शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2018 20:56 IST

वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.

लांजा/राजापूर : वातावरणात उष्म्याचे प्रमाण वाढले असतानाच बुधवारी सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर तालुक्यात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झाला होता. मात्र, या अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. जिल्ह्यातील अन्य भागातही पावसाळी वातावरण होते.बुधवारी सायंकाळी ५ वाजता ढगांच्या गडगडाटसह अवकाळी गाराचा पाऊस लांजा तालुक्यातील पश्चिम भागात कोसळला. तसेच लांजा शहरातदेखील पावसाच्या सरी कोसळल्या. जवळपास २० मिनिटे  पाऊस कोसळत होता. जमिनीवर पडलेल्या गारा जमा करण्यासाठी बच्चे कंपनी पावसाचा आनंद लुटत होती.राजापूर तालुक्यातील पूर्व भागातदेखील अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. पाचल परिसरात कोसळलेल्या सरींमुळे अनेकांची धावपळ उडाली होती. बाजारात आलेल्या नागरिकांचीदेखील धांदल उडाली होती. अवकाळी पडलेल्या या पावसामुळे काजू  आंबा बागायतदार यांचे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.  बुधवारी पडलेल्या पावसामुळे आंबा डागाळू शकतो. काजूची देखील हीच अवस्था झाल्याने सर्वसामान्य शेतक-यांवर आसमानी संकट ओढवले आहे .

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी