शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : पाणी योजना ८ दिवसात मार्गस्थ, उदय सामंत, राहुल पंडित यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2018 14:06 IST

रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.

ठळक मुद्देरत्नागिरी शहरात कोकणातील पहिला नाना-नानी पार्क उभारणारशहरात घनकचरा प्रकल्प उभारणीचा प्रयत्न उदय सामंत, राहुल पंडित यांची - विचार मंथन २०१८ कार्यक्रमात ग्वाही

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेसाठी राज्य शासनाने वर्षभरापूर्वी मंजुरी दिली. मात्र, वाढीव निधीसहित या सुधारित नळपाणी योजनेला येत्या आठ दिवसात राज्य शासनाला मंजुरी द्यावीच लागेल, अशी व्यूहरचना करण्यात आल्याची माहिती आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी रत्नागिरीकरांना दिली.नगराध्यक्ष राहुल पंडित यांच्यातर्फे शहरातील सर्वस्तरातील मान्यवरांना निमंत्रित करून वेध विकासाचा, रत्नागिरीच्या प्रगतीचा या विषयावरील विचारमंथन २०१८ कार्यक्रम रविवारी रात्री माळनाका, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.शहर विकासाबाबत चर्चा घडवून आणण्यासाठी, सूचना व नवीन कल्पनांचे स्वागत करून त्यातील योग्य सूचना, कल्पना शहर विकासासाठी राबविण्याकरिता हा अभिनव असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी व्यासपीठावर कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, माजी नगरसेविका सुमिता भावे, ज्येष्ठ वकील बाबासाहेब परुळेकर, खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, नगराध्यक्ष राहुल पंडित, सेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र महाडिक आदी उपस्थित होते.या विचारमंथन उपक्रमात रत्नागिरी शहरातील अनेक विकासकामांबाबत उहापोह झाला. त्यामध्ये प्रामुख्याने रत्नागिरी शहरातील रखडलेली पाणी योजना हा अत्यंत संवेदनशील विषय होता. वर्षभरापूर्वी मंजूर होऊनही या योजनेच्या कार्यवाहीत काही अडथळे आले आहेत.

मात्र, येत्या आठवडाभरात याप्रकरणी कोकण आयुक्तांसमोर सुनावणी होईल. या योजनेच्या कार्यवाहीतील सर्व अडथळे दूर होऊन येत्या आठवडाभरानंतर काम सुरू होईल, अशी ग्वाही यावेळी आमदार सामंत व नगराध्यक्ष पंडित यांनी उपस्थितांना दिली.रत्नागिरी शहरातील विविध विकासप्रश्नांबाबतच्या या विचारमंथन कार्यक्रमात मान्यवरांनी आपली परखड मते मांडली. कचऱ्यांच्या समस्येवर मात करण्यासाठी नगर परिषदेतर्फे जो स्वच्छ सर्वेक्षण उपक्रम सुरू आहे, त्यानुसार पुढे कायम कचरा संकलनाची व्यवस्था राबविण्यात यावी, अशी सूचना मांडण्यात आली.

रत्नागिरी शहरातील पदपथांवर अतिक्रमणे आहेत. त्यामुळे लोकांनी चालावे कूठून असा प्रश्न त्यामुळे निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणे उठवून व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ (फूटपाथ) उभारणे अत्यंत आवश्यक असल्याची सूचना पत्रकार अलिमियाँ काझी यांनी केली.शवदाहिनी डिझेवरील असावीरत्नागिरी शहरात शवदाहिनी ही डिझेलवरील असावी, अशी सूचना उपस्थित मान्यवरांनी विचारमंथन कार्यक्रमात मांडली. डॉक्टर्स संघटनेतर्फेही त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शवदाहिनी उभारण्याचा याआधीही प्रयत्न झाला. मात्र, परंपरेचा मुद्दा पुढे आल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही.वनौषधी प्रकल्प होणाररत्नागिरी शहरात वनौषधींचा पथदर्शी प्रकल्प व्हावा, अशी संकल्पना मांडताना हा प्रकल्प व्हावा यासाठी डॉ. श्रीरंग कद्रेकर यांनी प्रयत्न केले होेते. वनौषधी कोणत्या, त्यांचा उपयोग काय, याची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, हा या उपक्रमामागील हेतू आहे. हा वनौषधी प्रकल्प येत्या वर्षभरामध्ये रत्नागिरी शहरात साकार होईल, अशी ग्वाही आमदार उदय सामंत यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरीWaterपाणी