शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:13 IST

जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

चिपळूण : जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून, शनिवारीही पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा येथील भारतीय हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या संदेशानुसार २४ जून २०२२ ते २७ जून २०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. २४ जून ते २८ जून २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० किलाेमीटर ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे.मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानंतर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली होती. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शनिवारी सकाळपासून अनेक भागात शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी