शहरं
Join us  
Trending Stories
1
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
2
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
3
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
4
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
5
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
6
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
7
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
8
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
9
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
10
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
11
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
12
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
13
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
14
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
15
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
16
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
17
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
18
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
19
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
20
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."

पीएम किसान सन्मान निधी: शेतकरी वंचित राहू नये यासाठी गावपातळीवर विशेष मोहिम

By मेहरून नाकाडे | Updated: December 19, 2023 18:38 IST

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून ...

रत्नागिरी : केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळावा यासाठी केवायसी करण्यासह आधारसंलग्नीकरण करण्यासाठी कृषी विभागाकडून विशेष मोहिमेला प्रारंभ झाला आहे. ही माेहिम दि.१५ पर्यंत राबविण्यात येणार आहे. जेणेकरून जानेवारीच्या शेवटच्या पीएम किसान योजनेचा प्रस्तावित १६ वा हप्ता वितरीत करण्याचे शासनाचे नियोजन आहे.पी.एम.किसान योजनेमध्ये जिल्ह्यातील एकूण एक ६५ हजार ३९९ लाभार्थी सहभागी आहेत. यामधील केवायसी प्रलंबित असलेले ७२०३, बॅंक आधारखाते सलग्न नसलेले१९७५७ तसेच भूमि अभिलेख नोंदी प्रलंबित असलेले १०८६४ लाभार्थी प्रलंबित आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पहिल्या टप्प्यात दि.२२ डिसेंबर पर्यंत जिल्ह्यातील पीएम किसान योजनेतील बॅंक आधारद सलग्न नसलेले, ई केवायसी प्रलंबित असलेले, स्वयं नोदणी लाभार्थीची मान्यता प्रलंबित असलेले व वन स्टाॅप पेमंट केलेले लाभार्थी याबाबत प्राधान्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.आधार सिडींगसाठी पोस्ट खाते सामायिक सुविधा केंद्र व बॅंक व्यवस्थान मदतीने तर ई केवायसी करिता जिल्ह्यातील प्रत्येक गावामध्ये नियुक्त केलेले ग्रामस्तरीय व्हिलेज नोडल अधिकारी व सामायिक सुविधा केंद्र यांचेमार्फत कार्यवाही केली जाणार आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरी