रत्नागिरी : शहरालगतच्या मिरजोळे येथील भक्ती मयेकर हिच्या खून प्रकरणी तिच्या प्रियकरासह त्याच्या दाेन साथीदारांनाही पाेलिसांनी अटक केली आहे. या तिघांनाही ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी सुनावण्यात आली आहे.प्रियकर दुर्वास दर्शन पाटील (वय २५, रा. जंगमवाडी-वाटद खंडाळा, रत्नागिरी) याच्यासह बार मॅनेजर विश्वास पवार (वय ४१, रा. कळझाेंडी-बाैद्धवाडी, रत्नागिरी) आणि कारचालक सुशांत शांताराम नरळकर (वय ४०, रा. आदर्शनगर, वाटद-खंडाळा, रत्नागिरी) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी तरुणीचा भाऊ हेमंत जितेंद्र मयेकर याने पाेलिस स्थानकात फिर्याद दिली आहे.त्यानुसार भक्ती जितेंद्र मयेकर (वय २५, रा. मिरजोळे-रत्नागिरी) हिने तिच्या प्रियकराकडे लग्नासाठी तगादा लावला हाेता; मात्र प्रियकराने तिच्याशी ब्रेक अप करत अन्य एका मुलीशी लग्न जमविले हाेते. आपले ठरलेले लग्न माेडेल या भीतीने भक्तीचा काटा काढण्याचे प्रियकराने ठरविले. त्यानुसार त्याने १६ ऑगस्ट राेजी तिला खंडाळा येथील बार येथे बाेलावून घेतले हाेते. त्यानंतर तिचा केबलने गळा आवळून खून केला. ती निपचित पडल्यानंतर विश्वास पवार आणि सुशांत नरळकर यांच्या मदतीने तिचा मृतदेह आंबा घाटात नेऊन टाकला.भक्ती बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल हाेताच पाेलिसांनी तपासाची चक्रे फिरवून प्रियकराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चाैकशी केली असता त्याने खुनाची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीनुसार आंबा घाटात पाेलिसांनी मृतदेहाचा शाेध घेतला. या शाेध माेहिमेनंतर भक्तीचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला. तिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.याप्रकरणी पाेलिसांनी शनिवारी रात्री उशिराने तिघांवर भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १०३ (१), २३८, ६१ (२), १३८, १२७ (४) प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तिघांना ८ सप्टेंबरपर्यंत पाेलिस काेठडी ठाेठावण्यात आली.
टॅटूमुळे पटली ओळखतब्बल १४ दिवसांनी बेपत्ता भक्तीचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत हाेता. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान पाेलिसांसमाेर हाेते. मात्र, तिच्या हातावर असलेल्या टॅटूमुळे हा मृतदेह तिचा असल्याचे स्पष्ट झाले.
गरोदर असल्याची धक्कादायक माहितीया खूनप्रकरणाचा तपास करताना तरुणी प्रेमसंबंधातून गरोदर राहिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे तिने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्यानेच तिचा अडसर दूर करण्यासाठी गळा आवळून मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.