शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

रत्नागिरी : महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:57 IST

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी भेट दिली.

ठळक मुद्दे महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयलकासारवेलीतील नळपाणी योजनेची पाहणी, वसुलीसाठी वाडीमध्ये एक पेटी

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास आॅटोमेशनचा व समदाबाने पाणी पुरवठा केल्यास योजना उत्तम प्रकारे चालू शकतील व पाणीपट्टी वसुलीही १०० टक्के होऊ शकेल, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.सन २००८मध्ये भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीकरिता नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. योजनेला सद्यस्थितीला १० वर्षे झाली असून ही योजना लोकसहभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध चालवण्यात येते. योजनेची पाणीपट्टी १०० टक्के कशा प्रकारे वसूल केली जाते, असे प्रश्न ग्रामस्थांना विचारण्यात आले. त्यावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वाडीमध्ये वसुलीसाठी पेटी तयार करण्यात आली आहे.पेटी दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाकडे फिरत असून, प्रत्येक महिन्यात त्या कुटुंबाची पाणीपट्टी त्या पेटील जमा केली जाते. सर्व ग्रामस्थ त्या कुटुंबाकडे ठरवण्यात आलेली ४० रुपये पाणीपट्टी लिफाफ्यामध्ये भरुन पेटीत टाकतात. ती पेटी महिन्याच्या १० तारखेला उघडली जाते. जमा झालेली पाणीपट्टी सर्वांकडून प्राप्त झाली आहे.अगर कसे ते तपासले जाते व ज्यांनी पाणीपट्टी भरली नसेल, त्याच्याकडून दुप्पट म्हणजेच ८० रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच जमा झालेल्या पाणीपट्टीचा ताळमेळ घेऊन आलेले लाईट बिल भरले जाते. उर्वरित रक्कम बँकेत जमा केली जाते, असे यावेळी उपस्थिांनी त्यांना माहिती देताना सांगितले.आॅटोमेशनमुळे मनुष्यबळाचा वापर नाहीयोजना महिलांच्या सहभागातून नियोजनबद्ध राबवली जाते, असे उपस्थित असणाऱ्या महिलांनी सांगितले. तसेच सर्वांना समान दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ही योजना उत्तम राबवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांनी प्रयत्न केले आहेत.

योजना चालू-बंद करण्यासाठी आॅटोमेशनचा वापर करण्यात आल्याने पाणी चालू करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जात नाही. त्यामुळे योजनेवरील खर्च कमी करण्यात आला आहे. त्यामुळे हे काम अधिक सोयीचे झाले आहे. ग्रामस्थांच्या या योजनेमुळे कासारवेली येथे नळपाणी पुरवठा योजना यशस्वीपणे राबविली जात असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद