शहरं
Join us  
Trending Stories
1
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
2
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
3
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
4
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
5
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
6
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
7
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
8
“चार्टर्ड अकाउंटंटच देशाचे आर्थिक शिल्पकार”; ICAI परिषदेत DCM एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
9
“संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ”: हर्षवर्धन सपकाळ
10
Uddhav Thackeray : ​​​​​​​"...तर उपमुख्यमंत्रीपद रद्द करा", उद्धव ठाकरे यांची सरकारकडे मोठी मागणी
11
'लाडकी बहिण योजना' सर्वात जास्त 'लाडकी'! ४६% पुरुषांचाही महिलांच्या आर्थिक उन्नतीला पाठिंबा
12
अबतक २००००! हिटमॅन रोहित शर्मानं रचला इतिहास; आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये गाठला मैलाचा पल्ला
13
एकनाथ शिंदेमुळेच भाजपा पुन्हा सत्तेत, ताकदवान व्हायला उठावच कारणीभूत - शंभूराज देसाई
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: ‘या’ ५ गोष्टी अवश्य अर्पण करा; गणपतीची कायम कृपा मिळवा!
15
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
16
समस्या संपत नाहीत, पैसा राहत नाही? गणेशाचे प्रभावी स्तोत्र ११ वेळा म्हणा; अद्भूत अनुभव घ्या!
17
अरे बापरे! Grok वापरणाऱ्यांनो सावधान; लोकांच्या घराचे पत्ते, पर्सनल माहिती लीक, प्रायव्हसी धोक्यात
18
IND vs SA : कुलदीप KL राहुलकडे DRS चा हट्ट धरायला गेला, मग हिटमॅन रोहित 'कॅप्टन' झाला अन्... (VIDEO)
19
एलॉन मस्क यांच्या 'X' ला तब्बल १०८० कोटींचा दंड ! 'ब्लू टीक' संदर्भातील प्रकरणात बसला दणका
20
GenZमध्ये महाराष्ट्र सरकारची कार्यशैली लोकप्रिय; ६७% तरुणाईला देवेंद्र फडणवीसांवर 'विश्वास'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत पावसाने घेतली विश्रांती, आठवडाभरानंतर झाले सूर्यदर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 16:08 IST

रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. ...

रत्नागिरी : गुरुवारी सकाळपासूनच पावसाने पूर्णपणे विश्रांती घेण्यास सुरुवात केली आहे. सकाळी कडकडीत ऊन पडल्याने वातावरण आल्हाददायी वाटत होते. आठवड्यानंतर नागरिकांना सूर्यदर्शन झाले. जिल्ह्यात राजापूर, खेड, चिपळूण या तालुक्यांमधील पाणी ओसरले असून, जनजीवन सुरळीत झाले आहे. या कालावधीत पडलेल्या पावसामुळे पावसाची घटलेली आकडेवारी वाढण्यास मदत झाली.१३ ऑगस्टपासून पावसाने जिल्हाभरात संततधार धरली होती. सलग सुरू झालेल्या या अतिवृष्टीमुळे राजापूर, चिपळूण, खेड आदी तालुक्यांना अधिक फटका बसला. तेथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले. पावसाची दिवसरात्र संततधार सुरू होती. जोडीला वाऱ्याचा जोर असल्याने अनेक घरांचे, गोठ्यांचे तसेच इतर मालमत्तांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. रस्ते खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्येही वाढ झाली होती. दरडप्रवण आणि पूरप्रवण भागातील ४४ कुटुंबांतील ११७ लोकांचे स्थलांतर करण्यात आले.गुरुवारी सायंकाळपर्यंत पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली होती. त्यानंतरही काही ठिकाणी हलक्या सरी पडल्या. २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात मध्यम व हलक्या सरी पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात २४४२ मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या ७२.५८ टक्के पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे.