शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला; जगबुडी पुन्हा इशारा पातळीवर

By शोभना कांबळे | Updated: July 14, 2023 17:55 IST

काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली

रत्नागिरी : जिल्ह्यात काल, गुरुवार रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. दरम्यान, खेडमधील जगबुडी नदीच्या पाण्याच्या पातळीने आज, शुक्रवारी इशारा पातळी ओलांडण्यास सुरुवात केली. मधूनच काही काळ विश्रांती घेऊन पावसाने जोर धरला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण सुमारे ६०० मिलिमीटरने कमी आहे.जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत पावसाने जिल्हाभरात चांगली सुरुवात केली होती. मात्र, त्यानंतर पावसाचे प्रमाण कमी झाले. गेल्या रविवारपासून चार दिवस गायब झालेला पाऊस गुरुवार रात्रीपासून संततधारेने पडण्यास सुरुवात झाली. सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. मात्र, त्यानंतर रिमझिम सुरू होती. दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पावसाचा जोर वाढला. दिवसभर पावसाचे वातावरण कायम होते. दिवसभरात जोरदार सरी पडत असल्या तरीही अधूनमधून विश्रांती घेत पावसाची वाटचाल सुरू आहे.पाऊस कमी झाल्याने जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. खेडमधील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपर्यंत गेली होती. मात्र, ही पातळी इशारा पातळीपेक्षाही कमी झाली होती. मात्र, काल, गुरुवारी रात्रीपासून पावसाला जोरदार सुरुवात झाल्यानंतर जगबुडी नदीची पातळी पुन्हा वाढू लागली असून शुक्रवारी इशारा पातळीही ओलांडली. दरम्यान, हवामान खात्याने १७ जुलैपर्यंत जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसriverनदी