शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

रत्नागिरी : आंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 16:48 IST

पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.

ठळक मुद्देआंबेनळी घाटातील अपघातग्रस्त बस दरीतून बाहेर काढली जाणारअपघातग्रस्त बस दापोली कोकण कृषी विद्यापीठाची

दापोली (रत्नागिरी) : पोलादपूर महाबळेश्वरच्या प्रवास दरम्यान येणारा आंबेनळी घाटात दोन महिन्यांपूर्वी झालेल्या भीषण अपघातात दरीत कोसळलेली दुर्घटनाग्रस्त बस येत्या 6 आक्टोंबर  रोजी बाहेर काढण्यात येणार आहे. ही बस बाहेर काढल्यानंतर आता पुढील तपासाला दिशा मिळणची शक्यता आहे.डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या एकुण 30 कर्मचा-यांचा या अपघातामध्ये  मृत्यू झाला होता. महाराष्ट्रच नव्हे तर देश या घटनेने हादरला होता. मात्र हा अपघात नेमका कशामुळे घडला याचे अद्याप कारण समजु शकलेले नाही. या अपघातग्रस्त बसची तपासणी केल्यावर कदाचित अपघाताचे तांत्रिक कारण समजण्याची शक्यता आहे. यावेळी तांत्रिक कारण समजण्याबरोबरच स्टेअरिंगवरील हाताचे ठसे मिळतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.एम एच 08 ई 9087 या क्रमांकाची ही 30 आसनी बस होती. या बस मधील ३१ कर्मचारी हे  राहुरीला महाबळेश्वर मार्गे चालले होते. हि गाडी रोहा येथुन या प्रवासासाठी मागविण्यात आली होती. 28 जुलै रोजी सकाळी 6.55 वाजता मध्यवर्ती कार्यशाळेच्या आवारातुन सुटली होती. त्यानंतर पोलादपूर महाबळेश्वर येथील आंबेनळी घाटात 11 ते 11.30 च्या दरम्यान हा दुर्देवी अपघात घडला होता. या अपघातात बस सुमारे तब्बल १२००  फूट दरीत कोसळली होती.या अपघातात एकमेव प्रकाश सावंत झ्र देसाई हा कर्मचारी बचावला आहे. सावंत झ्र देसाई यांनी विद्यापीठाच्या चौकशी समितीपुढे दिलेल्या जबाबानुसार बसमधील वाहनचालक दोन वेळा बदली करण्यात आले. बस चांगल्या स्थितीत होती. सदर अपघातावेळी प्रशांत भांबिड हे मुख्य वाहन चालक हे बस चालवत होते. गाडी प्रवासा दरम्यान मातीच्या ढिगा-यावरून डावीकडुन खाली घसरून हा अपघात झाल्याचे सावंत देसाई यांनी चौकशी समितीसमोर सांगितले आहे.

असे असले तरी बचावलेले प्रकाश सावंत देसाई यांच्यावर दापोलीचे आमदार संजय कदम यांच्यासह हर्णे पाजपंढरी येथील मृतांचे नातेवाईक पी.एन.चोगले यांनी संशय व्यक्त करणारे निवेदन शासनाकडे दिले आहे. कोळी महासंघाकडुनही याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.

मात्र अद्याप प्रकाश सावंत देसाई यांच्याविरोधातील कोणताही पुरावा सुरक्षायंत्रणेला मिळालेला नाही. त्यामुळे आता बसच्या स्टेअरिंगवर हातांचे ठसे मिळाल्यास यावरूनचे नेमके अपघातप्रसंगी कोण गाडी चालवत होते याची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र असे ठसे आता तब्बल दोन महिन्यानंतर स्टेअरिंगवर मिळतात का याकडे अनेकांचे लक्ष लागुन राहिले आहे.

टॅग्स :Satara Bus Accidentसातारा बस अपघातRatnagiriरत्नागिरीPoliceपोलिसDapoli Nagar Panchayatदापोली नगरपंचायत