शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

विधानसभेसाठी महायुतीकडे रामदास आठवलेंनी केली १८ जागांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 11:52 IST

मराठा आरक्षण हवे, पण..

रत्नागिरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे आपण रिपब्लिकन पार्टीसाठी विधानसभेच्या १८ जागांची मागणी केली आहे. त्यातील १२ जागा आम्हाला मिळतील, अशी अपेक्षा आहे. जर आम्हाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळाले तर त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चितच होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.रत्नागिरी येथे पत्रकार परिषदेमध्ये ते पुढे म्हणाले, मागील लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा धरून विरोधकांनी खोटा प्रचार केला. मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला. परंतु, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला चांगले यश मिळेल. या निवडणुकीत रिपाइंला योग्य प्रतिनिधित्व मिळेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले. लाडकी बहीण योजनेचा महायुतीला मोठा फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

मराठा आरक्षण हवे, पण..मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे. १० टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. पण, मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा विचार करावा. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये, पण मराठ्यांनाही आरक्षण मिळाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.अजित पवार नसते तर..महायुतीमध्ये उद्धव ठाकरे यांना अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद द्यावे, असेे आपण युतीच्या नेत्यांना सांगितले होते. जर ते दिले असते तर आज अशी परिस्थिती नसती, तसेच महायुतीमध्ये अजित पवार सहभागी झाले नसते तर रिपाइंला राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असते, असेही त्यांनी सांगितले.

‘एक निवडणूक’ला पाठिंबालोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र घेण्यासाठी ‘एक देश आणि एक निवडणूक’ याला रिपाइंचा पाठिंबा असल्याचे सांगितले. तसेच स्वातंत्र्यानंतर झालेल्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित झाल्या होत्या. विरोधकांनीही याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीRamdas Athawaleरामदास आठवले