शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

दिलासा! पावसाच्या सरींनी रत्नागिरीकर चिंब, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता

By शोभना कांबळे | Published: September 08, 2023 1:16 PM

यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली

रत्नागिरी : ऑगस्ट महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने शुक्रवारी (८ सप्टेंबर) सकाळपासून पुन्हा काेसळण्यास सुरूवात केली. पावसाच्या संततधारेने रत्नागिरीकरांना दिलासा मिळाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून, येत्या तीन दिवसात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या चिंतेने ग्रासलेल्या नागरिकांमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे.यंदा जुलैचा दुसरा पंधरवडा वगळता पावसाने निराशाच केली आहे. यंदा जून, जुलै महिन्याचे पहिले पंधरा दिवस आणि ऑगस्टमध्ये फारसा पाऊस पडलेला नाही. गेल्या वर्षीही साधारण ३ हजार मिलिमीटर सरासरी एवढा वार्षिक पाऊस पडला हाेता. गेल्यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीच्या काळात तसेच ऑगस्ट महिन्यात पावसाने चांगली मदत केली होती.यंदा जूनच्या शेवटी मान्सूनचे आगमन झाले. मात्र, जुलै महिन्याचे १६ - १७ दिवस पावसाची पाठच होती. त्यानंतर ऑगस्ट महिन्यातही फारसा पाऊस पडला नाही. त्यामुळे यंदा पाण्याची टंचाई लवकर भासणार असल्याची भीती व्यक्त होत होती. पाऊस गायब झाल्याने उकाड्यालाही सुरूवात होऊ लागल्याने नागरिक हैराण होत होते.परंतु, एक-दोन दिवसांपासून पावसाच्या सरींना अधूनमधून सुरूवात झाली होती. गुरूवारी सकाळीही चांगल्या सरी पडल्या. शुक्रवारी पहाटेपासून पावसाने अधिकच जोर घेतला. दुपारपर्यंत पावसाची संततधार सुरू होती. त्यांनतर थोडी विश्रांती घेतली. मात्र, दिवसभर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता दिसत होती.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस