शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:06 IST

रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरात कोकणातील पहिला नाना-नानी पार्क उभारणारशहरात घनकचरा प्रकल्प उभारणीचा प्रयत्न उदय सामंत, राहुल पंडित यांची - विचार मंथन २०१८ कार्यक्रमात ग्वाही

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यातर्फे शहरातील सर्वस्तरातील मान्यवरांना निमंत्रित करून वेध विकासाचा, रत्नागिरीच्या प्रगतीचा या विषयावरील विचारमंथन २०१८ कार्यक्रम रविवारी रात्री माळनाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.शहर विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी, सूचना व नवीन कल्पनांचे स्वागत करून त्यातील योग्य सूचना, कल्पना शहर विकासासाठी राबविण्याकरिता हा अभिनव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी नगरसेविका सुमिता भावे, ज्येष्ठ वकील बाबासाहेब परुळेकर, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.या विचारमंथन उपक्रमात रत्नागिरी शहरातील अनेक विकासकामांबाबत उहापोह झाला. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील रखडलेली पाणी योजना हा अत्यंत संवेदनशील विषय होता. वर्षभरापूर्वी मंजूर होऊनही या योजनेच्या कार्यवाहीत काही अडथळे आले आहेत.

मात्र, येत्या आठवडाभरात याप्रकरणी कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होईल. या योजनेच्या कार्यवाहीतील सर्व अडथळे दूर होऊन येत्या आठवडाभरानंतर काम सुरू होईल, अशी ग्वाही यावेळी आमदार सामंत व नगराध्यक्ष पंडित यांनी उपस्थितांना दिली.रत्नागिरी शहरातील विविध विकासप्रश्नांबाबतच्या या विचारमंथन कार्यक्रमात मान्यवरांनी आपली परखड मते मांडली. कचऱ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषदेतर्फे जो स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम सुरू आहे, त्यानुसार पुढे कायम कचरा संकलनाची व्यवस्था राबविण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली.

रत्नागिरी शहरातील पदपथांवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे लोकांनी चालावे कूठून असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे उठवून व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ (फूटपाथ) उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची सूचना पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केली.शवदाहिनी डिझेवरील असावीरत्नागिरी शहरात शवदाहिनी ही डिझेलवरील असावी, अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन कार्यक्रमात मांडली. डॉक्टर्स संघटनेतर्फेही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शवदाहिनी उभारण्याचा याआधीही प्रयत्न झाला. मात्र, परंपरेचा मुद्दा पुढे आल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.वनौषधी प्रकल्प होणाररत्नागिरी शहरात वनौषधींचा पथदर्शी प्रकल्प व्हावा, अशी संकल्पना मांडताना हा प्रकल्प व्हावा यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रयत्न केले होेते. वनौषधी कोणत्या, त्यांचा उपयोग काय, याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. हा वनौषधी प्रकल्प येत्या वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरात साकार होईल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीWaterपाणी