शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 16:57 IST

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी भेट दिली.

ठळक मुद्दे महिलांच्या सहभागाने पाणीपट्टी वसुली १०० टक्के : आंचल गोयलकासारवेलीतील नळपाणी योजनेची पाहणी, वसुलीसाठी वाडीमध्ये एक पेटी

रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व योजनांमध्ये महिलांनी सहभाग घेतल्यास आॅटोमेशनचा व समदाबाने पाणी पुरवठा केल्यास योजना उत्तम प्रकारे चालू शकतील व पाणीपट्टी वसुलीही १०० टक्के होऊ शकेल, असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल यांनी व्यक्त केले.

रत्नागिरी तालुक्यातील कासारवेली या ग्रामपंचायतीमधील भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीमध्ये राबवण्यात आलेल्या नळपाणी पुरवठा योजनेला त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी हे विधान केले.सन २००८मध्ये भारत निर्माणअंतर्गत लक्ष्मीनारायण या वाडीकरिता नळपाणी पुरवठा योजना मंजूर झाली होती. योजनेला सद्यस्थितीला १० वर्षे झाली असून ही योजना लोकसहभागाच्या माध्यमातून नियोजनबद्ध चालवण्यात येते. योजनेची पाणीपट्टी १०० टक्के कशा प्रकारे वसूल केली जाते, असे प्रश्न ग्रामस्थांना विचारण्यात आले. त्यावर उपस्थित असलेल्या ग्रामस्थांनी वाडीमध्ये वसुलीसाठी पेटी तयार करण्यात आली आहे.पेटी दर महिन्याला प्रत्येक कुटुंबाकडे फिरत असून, प्रत्येक महिन्यात त्या कुटुंबाची पाणीपट्टी त्या पेटील जमा केली जाते. सर्व ग्रामस्थ त्या कुटुंबाकडे ठरवण्यात आलेली ४० रुपये पाणीपट्टी लिफाफ्यामध्ये भरुन पेटीत टाकतात. ती पेटी महिन्याच्या १० तारखेला उघडली जाते. जमा झालेली पाणीपट्टी सर्वांकडून प्राप्त झाली आहे.अगर कसे ते तपासले जाते व ज्यांनी पाणीपट्टी भरली नसेल, त्याच्याकडून दुप्पट म्हणजेच ८० रुपये पाणीपट्टी वसूल केली जाते. तसेच जमा झालेल्या पाणीपट्टीचा ताळमेळ घेऊन आलेले लाईट बिल भरले जाते. उर्वरित रक्कम बँकेत जमा केली जाते, असे यावेळी उपस्थिांनी त्यांना माहिती देताना सांगितले.आॅटोमेशनमुळे मनुष्यबळाचा वापर नाहीयोजना महिलांच्या सहभागातून नियोजनबद्ध राबवली जाते, असे उपस्थित असणाऱ्या महिलांनी सांगितले. तसेच सर्वांना समान दाबाने पाणी पुरवठा केला जातो. ही योजना उत्तम राबवण्यासाठी ग्रामपंचायत सरपंच यांनी प्रयत्न केले आहेत.

योजना चालू-बंद करण्यासाठी आॅटोमेशनचा वापर करण्यात आल्याने पाणी चालू करण्यासाठी मनुष्यबळाचा वापर केला जात नाही. त्यामुळे योजनेवरील खर्च कमी करण्यात आला आहे. त्यामुळे हे काम अधिक सोयीचे झाले आहे. ग्रामस्थांच्या या योजनेमुळे कासारवेली येथे नळपाणी पुरवठा योजना यशस्वीपणे राबविली जात असल्याचे दिसत आहे. 

टॅग्स :WaterपाणीRatnagiriरत्नागिरीzpजिल्हा परिषद