबाबत केव्हा ठिणगी पडून वणवा भडकेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६० ते ७० टक्के अशा बहुसंख्येने असणाऱ्या कुणबी समाजाची अवहेलना सरकारने तत्काळ थांबून जातीचे दाखले पूर्ववत ओबीसी दाखले देण्यात यावेत. - सुरेश भायजे, कुणबी समाज नेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत