शहरं
Join us  
Trending Stories
1
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
2
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
3
“जनतेने नाकारल्यामुळे ठाकरे बंधूंना आता एकत्र येण्याची गरज वाटतेय”; भाजपाचा खोचक टोला
4
भारतीय संशोधकांनी लावलेल्या शोधाचा चीनने घेतला लाभ, अमेरिका, रशियाही अवाक्, भारताने संधी दवडली  
5
महापालिका निवडणुकीस BJP सज्ज, कार्यकर्त्यांना नवे बळ; संघटनबांधणी मजबूत, पक्षशक्ती भक्कम
6
मुकेश अंबानींची रोजची कमाई किती? आकडा वाचून बसेल धक्का; दर तासाला कुठून येतात कोट्यवधी रुपये
7
धक्कादायक! उत्तर प्रदेशातील 'ब्लू ड्रम'नंतर आता उत्तराखंडमध्ये पत्नीने पेट्रोल ओतून पतीला जाळले
8
“उद्धव ठाकरे महाराष्ट्र सैनिकांची माफी मागणार का?”; युती चर्चांवर मनसे नेत्याचा थेट सवाल
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला धक्का! 'ही' दिग्गज कंपनी ८०० हून अधिक कर्मचाऱ्यांना काढणार
10
सर्वोच्च न्यायालयाचा अपमान, निशिकांत दुबे अडचणीत; कारवाई होणार? भाजपने हात झटकले...
11
झांबियामध्ये १९ कोटी रुपये अन् ४ कोटींचे सोने घेऊन जाताना भारतीयाला पकडले; दुबईला जाण्याच्या तयारीत होता
12
घरगुती मीटरवर इलेक्ट्रीक कार चार्ज केली; केला २५००० चा दंड, कार मालक रडकुंडीला आला...
13
IPL 2025 : सतरावं वरीस मोक्याचं! युवा क्रिकेटरच्या 'विरार टू चेन्नई व्हाया मुंबई' प्रवासाची गोष्ट
14
मुकेश अंबानींच्या रिलायन्सपासून ते टाटा ग्रुपपर्यंत, या १० कंपन्यांनी फक्त ३ दिवसांत कमावला मोठा नफा
15
वैजापूरमध्ये पहाटे थरार! चोरीच्या प्रयत्नात बँक जळून खाक...खातेदारांच्या पैशांचे काय होणार?
16
वैभव सूर्यवंशीच्या धडाकेबाज खेळाने गुगलचे सीईओही भारावले, सुंदर पिचाई कौतुक करत म्हणाले, "वयाच्या १४ व्या वर्षी…’’  
17
पंचग्रही योगात नववर्षाचे पहिले पंचक: ५ दिवस प्रतिकूल, अशुभ; ५ कामे टाळा, नेमके काय करू नये?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
19
पुण्यात कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू, वॉटर पार्कमध्ये झिपलायनिंग करताना...
20
भीषण अपघात! लग्नावरून परतणाऱ्या तरुणांची कार गॅस टँकरला धडकली, २ जणांचा मृत्यू ,एक जखमी

Ratnagiri: राजापूरचे रेल्वे स्थानक चकाचक, प्रवासी मात्र वाऱ्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 18:13 IST

डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले. मात्र, या बोर्डमधील वीज बंद

राजापूर : कोकण रेल्वे मार्गावरील काही स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यामध्ये राजापूर स्थानकाचाही समावेश आहे. सुमारे ४ कोटी खर्च करून रेल्वे स्थानकाचे सुशाेभीकरण केले आहे. मात्र, दोन महिन्यांतच या स्थानकाच्या नावाचे बोर्ड खराब झाले आहेत. तसेच, चेहरा मोहरा बदललेल्या स्थानकात अनेक गाड्यांना थांबाच नसल्याने येथील प्रवासी अजूनही वाऱ्यावरच आहेत. ‘स्थानक सुधारले, पण प्रवासी वाऱ्यावर’ अशी अवस्था सध्या झाली आहे.कोकण रेल्वे मार्गावर जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि खेड नंतर महत्त्वाचे स्थानक म्हणजे राजापूर रोड स्थानक आहे. त्याव्यतिरिक्त सौंदळ येथे हॉल्ट स्थानक असून, तेथे केवळ दिवा - सावंतवाडी ही एकमेव पॅसेंजर एक ते दोन मिनिटे थांबते. कोराेनाआधी रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर सुरु होती. या गाडीला साैंदळ थांबा होता. मात्र, काेराेना काळात ही गाडी बंद झाली. ती काही पुन्हा सुरू झालेली नाही.

राजापूर शहरापासून सुमारे पंधरा ते वीस किलाेमीटर अंतरावर राजापूर रोड रेल्वेस्थानक आहे. या स्थानकात मांडवी, कोकणकन्या आणि तुतारी या नियमित एक्स्प्रेससह उधना, नागपूर आणि अलीकडे सुरू झालेली थिविम, अहमदाबाद या गाड्यांसह दिवा - सावंतवाडी ही पॅसेंजर याठिकाणी थांबते. उर्वरित गाड्यांना थांबे नाहीत. त्यामुळे या स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसाेय हाेत आहे. वारंवार मागणी करुनही अन्य गाड्यांना थांबा दिला जात नसल्याने स्थानक चकाचक पण प्रवासी वाऱ्यावर अशीच स्थिती निर्माण झाली आहे.या रेल्वेस्थानकाचे सुशाेभीकरण करण्यात आले आहे. सुशोभीकरणात स्थानकाच्या दर्शनी गेटवर डिजिटल एलईडी लाईटचे बोर्ड बसवले आहेत. मात्र, या बोर्डमधील वीज बंद पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. राजापूर या अक्षरातीलच वीज खराब झाल्याने या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRajapurराजापुरrailwayरेल्वेpassengerप्रवासी