शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

रत्नागिरी : आंब्याची ७५ टक्के आवक घटली,  गुढीपाडव्याला शेतकऱ्यांनी केली आंबातोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2018 16:33 IST

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला. वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या.

ठळक मुद्देगतवर्षी याचदिवशी वाशी मार्केटला ६० हजार पेट्या विक्रीलाशेतकऱ्यांकडील आंबा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शेतकऱ्यांनी आंबातोडीचा मुहूर्त केला आहे. यावर्षी आंबा उत्पादन घटले असल्यामुळे हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच शेतकऱ्यांनी आंबा तोडणीचा हा मुहूर्त साधला.

वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये पाच हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. मात्र, रविवार असल्याने मार्केटला सुटी होती, त्यामुळे विक्री झालीच नाही. मात्र, सोमवारी दहा हजार पेट्या विक्रीला आल्या. दोन्ही दिवसांच्या मिळून १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या होत्या. गतवर्षी याच दिवशी ६० हजार पेट्या विक्रीला आल्या होत्या. गतवर्षीच्या तुलनेत आंबा उत्पादन यंदा ७५ टक्क्यांनी आवक घटली आहे.मे महिन्याप्रमाणे उष्म्याच्या झळा मार्चपासून सोसाव्या लागत आहेत. रत्नागिरीत ३३ अंश सेल्सिअस कमाल, तर २६ अंश किमान तापमान असल्यामुळे ह्यफळांचा राजाह्ण तयार होऊ लागला आहे. उष्म्यामुळे काही ठिकाणी आंब्यावर काळे डाग पडत आहेत. त्यामुळे या भाजलेल्या आंब्याला मागणी नाही.

शिवाय कैरीदेखील गळत असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. उष्णतेमुळे आंबा गळून पडण्याचा धोका वाढला आहे. कातळावरील बागांना याचा सर्वाधिक फटका बसत आहे. कातळ तापत असल्यामुळे आंब्याचा दर्जा घसरण्याचा धोका आहे. त्यामुळे काही शेतकरी झाडांना पाणी देत आहेत.उष्णतेमुळे आंबा भाजण्याचे, गळ होण्याचे प्रमाण वाढले, त्याचप्रमाणे आंबा लवकर तयार होऊ लागला आहे. वास्तविक यावर्षी पीक उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. गतवर्षी गुढीपाडव्याला ६० हजार पेट्या विक्रीला उपलब्ध होत्या. मात्र, यावर्षी दोन दिवसात १५ हजार पेट्या विक्रीसाठी आल्या.

सध्या १५०० ते ४००० रूपये दराने आंबा पेटीची विक्री सुरू आहे. यावर्षी आंबा उत्पादनच कमी असल्यामुळे शेतकऱ्यां नी आंबा उत्पादनासाठी केलेला खर्च भरून निघणेही अवघड झाले आहे. काही शेतकऱ्यांनी पाडव्याच्या मुहूर्तावर आंबाकाढणी केली असली तरी बहुतांश शेतकऱ्यांकडील आंबा हा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात तयार होण्याची शक्यता अधिक आहे.कोकणाबरोबर परराज्यातूनही आंबा तितक्याच प्रमाणात विक्रीला येत आहे. कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांमधून दररोज आंब्याची आवक होत आहे. हापूस, लालबाग, तोतापुरी, बदामी, गुहा आदी विविध प्रकारचा आंबा विक्रीसाठी येत आहे. मात्र, हा आंबा किलोवर विकण्यात येत असून, हापूस ५० ते १०० रूपये किलो, लालबाग २० ते ३५ रूपये किलो, तोतापुरी २० ते ३० रूपये किलो, गुहा २० रूपये किलो दराने विकण्यात येत आहे. तर कोकणातील हापूस आंबा डझनावर विकण्यात येत आहे.शासनाने दलालांची हमाली बंद केल्याने त्याचा परिणाम गतवर्षीपासून आंबा विक्रीवर झाला आहे. वाशी मार्केटमध्ये शेतकऱ्यांच्या आंब्याला फारसा दर मिळत नाही. मात्र, उपनगरांमध्ये होच आंबा अधिक किंमतीने विकण्यात येत आहे. कर्नाटक हापूसची कोकणचा हापूस म्हणून विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जात आहे. चौथ्या टप्प्यातील आंबा झाडावर आहे. मात्र, त्याचे प्रमाणही अल्पच आहे. तसेच उष्म्यामुळे तो कितपत टिकेल, अशी भीती शेतकऱ्यांना आहे.अत्यल्प प्रमाणयावर्षी ओखी वादळ, अवकाळी पाऊस, पुनर्मोहोर, वाढता उष्मा यामुळे आंबा पिकावर परिणाम झाला. बहुतांश शेतकऱ्यांनी आंबा अधिक प्रमाणात नसल्यामुळे आपल्याकडील नेपाळी कामगारांना परत पाठवले आहे. पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील आंबा तयार होऊन बाजारात येऊ लागला असला तरी त्याचे प्रमाण अत्यल्प आहे.

टॅग्स :fruitsफळेRatnagiriरत्नागिरी