शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
3
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
4
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
5
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
6
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
7
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
8
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
9
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
10
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
11
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
12
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
13
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
14
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
15
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
16
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
17
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
18
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
19
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
20
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं

कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:59 IST

Konkan, Chiplun, Water, Koyna, Ratnagirinews कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

ठळक मुद्देकोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवावर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल

चिपळूण : वीजनिर्मितीनंतर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. दरवर्षी ६७ टीएमसी पाणी वाया जात आहे. हे पाणी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल.

हे अवजल मुंबई किंवा अन्यत्र नेण्यास कोणाचाही विरोध असता कामा नये. परंतु ही योजना आखताना कोकणची पाणी टंचाई कशी दूर होईल आणि कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.कोयना अवजलाबाबत अनेक वेळा राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्यांमार्फत अहवाल तयार केलेले आहेत. या अहवालांचा अभ्यास करुन मुंबईसह संपूर्ण कोकणची पाणी टंचाई दूर करण्याची क्षमता कोयनेच्या अवजलामध्ये आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योजना तयार झाल्यास कोकण समृध्द होईल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक तरतूदही झाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम सोडले आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वे मध्यरेल्वेशी जोडली जाणार आहे.

मुख्यमंत्री या नात्याने आपण त्याचा पाठपुरावा करावा. चिपळूण शहराची लोकसंख्या ८० हजारच्या वर गेली आहे. कोयनेचे अवजल चिपळूण शहराला मिळाल्यास लाखोंचे वीज बिल वाचणार आहे, असेही त्यांनी या मागणीत नमूद केले आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईRatnagiriरत्नागिरी