शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
5
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
6
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
7
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
8
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
9
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
10
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
11
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
12
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
13
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
14
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
15
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
16
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
17
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
18
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
19
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
20
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ

कोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 17:59 IST

Konkan, Chiplun, Water, Koyna, Ratnagirinews कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.

ठळक मुद्देकोयनेच्या अवजलातून कोकणची तहान भागवावर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल

चिपळूण : वीजनिर्मितीनंतर कोयनेचे पाणी वाशिष्ठी नदीच्या माध्यमातून अरबी समुद्राला जाऊन मिळते. दरवर्षी ६७ टीएमसी पाणी वाया जात आहे. हे पाणी रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात खेळविल्यास वर्षानुवर्षे असलेली पाणी टंचाई कायमची दूर होईल.

हे अवजल मुंबई किंवा अन्यत्र नेण्यास कोणाचाही विरोध असता कामा नये. परंतु ही योजना आखताना कोकणची पाणी टंचाई कशी दूर होईल आणि कोकणात सिंचन क्षेत्र कसे वाढेल, याचा विचार या योजनेने प्राधान्याने करायला हवा, अशी मागणी आमदार शेखर निकम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदन देत केली आहे.कोयना अवजलाबाबत अनेक वेळा राज्य शासनाने वेगवेगळ्या समित्यांमार्फत अहवाल तयार केलेले आहेत. या अहवालांचा अभ्यास करुन मुंबईसह संपूर्ण कोकणची पाणी टंचाई दूर करण्याची क्षमता कोयनेच्या अवजलामध्ये आहे. त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेऊन योजना तयार झाल्यास कोकण समृध्द होईल.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पाला केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तसेच आर्थिक तरतूदही झाली आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने हे काम सोडले आहे. या प्रकल्पामुळे कोकण रेल्वे मध्यरेल्वेशी जोडली जाणार आहे.

मुख्यमंत्री या नात्याने आपण त्याचा पाठपुरावा करावा. चिपळूण शहराची लोकसंख्या ८० हजारच्या वर गेली आहे. कोयनेचे अवजल चिपळूण शहराला मिळाल्यास लाखोंचे वीज बिल वाचणार आहे, असेही त्यांनी या मागणीत नमूद केले आहे.

टॅग्स :Damधरणwater scarcityपाणी टंचाईRatnagiriरत्नागिरी