शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत कमी लोकसंख्येमुळे आरोग्य केंद्र स्थापनेस अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 16:41 IST

कोकणातील ग्रामीण भागात कमी लोकसंख्येमुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी अडचणी येत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियमामुळे अडचणी असल्याचे स्पष्ट केले.

ठळक मुद्देरत्नागिरीत कमी लोकसंख्येमुळे आरोग्य केंद्र स्थापनेस अडचणीनिरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर राज्य सरकारची कबूली

रत्नागिरी : कोकणातील ग्रामीण भागात कमी लोकसंख्येमुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी अडचणी येत असल्याचे राज्य सरकारने मान्य केले आहे. भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्या प्रश्नावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नियमामुळे अडचणी असल्याचे स्पष्ट केले.प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेसाठी लोकसंख्येचा निकष ५ हजार ठेवण्यात आला आहे. मात्र, कोकणातील ग्रामीण भागाची लोकसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे आरोग्य उपकेंद्राच्या स्थापनेस अडचणी येत असल्याचा तारांकित प्रश्न आमदार निरंजन डावखरे यांनी मांडला होता. त्यावेळी मंत्री राजेश टोपे यांनी अंशत खरे असल्याचे उत्तर दिले.आरोग्य विभागाच्या बृहत आराखड्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे, २ उपकेंद्र आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ उपकेंद्र नव्याने मंजूर करण्यात आले असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील विरसई गावाची लोकसंख्या ६८० आहे. डवली उपकेंद्रांपासून विरसई पाच किलोमीटरवर आहे. विरसई परिसरातील ५ गावांची लोकसंख्या २ हजार ३७१ आहे. त्यामुळे तेथे नवीन उपकेंद्र स्थापन करण्यात येणार नसल्याचे आरोग्य मंत्री टोपे यांनी सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलRatnagiriरत्नागिरी