शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंतांच्याच आदेशाला प्रशासनाने दाखविली केराची टोपली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:56 IST

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर

रत्नागिरी : जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत तिलाेरी कुणबी समाजाला पूर्ववत कुणबी ८३ असे दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करून घेण्याचे आदेश प्रशासनाला दिले हाेते. मात्र, प्रशासनाने आदेश धुडकावत महिनाभर तिलाेरी कुणबी समाजाला दाखले देणे बंद केल्याची माहिती कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयात मागासवर्गीय आयोगाच्या सदस्यांची दि. २३ जानेवारी २०२३ रोजी बैठक पार पडली हाेती. या बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, सेतू कार्यालयातील प्रतिनिधी उपस्थित होते. बैठकीत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यांनी तिलोरी कुणबी समाजाला जातीय दाखला देणे प्रशासनाने बंद केल्याचे सांगितले हाेते.

त्यावर पालकमंत्री उदय सामंत यांनी ६ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत प्रशासकीय अधिकारी, कुणबी कार्यकर्ते व लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेतली हाेती. या बैठकीत तिलोरी कुणबी समाजाला पूर्ववत कुणबी ८३ असे दाखले देऊन ओबीसीमध्ये समावेश करून घेण्यात यावा, असे आदेश प्रशासनाला दिले होते. मात्र, या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही.या अन्यायाबाबत प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कुणबी समाजाचे नेते सुरेश भायजे, नंदकुमार मोहिते, रामभाऊ गराटे, स्नेहा चव्हाण, विलास सनगरे, लांजा अध्यक्ष बी. टी. कांबळे, संगमेश्वरचे दत्ताराम लांबे, नंदकुमार आंबेकर यांनी जिल्हाधिकारी यांची साेमवारी (२७ फेब्रुवारी) भेट घेतली. जात पडताळणी अधिकाऱ्याने ज्या ज्या मुलांना तिलोरी कुणबी, कुणबी ति.कु, व ति. कु. कुणबी अशी नोंद आहे, अशांना दाखले देता येणार नाही, असे पत्र दिल्याचे जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनाला आणून दिले.

याबाबत जिल्हाधिकारी यांनी आपण उपविभागीय अधिकारी व तहसीलदार तसेच दाखले देणारे सेतूमधील कर्मचारी यांची बैठक घेऊन आढावा घेतो. तसेच पूर्ववत त्यांना तिलोरी कुणबी यांना जातीचे दाखले देण्यास सांगतो, असे सांगितल्याचे ते म्हणाले.  

तिलोरी कुणबी समाजाला जातीचे दाखले मिळत नसतील तर ती बाब गंभीर आहे. बहुसंख्येने असणाऱ्या कुणबी समाजात सरकारच्या असंतोषाबाबत केव्हा ठिणगी पडून वणवा भडकेल, हे सांगता येणार नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ६० ते ७० टक्के अशा बहुसंख्येने असणाऱ्या कुणबी समाजाची अवहेलना सरकारने तत्काळ थांबून जातीचे दाखले पूर्ववत ओबीसी दाखले देण्यात यावेत. - सुरेश भायजे, कुणबी समाज नेते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत