शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
3
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
5
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
6
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
7
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
8
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
9
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
10
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
11
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
12
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
13
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
14
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
15
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
16
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
17
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
18
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
19
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
20
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!

रत्नागिरी जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांत संभाव्य पाणी टंचाई,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 15:16 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.

ठळक मुद्दे२६१ गावातील ४८६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई, ८ गावांमध्ये खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण.९८ गावांतील २३९ वाड्यांना देणार ३३ टँकरने पाणी, पाणी योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाखांची तरतूद.यावर्षी पाण्याची झळ मार्चपासून, काही ठिकाणी आतापासूनच एकदिवसा आड पाणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा हा आराखडा जिल्हा परिषदेने केला आहे.

आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात ९८ गावातील २९३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ३३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.या आराखड्यानुसार विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढण्याचे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. यंदाच्या आराखड्यानुसार लांजा तालुक्यात ८ गावातील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखड्यामध्ये ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षीच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये एकही नवीन विंधन विहीर घेण्यात आलेली नव्हती. कारण विंधन विहिरींची कामे जिल्हा नियोजनमधून घेण्यात आली होती. मात्र, यंदा ११० गावातील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये केली आहे. मात्र, याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

या आराखड्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६४ नादुरुस्त योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यंदाचा टंचाईकृती आराखडा मंजुरीसाठी सादर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कृती आराखडा मंजूर करण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मागील इतिहास पाहता जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करुन तो मंजूर करण्यात येतो.गावे, वाड्यांची संख्या कमीयंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५००पेक्षा जास्त वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागात पाणी अडवण्यात आल्याने तेथील विहिरी व बंधाऱ्यांच्या आजूबाजूची पाण्याची पातळी वाढल्याने यंदा पाणीटंचाई कमी उद्भवणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी