शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

रामदास कदम म्हणजे राजकारणातून संपलेला माणूस, अनिल परबांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:39 IST

सरकार त्यांचे आहे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताची चौकशी करावी

दापोली : रामदास कदम हा राजकारणातून संपलेला माणूस आहे, उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना राजकारणात कोणी विचारणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच जळी, स्थळी, पाषाणी त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत. सरकार त्यांचे आहे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताची चौकशी करावी, जो दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा करावी; परंतु, केवळ सनसनाटी निर्माण करायची, खोटे आरोप करायचे आणि राजकारणात चर्चेत राहायचे एवढेच रामदास कदम करत आहेत, असा आरोप माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दापोलीत केले.साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब गुरुवारी (१२ जानेवारी) न्यायालयात हजर होण्यासाठी दापोलीत आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजकारणात कोणीतरी आपल्याला सतत विचारत राहावे, म्हणून माझ्यावर व उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत सुरू आहे.

रामदास कदम यांचा मुलगा २०१९ ला निवडून आला. त्यावेळी मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी आमदार योगेश कदम यांना दिला. याबाबत खात्री करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असे परब म्हणाले; परंतु, केवळ आपले महत्त्व वाढवून घेण्यासाठी अनिल परब यांनी माझ्या मुलाचे करिअर बरबाद केले म्हणून ओरड करायची, ही त्यांची जुनीच सवय असल्याचे अनिल परब म्हणाले.रामदास कदम यांनी आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा झालेला अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयाची सुई माजी मंत्री अनिल परब यांच्या दिशेने होती. त्याबाबत त्यांना विचारले असता, रामदास कदम यांच्या बोलण्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचे सर्व आराेप अनिल परब यांनी फेटाळून लावले. सरकार त्यांचे असून, त्यांनी चाैकशी करावी. दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे परब म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबRamdas Kadamरामदास कदम