शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

रत्नागिरी: नगराध्यक्ष निवडणुकीत आरोपांच्या फैरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 5:36 PM

रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे.

रत्नागिरी: रत्नागिरीच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक येत्या २९ डिसेंबरला होत आहे. त्यामुळे राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. तर शिवसेना, शहर विकास आघडी व भाजप यांच्यात तेहरी लढत होण्याची शक्यता आहे. तर राजकीय आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत आहे. त्यामुळे रत्नागिरी नगराध्यक्षपदाची निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

तर शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना मिलिंद कीर यांनी अनेक विकासकामे अडवून ठेवली. लाखो रुपये खर्चून अर्धवट स्थितीत बांधलेला शहरातील परटवणे पूल वापराविना पडून आहे. शिवसेनेचे नगराध्यक्ष असताना पुलाचे काम आपण केल्याचे सांगणाऱ्या मिलिंद कीर यांनी अपूर्णावस्थेत असलेल्य पुलाची जबाबदारीही घ्यावी, रत्नागिरीकरांची दिशाभूल करू नये, असा टोला प्रभारी नगराध्यक्ष व नगराध्यक्ष निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार प्रदीप तथा बंड्या साळवी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  लगावला.

साळवी यांनी केलेल्या आरोपाला रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी उत्तर दिले आहे. रत्नागिरी शहरातील पटवणे पुलाच्या बॉक्सचे ४६ लाखांचे काम ७ मार्च २०१३पर्यंत आपण नगराध्यक्ष असताना पूर्ण केले होते. तसेच उर्वरित कामासाठी ६० लाखांचे अंदाजपत्रकही तयार केले होते. मात्र, २०१६ पासून नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता असताना थेट नगराध्यक्ष राहुल पंडित यांना विकासाची कामे करण्यामध्ये बंड्या साळवी यांनीच अडथळा केला. गेल्या ६ महिन्यांपासून साळवी यांनी कोणता विकास केला, हे दाखवून द्यावे, असा प्रतिहल्ला मिलिंद कीर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.

राज्यातील सत्तेच्या चाव्या हाती नसलेल्यांकडून जनतेला शहर विकासाच्या मोठ्या योजना दाखविल्या जात आहेत. आचारसंहितेपूर्वी कार्यादेश दिलेल्या रस्त्यांची कामे आम्ही पूर्ण केली आहेत. त्यामुळे जनता शिवसेनेच्याच पाठीशी राहील, असा विश्वास बंड्या साळवी यांनी व्यक्त केला. तर राहुल पंडित यांच्या नगराध्यक्षपद राजीनाम्यानंतर बंड्या साळवी हे गेल्या ६ महिन्यांपासून प्रभारी नगराध्यक्ष आहेत. शहरातील रस्त्यांवरील खड्यांच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी केल्यानंतरही पुन्हा नगर परिषदेच्या निधीतून बुजविण्यात आले आणि ठेकेदारांना पाठीशी घालण्यात आले, असा आरोप कीर यांनी केला आहे.