शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

रत्नागिरी : खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 17:45 IST

इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़

ठळक मुद्दे खासगीपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला : आंचल गोयलआदर्श शिक्षक पुरस्काराचे मान्यवरांच्याहस्ते वितरण

रत्नागिरी : शिक्षक, शिक्षण आणि पैसा यांची तुलना आपण कधी करु शकत नाही़ जे जास्त शुल्क घेतात, तेथे चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत़ तसेच इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांंपेक्षा जिल्हा परिषद शिक्षकांचा दर्जा चांगला आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक कुठेही कमी नाहीत, असा विश्वास मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केला़शिक्षक दिनानिमित्त जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात उपस्थितांना मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी गोयत बोलत होत्या़.

त्या म्हणाल्या, आई-वडिलांनंतर शिक्षक आदर्श आहेत़ तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर त्यासाठी चार मूलमंत्र आहेत़ ते म्हणजे कठोर परिश्रम, सकारात्मक विचार, दृढनिश्चय आणि यशस्वी होण्यासाठी सतत प्रयत्न हे होय. आपल्यासमोर अडचण निर्माण झाल्यास या चार बाबी नेहमीच फॉलो करा, तुम्ही नेहमीच यशस्वी व्हाल, असा मंत्र गोयल यांनी यावेळी उपस्थित शिक्षकांना देऊन त्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनातील गोष्टींना उजाळा दिला.

ग्रामीण भागातील शिक्षकांबद्दल आपल्याला आदर आहे़ प्रत्येक शिक्षकाला जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिकवितो त्याबद्दल अभिमान वाटायला पाहिजे़ तसेच शिक्षकांनी काम केल्यास देशाची पुढील पिढी घडणार आहे, असाही त्यांनी विश्वास व्यक्त केला़.पुरस्कार वितरण सोहळ्याचे अध्यक्षस्थान जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरुपा साळवी यांनी भूषविले़ यावेळी उपाध्यक्ष संतोष गोवळे, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, बांधकाम व आरोग्य समिती सभापती विनोद झगडे, समाजकल्याण समिती सभापती प्रकाश रसाळ, महिला बालकल्याण समिती सभापतीपदी साधना साळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ बामणे, सदस्य उदय बने, कोकण विभागीय मंडळ अध्यक्ष रमेश गिरी, शिक्षणाधिकारी देवीदास कुल्लाळ, शिक्षक नेते विकास नलावडे, संतोष कदम, बाबाजी शिर्के, दिलीप देवळेकर, चंद्रकांत पावसकर आणि सर्व सभापती उपस्थित होते़.सुहास गुणाजी रांगले (मंडणगड), सुभाष सहदेव काताळकर (दापोली), संतोष दत्ताराम जाधव (खेड), संजय गोकुळ सोनावणे (चिपळूण), रवींद्र रामचंद्र कुळ्ये (गुहागर), प्रकाश धोंडू गेल्ये (संगमेश्वर), मैथिली संदेश लांजेकर (रत्नागिरी), सुहास रमाकांत वाडेकर (लांजा), तानाजी नारायण मासये (राजापूर) यांना गौरविण्यात आले़.कामगिरीवर शिक्षकजिल्ह्यातील अनेक शिक्षकांना कामगिरीवर काढण्यात आल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे़ त्यासाठी शिक्षकांची कामगिरी थांबवा, अशी मागणी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये केली़

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनRatnagiriरत्नागिरी