शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
2
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
3
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
4
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
5
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
6
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
7
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
8
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
9
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
10
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
11
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
12
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
13
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
14
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
15
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
16
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
17
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा
18
मुंबईविरुद्ध सामन्यात चेन्नईचे खेळाडू काळी पट्टी बांधून मैदानात का उतरले? जाणून घ्या कारण
19
लग्नाच्या वरातीवर काळाचा घाला, दरीत कोसळली गाडी; ६ जणांचा मृत्यू, वधू-वर गंभीर जखमी
20
Swapna Shastra: स्वप्नात 'या' गोष्टींचे दिसणे म्हणजे वर्षाखेरीपर्यंत संसाराला लागणार याची चिन्हं!

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 20:56 IST

वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.

लांजा/राजापूर : वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.बुधवारी सायंकाळी ५ वाजता ढगांच्या गडगडाटसह अवकाळी गाराचा पाऊस लांजा तालुक्यातील पश्चिम भागात कोसळला. तसेच लांजा शहरातदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास २० मिनिटे  पाऊस कोसळत होता. जमिनीवर पडलेल्या गारा जमा करण्यासाठी बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटत होती.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाचल परिसरात कोसळलेल्या सरींमुळे अनेकांची धावपळ उडाली होती. बाजारात आलेल्या नागरिकांचीदेखील धांदल उडाली होती. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे काजू  आंबा बागायतदार यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.  बुधवारी पडलेल्या पावसामुळे आंबा डागाळू शकतो. काजूची देखील हीच अवस्था झाल्याने सर्वसामान्य शेतक-यांवर आसमानी संकट ओढवले आहे .

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी