शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
3
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
4
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
5
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
6
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
7
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
8
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
9
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
10
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
11
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
12
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
13
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
14
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
15
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
16
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
17
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
18
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
19
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
20
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे

रामदास कदम म्हणजे राजकारणातून संपलेला माणूस, अनिल परबांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 18:39 IST

सरकार त्यांचे आहे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताची चौकशी करावी

दापोली : रामदास कदम हा राजकारणातून संपलेला माणूस आहे, उद्धव ठाकरे यांचे नाव घेतल्याशिवाय त्यांना राजकारणात कोणी विचारणार नाही याची त्यांना पुरेपूर कल्पना आहे. म्हणूनच जळी, स्थळी, पाषाणी त्यांना उद्धव ठाकरे दिसत आहेत. सरकार त्यांचे आहे, आमदार योगेश कदम यांच्या अपघाताची चौकशी करावी, जो दोषी असेल त्याला योग्य ती शिक्षा करावी; परंतु, केवळ सनसनाटी निर्माण करायची, खोटे आरोप करायचे आणि राजकारणात चर्चेत राहायचे एवढेच रामदास कदम करत आहेत, असा आरोप माजी परिवहनमंत्री अनिल परब यांनी दापोलीत केले.साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब गुरुवारी (१२ जानेवारी) न्यायालयात हजर होण्यासाठी दापोलीत आले हाेते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राजकारणात कोणीतरी आपल्याला सतत विचारत राहावे, म्हणून माझ्यावर व उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सतत सुरू आहे.

रामदास कदम यांचा मुलगा २०१९ ला निवडून आला. त्यावेळी मी जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. मी पालकमंत्री असताना सर्वाधिक निधी आमदार योगेश कदम यांना दिला. याबाबत खात्री करायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घ्या, असे परब म्हणाले; परंतु, केवळ आपले महत्त्व वाढवून घेण्यासाठी अनिल परब यांनी माझ्या मुलाचे करिअर बरबाद केले म्हणून ओरड करायची, ही त्यांची जुनीच सवय असल्याचे अनिल परब म्हणाले.रामदास कदम यांनी आमदार योगेश कदम यांच्या गाडीचा झालेला अपघात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त केला आहे. संशयाची सुई माजी मंत्री अनिल परब यांच्या दिशेने होती. त्याबाबत त्यांना विचारले असता, रामदास कदम यांच्या बोलण्याला कोणताही अर्थ नसल्याचे सांगितले. तसेच त्यांचे सर्व आराेप अनिल परब यांनी फेटाळून लावले. सरकार त्यांचे असून, त्यांनी चाैकशी करावी. दाेषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे परब म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परबRamdas Kadamरामदास कदम