शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
6
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
7
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
8
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
9
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
10
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
11
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
12
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
13
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
14
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
15
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
16
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
17
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
18
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
19
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले

दिलासा! रत्नागिरी जिल्ह्यात पावसाची हजेरी, शेती कामाला जोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2022 14:13 IST

जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.

चिपळूण : जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यानुसार जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असून, शनिवारीही पावसाची संततधार सुरुच आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रत्नागिरीसह संगमेश्वर, दापाेली, गुहागर, खेड या भागात पावसाला सुरुवात झाली आहे.जिल्ह्यात पुढील तीन दिवसांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता कुलाबा येथील भारतीय हवामान खात्यातर्फे वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्याच्या संदेशानुसार २४ जून २०२२ ते २७ जून २०२२ या कालावधीमध्ये जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. २४ जून ते २८ जून २०२२ या कालावधीत दक्षिण महाराष्ट्र व गोवा किनारा ठिकाणी ताशी ४०-५० किलाेमीटर ते ६० किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहण्याचा इशारा वर्तविण्यात आला आहे.मच्छिमारांनी या कालावधीत मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये. तसेच नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.हवामान खात्याच्या अंदाजानंतर जिल्ह्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे. जिल्ह्यातील अनेक भागात पाऊस पडत असल्याने शेतकरी सुखावला आहे. सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर शेतीच्या कामाला सुरुवात करण्यात आली हाेती. मात्र, त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पेरणी खोळंबली होती. पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने शनिवारी सकाळपासून अनेक भागात शेतकरी शेतीच्या कामाला लागले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊसFarmerशेतकरी