शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:48 IST

पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणारअपघातग्रस्त बस दापोली कोकण कृषी विद्यापीठाची

दापोली (रत्नागिरी) : पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एकुण 30 कर्मचा-यांचा या अपघातामध्ये  मृत्यू झाला होता. महाराष्ट्रच नव्हे तर देश या घटनेने हादरला होता. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. या अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यावर कदाचित अपघाताचे तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एम एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. या बस मधील ३१ कर्मचारी हे  राहुरीला महाबळेश्वर मार्गे चालले होते. हि गाडी रोहा येथुन या प्रवासासाठी मागविण्यात आली होती. 28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातुन सुटली होती. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला होता. या अपघातात बस सुमारे तब्बल १२००  फूट दरीत कोसळली होती.या अपघातात एकमेव प्रकाश सावंत झ्र देसाई हा कर्मचारी बचावला आहे. सावंत झ्र देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते. गाडी प्रवासा दरम्यान मातीच्या ढिगा-यावरून डावीकडुन खाली घसरून हा अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले आहे.

असे असले तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह हर्णे पाजपंढरी येथील मृतांचे नातेवाईक पी.एन.चोगले यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे. कोळी महासंघाकडुनही याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास यावरूनचे नेमके अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र असे ठसे आता तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर मिळतात का याकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत