शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:59 IST

Konkan, Chiplun, Water, Koyna, Ratnagirinews कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

ठळक मुद्देकोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवावर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल

चिपळूण : वीजनिर्मितीनंतर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. दरवर्षी ६७ टीएमसी पाणी वाया जात आहे. हे पाणी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल.

हे अवजल मुंबई किंवा अन्यत्र नेण्यास कोणाचाही विरोध असता कामा नये. परंतु ही योजना आखताना कोकणची पाणी टंचाई कशी दूर होईल आणि कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.कोयना अवजलाबाबत अनेक वेळा राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्यांमार्फत अहवाल तयार केलेले आहेत. या अहवालांचा अभ्यास करुन मुंबईसह संपूर्ण कोकणची पाणी टंचाई दूर करण्याची क्षमता कोयनेच्या अवजलामध्ये आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योजना तयार झाल्यास कोकण समृध्द होईल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक तरतूदही झाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम सोडले आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वे मध्यरेल्वेशी जोडली जाणार आहे.

मुख्यमंत्री या नात्याने आपण त्याचा पाठपुरावा करावा. चिपळूण शहराची लोकसंख्या ८० हजारच्या वर गेली आहे. कोयनेचे अवजल चिपळूण शहराला मिळाल्यास लाखोंचे वीज बिल वाचणार आहे, असेही त्यांनी या मागणीत नमूद केले आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईRatnagiriरत्नागिरी