शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

रत्नागिरी जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांत संभाव्य पाणी टंचाई,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 15:16 IST

रत्नागिरी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.

ठळक मुद्दे२६१ गावातील ४८६ वाड्यांमध्ये संभाव्य पाणीटंचाई, ८ गावांमध्ये खासगी विहिरींचे करणार अधिग्रहण.९८ गावांतील २३९ वाड्यांना देणार ३३ टँकरने पाणी, पाणी योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाखांची तरतूद.यावर्षी पाण्याची झळ मार्चपासून, काही ठिकाणी आतापासूनच एकदिवसा आड पाणी

रत्नागिरी : जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून जिल्ह्याचा एकूण ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला असून, तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. जिल्ह्यातील २६१ गावातील ४८६ वाड्यांचा संभाव्य पाणी टंचाईग्रस्तांमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, जिल्हा प्रशासनाने अजूनही या कृती आराखड्याला मंजुरी दिलेली नाही.पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी जिल्हा परिषदेकडून संभाव्य टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. त्याप्रमाणे यंदाही ५ कोटी ४९ लाख ८० हजार रुपयांचा हा आराखडा जिल्हा परिषदेने केला आहे.

आराखड्यानुसार येत्या उन्हाळ्यात ९८ गावातील २९३ वाड्यांना पाणीटंचाई भेडसावण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यासाठी ३३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यामध्ये केवळ टंचाईग्रस्त गावांना टँकरने पुरवठा करण्यासाठी ३५ लाख ८५ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहे.या आराखड्यानुसार विंधन विहिरी दुरुस्ती, विहिरीतील गाळ काढण्याचे यंदाच्या उन्हाळ्यामध्ये एकही पैसा खर्च करण्याची तरतूद करण्यात आलेली नाही. यंदाच्या आराखड्यानुसार लांजा तालुक्यात ८ गावातील ८ वाड्यांमध्ये टंचाईग्रस्तांना पाणीपुरवठा करण्यासाठी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. त्यासाठी टंचाई कृती आराखड्यामध्ये ४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.गतवर्षीच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये एकही नवीन विंधन विहीर घेण्यात आलेली नव्हती. कारण विंधन विहिरींची कामे जिल्हा नियोजनमधून घेण्यात आली होती. मात्र, यंदा ११० गावातील १६२ वाड्यांमध्ये विंधन विहिरी घेण्यात येणार आहेत. त्यासाठी ९७ लाख २० हजार रुपयांची तरतूद आराखड्यामध्ये केली आहे. मात्र, याला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी मिळणे आवश्यक आहे.

या आराखड्यामध्ये नळपाणी पुरवठा योजना दुरुस्तीसाठी ४ कोटी १२ लाख ७५ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ६४ नादुरुस्त योजनांची दुरुस्ती केली जाणार आहे.जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे यंदाचा टंचाईकृती आराखडा मंजुरीसाठी सादर केला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही संपूर्ण कृती आराखडा मंजूर करण्याची अपेक्षा जिल्हा परिषदेकडून व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, मागील इतिहास पाहता जिल्हा प्रशासनाकडून टंचाई कृती आराखड्यामध्ये मोठ्या प्रमाणात काटछाट करुन तो मंजूर करण्यात येतो.गावे, वाड्यांची संख्या कमीयंदा पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यताही कमी असल्याने गावे व वाड्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यात सुमारे ४५००पेक्षा जास्त वनराई, कच्चे बंधारे उभारण्यात आले आहेत. त्याद्वारे ग्रामीण भागात पाणी अडवण्यात आल्याने तेथील विहिरी व बंधाऱ्यांच्या आजूबाजूची पाण्याची पातळी वाढल्याने यंदा पाणीटंचाई कमी उद्भवणार हे निश्चित आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWaterपाणी