शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

रत्नागिरी : आवाशीत पाण्याची भीषणता, आठवडाभर थेंबही नाही,  महिलावर्ग एमआयडीसीवर धडकणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 18:11 IST

एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे. परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे.

ठळक मुद्दे- कमी दाबाने होणाºया पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पायपीट करावी लागते- वाशिष्ठीत पाणीसाठा झालाच तर र्खंिडत वीजपुरवठ्यामुळे पंपहाऊसमध्ये उपसा होत नाही. पाण्याची जुनी असणारी लाईन अनेक ठिकाणी फुटत असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम.

आवाशी : एक आठवडा लोटला तरी आवाशी (ता. खेड) गावात एमआयडीसीकडून पाण्याचा एकही थेंब येत नसल्याने कमालीची भीषणता उद्भवली आहे. पाण्यासाठी टाहो फोडत वणवण करणारा महिलावर्ग लवकरच एमआयडीसीच्या कार्यालयावर धडक देणार आहे.पस्तीस वर्षांपूर्वी येथे औद्योगिक वसाहत आली अन् हळूहळू परिसरासह गावाचा कायापालट होऊ लागला. येथील तरुणांच्या हाताला काम मिळाले. त्यामुळे सर्व सुखसोयी आपसूक प्राप्त होऊ लागल्या. गावच्या विकासाबाबत बोलायचे झाल्यास रस्ते, दिवाबत्तीसह वाडीवाडीवर प्रत्येकाच्या घरापर्यंत काँक्रिटच्या पाखाड्या पोहोचल्या. मात्र, हा विकासच आज त्यांना पाण्यापासून म्हणजेच मूलभूत गरजेपासून कोसो दूर घेऊन गेला. संपूर्ण रासायनिक वसाहत असणाऱ्या या गावातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत पूर्णत: निकामी झाले. पस्तीस वर्षांपूर्वी प्रत्येक वाडीत दोन ते तीन नैसर्गिक विहिरी होत्या.त्यामुळे पाण्याची समस्या कधीच उद्भवली नव्हती. मात्र, परिसरातील कंपन्यांच्या प्रदूषणामुळे त्या विहिरी मृत पावल्या गेल्या. साहजिकच आवाशी गाव हे पूर्णपणे एमआयडीसीच्या पाण्यावर अवलंबून आहे. तीन महिन्यांपासून या गावात पाणी भीषणटंचाई उद्भवली आहे. कधी - कधी आठवडाभर खंडित, तर अनेक वेळा कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे येथील महिलांना पायपीट करावी लागत आहे.

चालू आठवड्यात पाण्याचा एकही थेंब एमआयडीसीकडून या गावात आलेला नाही. गेल्या तीन दिवसांपासून अनेकजण ट्रॅक्टर वा टँकरचे पाणी विकत घेत आहेत. ज्यांना परवडत नाहीत, असे अनेक ग्रामस्थ घरातील भांडी व कपडे सुमारे दोन ते तीन किलोमीटर एवढी पायपीट करून पºयावर जात आहेत. मात्र, याबाबत कुणीही गंभीरपणे घेतले नाही.

आणखी काही दिवस अशीच परिस्थिती राहिल्यास या गावांवर विस्थापित होण्याची वेळ आल्यास आश्चर्य वाटू नये. वाशिष्ठी नदीत पुरेसा पाणीसाठा होत नाही. झालाच तर महावितरणकडून वारंवार होणाऱ्या खंडित विद्युत पुरवठ्यामुळे नदीतील उपसा पंपहाऊसमध्ये करता येत नाही. पाण्याची जुनी असणारी लाईन अनेक ठिकाणी फुटत असल्याने त्याचाही पाणीपुरवठ्यावर परिणाम होत आहे. एमआयडीसी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. मात्र, तांत्रिक अडथळे असल्याने ही समस्या उद्भवल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे सांगण्यात आले....तर कारखाने हवेत कशाला ?आमच्या जमिनी घेऊन आम्हाला भूमिहीन केलेत. त्याच जमिनीवर रासायनिक कारखाने उभारुन आमची शेती, फळबागा नामशेष झाल्या. जल व वायूप्रदूषणाने आरोग्यही धोक्यात आले. जलप्रदूषणामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत मृत झाले. एवढा अन्याय करुनही आम्हाला आता मूलभूत हक्कांपासून वंचित ठेवले जात असेल म्हणजेच पिण्यासाठी पाणीही उपलब्ध होत नसेल तर ती एमआयडीसी आणि कारखाने हवेतच कशाला? आमच्या जिवावर उठलेल्या या संबंधितांना जाब विचारण्यासाठी आम्ही एमआयडीसी कार्यालयावर धडकणार आहोत, असे महिलांनी सांगितले.पाणीटंचाईचे संकटकाहीच दिवसांवर शिमगोत्सव येऊन ठेपलेला असून, त्यावरही पाणीटंचाईचे सावट कायम आहे. त्यातच लग्नसराई सुरु असल्याने त्यालाही या समस्येची झळ सोसावी लागत आहे. गावात घरे बांधणीची कामे पाण्याविना बंद होऊ लागली आहेत. सध्या केवळ पाणीटंचाईनेच हे गाव चर्चेत आले आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी